शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

ठरावानंतरही रेतीघाटाचा लिलाव

By admin | Updated: March 10, 2017 00:59 IST

वर्धा नदीच्या पात्रातील येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता.

जेसीबी व नावेचा वापर : पंचायतराजचा प्रशासनाकडूनच अवमानआर्वी/टाकरखेड : वर्धा नदीच्या पात्रातील येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता. ग्रामस्थांची मागणी असल्याने सर्वसंमतीने हा ठराव पारिक करून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. असे असताना तहसीलदार व महसूल विभागाने या घाटाचा लिलाव केला. यातून पंचायतराज योजनेचा प्रशासनच अवमान करीत असल्याचे दिसते. या प्रकरणी चौकशी करून घाट रद्द करावा, अशी मागणी टाकरखेड ग्रा.पं. ने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.रेतीसाठी नदीचे पात्र ओरबडले जात असून खोल खड्डे पडतात. परिणामी, नदीच धोक्यात येते. शिवाय घाटाचा लिलाव केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून अतिरेकी उपसा केला जातो. यामुळे प्रसंगी गावालाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊनच ग्रा.पं. प्रशासन व ग्रामस्थांनी ग्रामसभेत येथील रेती घाटाचा लिलाव करू नये, असा ठराव घेतला होता. सदर ठरावाबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले होते; पण ग्रामसभेचा अपमान करीत प्रशासनाने घाटाचा लिलाव केला. हा घाट त्वरित रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. सोमवारी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनाही तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष बबन कोल्हे, उपाध्यक्ष सुधाकर सहारे, पोलीस पाटील हनुमंत भुरभुरे यांनी निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)ग्रामसभा प्रभावहीनटाकरखेड ग्रा.पं. ने ग्रामसभेत रेती घाटाचा लिलाव करू नये, असा ठराव घेतला. तो महसूल विभागाला सादर केला; पण महसूल विभागाने ग्रामसभेच्या निर्णयाचा अवमान करीत घाटाचा लिवाव केला. प्रशासनच पंचायतराज अभियानाचा अपमान करीत असल्यानेच ग्रामसभा प्रभावहीन ठरत असल्याचे दिसते.