शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

आष्टी तालुक्याचा निकाल ७४ टक्के

By admin | Updated: June 20, 2014 00:03 IST

माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाला नुकताच जाहीर करण्यात आला. यात तालुक्याचा एकूण निकाल ७४.८४ टक्के लागला आहे. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी प्रवीण गोहाड

आष्टी(श.) : माध्यमिक शालांत परीक्षा इयत्ता दहावीचा निकाला नुकताच जाहीर करण्यात आला. यात तालुक्याचा एकूण निकाल ७४.८४ टक्के लागला आहे. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी जान्हवी प्रवीण गोहाड हिने ९४.४० टक्के गुण प्राप्त करीत तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. यासह यशस्वी निकालाची परंपरा हुतात्माने विद्यालयाने यावर्षीही कायम ठेवली आहे. तालुक्यातून द्वितीय अंजली सुरेश सोनोवणे ९३.६० टक्के, तृतीय कृतिका विनोद पेठे ९३.२० टक्के गुण मिळविले आहे.हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयातून एकूण १७० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यापैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ९४.१२ टक्के आहे. ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी मनिषा केशव गोहाड ९०.८० टक्के, मयुर लोखंडे ९१.२० टक्के, सुयश निकाळजे ९०.२० टक्के गुण प्राप्त केले आहे.लोकमान्य विद्यालयातून एकूण १९३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी १६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ८२.९० टक्के आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक अदिती केशव चौरेवार ९३ टक्के, द्वितीय मनीष शिंदे ९०.८० टक्के, तृतीय वैष्णवी घावट ९०.४० टक्के ठरले आहे. जवाहर उर्दु हायस्कूल येथून एकुण ४३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ९३.०२ टक्के आहे. विद्यालयातून प्रथम निदा तरन्नुम शादीक ८७ टक्के, द्वितीय महेश परवीन अकबरखान ८५ टक्के, तृतीय सिरीन परवीन शेख मुस्ताक ८४.३० टक्के गुण मिळाले आहे. मॉडेल हायस्कूल तळेगाव येथील १०१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.यापैकी ६९ उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल ६८.३१ टक्के, कानेश्वर विद्यामंदिर साहूर चा निकाल ५७.३५ टक्के, हुतात्मा राष्ट्रीय विद्यालय साहुर ३९.४७ टक्के, मॉडेल हायस्कूल भारसवाडा ७३.९१ टक्के, संत भाकरे महाराज विद्यालय माणीकवाडा ७१.४२ टक्के, जवाहर स्मृती विद्यालय देलवाडी ७६.६६ टक्के, नुतन कन्या विद्यालय तळेगाव ६७.४४ टक्के, अंजनाबाई झाडे कन्या विद्यालय आष्टी ५९.३७ टक्के, शासकीय आश्रमशाळा पांढूर्णा ४७.३६ टक्के, शारदादेवी भार्गव विद्यालय ९४.७३ टक्के, संत गजानन महाराज विद्यालय लहान आर्वी ६६.६६ टक्के, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय अंतोरा ५६.२५ टक्के, स्व. दादासाहेब अडसड विद्यालय खडकी ८० टक्के, स्वातंत्र्यवीर लोहे विद्यालय वडाळा ६८.१८ टक्के निकाल आहे. या शाळांनी दहा वर्षातील निकालाची परंपरा यावर्षीही कायम आहे.कारंजा तालुक्याचा निकाल ७८.५३ टक्के कारंजा(घा.) : दहावीकरिता तालुक्यातुन एकूण १२४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एकूण ९८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात तालुक्याचा ७८.५३ टक्के निकाल लागला आहे. यात स्व. राजीव गांधी मेमोरीयल हायस्कूलने सलग चौथ्यांदा १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवीत यश संपादन केले. तर याच विद्यालयाच्या भावेश सरोदे याने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. त्याने ५०० पैकी ४६४ गुण प्राप्त केले आहे. त्याचा संस्थेच्या संचालिका अरुणा चाफले मुख्याध्यापक व शिक्षकांनी सत्कार केला. तसेच अन्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.कारंजा तालुक्यातून एकुण २० शाळांमधून विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये मॉडेल हायस्कूलचा ७४.६२ टक्के निकाल लागला असुन भुषण बळीराम राउत याने ९०.८० टक्के गुण प्राप्त करुन शाळेतून प्रथम आला. प्रणाली सुधाकर ईखार हिने ९०.६८ टक्के गुण प्राप्त करुन व्दितीय क्रमांक पटकाविला तर सृष्टी प्रल्हाद खवशी हिने ८७.४० टक्के गुण मिळवून ती शाळेतून तिसरी आली. कारंजा येथील स्व.राजीव गांधी मेमोरियल हायस्कूलने या वर्षी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. समृध्दी कामडी हिने ८४ टक्के गुण मिळवून शाळेतून व्दितीय आली. निखील ढोले ८२.७४ टक्के गुण मिळवुन तिसरा आला. येथील कस्तुरबा विद्यालयाचा ६७.५० टक्के निकाल लागला आहे. तुषार डोबले ८३ टक्के गुण घेवुन शाळेतून प्रथम आला. वैभव ढोबाळे ७६.२१ टक्के व्दितीय तर श्रध्दा गाखरे ७५.२१ टक्के गुण घेवुन तृतीय आली. नवप्रभात विद्यामंदिर ठाणेगांव शाळेचा निकाल ७४.३५ टक्के, दादासाहेब कन्नमवार विद्यालय ९१.८९ टक्के, पार्डी हायस्कूल चा निकाल ७९.४५ टक्के, माध्यमिक विद्यालय काजळी ८६.८४ टक्के, सोहमनाथ विद्यामंदिर उमरी ९३.९० टक्के, माध्यमिक विद्यालय चिंचोली ९५.४५ टक्के, महात्मा फुले विद्यालय सारवाडी ८५.३३ टक्के, अण्णासाहेब गुंडेवार विद्यालय नारा ७८.४३ टक्के, ग्रामविकास विद्यालय काकडा ९३.९४ टक्के, सावित्रीबाई फुले विद्यालय ८७.५० टक्के, इंदीरा कन्या विद्यालय कारंजा ४४.०७ टक्के, जगदंबा विद्यालय सावळी ८६.६७ टक्के, यशवंत विद्यामंदीर सेलगांव ८१.८२ टक्के, आठवले आदिवासी विकास हायस्कूल सिंदीविहिरी ८४.६२ टक्के, भाकरे महाराज हायस्कूल सुसुंद्रा ७३.३३ टक्के, शासकीय आश्रम शाळा सिंदीविहिरी ८९.२९ टक्के, स्व. यादवराव केचे आदिवासी आश्रम शाळा नारा ८० टक्के लागला.