शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

महामार्गावरील राख ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:49 IST

शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

ठळक मुद्देआजार वाढले : हवेतील धूलिकणांमुळे नागरिकही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. हवेसोबत परिसरात पसरणारी ही राख अनेकांच्या घरात शिरत असल्याने गृहीणीही त्रस्त झाल्या आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्याची मागणी जोर धरत आहे.शहरालगतच्या पिपरी(मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गालगतच काही अंतरावर वस्ती आहे. तसेच या मार्गालगत पर्यायी रस्ताही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सतत वाहतूक सुरु असते. महामार्गावर मोठ्या टिप्परच्या सहाय्याने राख आणली जात आहे. या टिप्परमध्ये भरलेली राख जरी वरुन झाकली असली तरी हवेच्या वेगाने ती रस्त्याने उडत असते. परिणामी मागाहून येणाऱ्या वाहनचालकाला त्या राखेचा त्रास सहन करावा लागतो.उडणारी राख डोळ्यात जात असल्याने डोळ्यांची जळजळ होत आहे. तसेच कपड्यावर उडूनही कपडे खराब होत आहे. अचानक राख डोळ्यात जात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परिसरातील नागरिक झाले हैराणसिंदी (मेघे) परिसरात महामार्गाच्या कामात राख वापरली जात असून टिप्परमधून राख खाली उतरविल्यानंतर त्यावर पाणी न मारता तशीच ठेवली जाते. त्यामुळे येणाºया हवेमुळे ती राख उडते. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरल्याचे दिसून येते. यामुळे पुढचा माणूस किंवा वाहनेही दिसने कठीण होऊ जात आहे. अनेकदा या राखीमुळे किरकोळ अपघातही होत आहे.उडणारी राख सिंदी (मेघे), विक्रमशीला नगर, थुल ले-आऊट, सावंगी टि-पार्इंट या परिसरातील वस्तीतील घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे महिला वर्गांना दिवसातून दोन ते तीन वेळा घर साफ करावे लागत आहे. तसेच विहिरी व घरात साठवून पाण्यावरही ही राख गोळा होत आहे.या राखीमुळे या परिसरातील वातावरण पुर्णत: धुळयुक्त होत असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे आजार बळावत आहे. तसेच लहान बालकांनाही घराबाहेर काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.