शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

अतवृष्टीग्रस्तांवर आश्‍वासनांचीच खैरात

By admin | Updated: June 2, 2014 01:39 IST

गतवर्षी खरीप रोजी झालेल्या अतवृष्टीत स्थानिक भोलेश्‍वरी

रोहणा : गतवर्षी खरीप रोजी झालेल्या अतवृष्टीत स्थानिक भोलेश्‍वरी नदीच्या काठावरील अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या. यातील अनेक शेतकर्‍यांना शासनाकडून अद्यापही कोणतेच अर्थसहाय्य मिळालेले नाही. लवकरच निधी मिळेल अशी आश्‍वासनांची खैरात मात्र सुरूच आहे.

जमीन खरडून गेलेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना व त्यानंतर झालेल्या गारपीटग्रस्तांना हेक्टरी भरीव अनुदान शासनाकडून जाहीर झाले आहे. पण खरडून गेलेल्या जमिनीचे अनुदान अजूनही शेतकर्‍यांना मिळाले नाही. नुकतीच रोहणा येथील काही पीडित शेतकर्‍यांनी आर्वी उपविभागीय अधिकार्‍यांची भेट घेतली असता शासनाकडून अनुदान आल्यावर तुम्हाला देवू असे वेळ काढू आश्‍वासन दिले.

गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या अतवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. कित्येकांची घरे जमीनदोस्त झाली. जनावरे वाहून गेली. जीवनोपयोगी साहित्य खराब झाले. शेतातील पिके खराब झाली. रोहणा येथील भोलेश्‍वरी नदीला कधी नव्हे एवढा प्रचंड पूर आला. या पुरात १00 ते १५0 शेतकर्‍यांच्या हजारो हेक्टर जमिनीतील नुसती पिकेच नाही तर पिकांसह संपूर्ण शेतजमीन वाहून गेली. नदीतील रेती व दगड शेतात येऊन साचले. अनेकांची शेत कुंपणे, ठिंबक सिंचन साहित्य व स्प्रिंकलर संच वाहून गेले. यातील अनेक शेतजमीन आजही शेती करण्यास उपयुक्त नाही. अशा जमीन खरडून गेलेल्या शेतकर्‍यांना प्रति हेक्टर रुपये २५ हजार व कमाल र्मयादा दोन हेक्टरची असेल याप्रमाणे अनुदान मिळेल असे शासनाने जाहीर केले व अशा खरडून गेलेल्या शेत जमिनीचा महसूल विभागाने सर्व्हेदेखील केला. त्यानंतर सर्वसाधारण नुकसानग्रस्तांना शासनाचे अनुदान मिळाले.

जनावरे वाहून गेली अशा नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळाली. घरे पडली किंवा जीवनोपयोगी वस्तू खराब झाल्या अशा पीडितांनाही शासनाने आणि काही स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी आर्थिक मदतीचे वाटप केले. पण ज्यांच्या जमिनी खरडून गेल्या अशा पीडितांना शासनाची मदत मिळालेली नाही. विशेष म्हणजे डिसेंबर-जानेवारी मध्ये व त्यानंतरही झालेल्या गारपीट ग्रस्तांना शासनाने भरीव मदत दिली. जेथे गारपीट झालीे त्या भागातील शेतकर्‍यांबरोबर गारपीट न झालेल्या भागातील शेतकर्‍यांनादेखील शासनाने भरीव आर्थिक मदत देवून त्यांच चांगभलं केले. मग या खरडून गेलेल्या शेतजमीनधारकांना अजूनपर्यंंत का मदत मिळाली नाही, हा प्रश्न बर्‍याच दिवसांपासून शेतकर्‍यांना सतावत आहे. रोहणा येथील पीडित शेतकरी संजय रणनवरे यांच्या नेतृत्वात अंदाजे ५0 शेतकर्‍यांनी आर्वी येथे उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन आपली कथा सांगितली. लेखी निवेदनही दिले. पण त्यांनी शासनाकडून अनुदान राशी आल्यावर त्वरीत आपल्याला वाटू असे वेळकाढू आश्‍वासन देऊन वेळ निभावून नेली पण शेतकरी आर्थिक संकटात असल्याने व पुढचा खरीप येऊन ठेपल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मदत मिळाल्यास खरिपातील बियाणे खरेदी करण्यासाठी हातभार लागला असता. पण निधी न मिळाल्याने शेतकरी आशेवर आहे.(वार्ताहर)