शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठरावानंतरही रेतीघाटाचा लिलाव

By admin | Updated: March 10, 2017 00:59 IST

वर्धा नदीच्या पात्रातील येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता.

जेसीबी व नावेचा वापर : पंचायतराजचा प्रशासनाकडूनच अवमानआर्वी/टाकरखेड : वर्धा नदीच्या पात्रातील येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात येऊ नये, असा ठराव ग्रामसभेने घेतला होता. ग्रामस्थांची मागणी असल्याने सर्वसंमतीने हा ठराव पारिक करून त्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. असे असताना तहसीलदार व महसूल विभागाने या घाटाचा लिलाव केला. यातून पंचायतराज योजनेचा प्रशासनच अवमान करीत असल्याचे दिसते. या प्रकरणी चौकशी करून घाट रद्द करावा, अशी मागणी टाकरखेड ग्रा.पं. ने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.रेतीसाठी नदीचे पात्र ओरबडले जात असून खोल खड्डे पडतात. परिणामी, नदीच धोक्यात येते. शिवाय घाटाचा लिलाव केल्यानंतर संबंधित कंत्राटदाराकडून अतिरेकी उपसा केला जातो. यामुळे प्रसंगी गावालाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊनच ग्रा.पं. प्रशासन व ग्रामस्थांनी ग्रामसभेत येथील रेती घाटाचा लिलाव करू नये, असा ठराव घेतला होता. सदर ठरावाबाबत महसूल प्रशासनाला कळविण्यात आले होते; पण ग्रामसभेचा अपमान करीत प्रशासनाने घाटाचा लिलाव केला. हा घाट त्वरित रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून करण्यात आली. सोमवारी तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनाही तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष बबन कोल्हे, उपाध्यक्ष सुधाकर सहारे, पोलीस पाटील हनुमंत भुरभुरे यांनी निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे.(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)ग्रामसभा प्रभावहीनटाकरखेड ग्रा.पं. ने ग्रामसभेत रेती घाटाचा लिलाव करू नये, असा ठराव घेतला. तो महसूल विभागाला सादर केला; पण महसूल विभागाने ग्रामसभेच्या निर्णयाचा अवमान करीत घाटाचा लिवाव केला. प्रशासनच पंचायतराज अभियानाचा अपमान करीत असल्यानेच ग्रामसभा प्रभावहीन ठरत असल्याचे दिसते.