शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठरावानंतरही रेतीघाटाचा लिलाव

By admin | Updated: March 10, 2017 00:59 IST

वर्धा नदीच्या पात्रातील येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता.

जेसीबी व नावेचा वापर : पंचायतराजचा प्रशासनाकडूनच अवमानआर्वी/टाकरखेड : वर्धा नदीच्या पात्रातील येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता. ग्रामस्थांची मागणी असल्याने सर्वसंमतीने हा ठराव पारिक करून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. असे असताना तहसीलदार व महसूल विभागाने या घाटाचा लिलाव केला. यातून पंचायतराज योजनेचा प्रशासनच अवमान करीत असल्याचे दिसते. या प्रकरणी चौकशी करून घाट रद्द करावा, अशी मागणी टाकरखेड ग्रा.पं. ने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.रेतीसाठी नदीचे पात्र ओरबडले जात असून खोल खड्डे पडतात. परिणामी, नदीच धोक्यात येते. शिवाय घाटाचा लिलाव केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून अतिरेकी उपसा केला जातो. यामुळे प्रसंगी गावालाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊनच ग्रा.पं. प्रशासन व ग्रामस्थांनी ग्रामसभेत येथील रेती घाटाचा लिलाव करू नये, असा ठराव घेतला होता. सदर ठरावाबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले होते; पण ग्रामसभेचा अपमान करीत प्रशासनाने घाटाचा लिलाव केला. हा घाट त्वरित रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. सोमवारी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनाही तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष बबन कोल्हे, उपाध्यक्ष सुधाकर सहारे, पोलीस पाटील हनुमंत भुरभुरे यांनी निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)ग्रामसभा प्रभावहीनटाकरखेड ग्रा.पं. ने ग्रामसभेत रेती घाटाचा लिलाव करू नये, असा ठराव घेतला. तो महसूल विभागाला सादर केला; पण महसूल विभागाने ग्रामसभेच्या निर्णयाचा अवमान करीत घाटाचा लिवाव केला. प्रशासनच पंचायतराज अभियानाचा अपमान करीत असल्यानेच ग्रामसभा प्रभावहीन ठरत असल्याचे दिसते.