शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील राख ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 23:49 IST

शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.

ठळक मुद्देआजार वाढले : हवेतील धूलिकणांमुळे नागरिकही त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या परिसरातून नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्याप्रमाणात राख (डस्ट) चा वापर होत असून ही राख आता परिसरातील नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. हवेसोबत परिसरात पसरणारी ही राख अनेकांच्या घरात शिरत असल्याने गृहीणीही त्रस्त झाल्या आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्याची मागणी जोर धरत आहे.शहरालगतच्या पिपरी(मेघे) व सिंदी (मेघे) परिसरात नागपूर-तुळजापूर महामार्गाचे काम सुरु आहे. या महामार्गालगतच काही अंतरावर वस्ती आहे. तसेच या मार्गालगत पर्यायी रस्ताही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे सतत वाहतूक सुरु असते. महामार्गावर मोठ्या टिप्परच्या सहाय्याने राख आणली जात आहे. या टिप्परमध्ये भरलेली राख जरी वरुन झाकली असली तरी हवेच्या वेगाने ती रस्त्याने उडत असते. परिणामी मागाहून येणाऱ्या वाहनचालकाला त्या राखेचा त्रास सहन करावा लागतो.उडणारी राख डोळ्यात जात असल्याने डोळ्यांची जळजळ होत आहे. तसेच कपड्यावर उडूनही कपडे खराब होत आहे. अचानक राख डोळ्यात जात असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य धोका लक्षात घेऊन अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.परिसरातील नागरिक झाले हैराणसिंदी (मेघे) परिसरात महामार्गाच्या कामात राख वापरली जात असून टिप्परमधून राख खाली उतरविल्यानंतर त्यावर पाणी न मारता तशीच ठेवली जाते. त्यामुळे येणाºया हवेमुळे ती राख उडते. त्यामुळे सर्वत्र धूळ पसरल्याचे दिसून येते. यामुळे पुढचा माणूस किंवा वाहनेही दिसने कठीण होऊ जात आहे. अनेकदा या राखीमुळे किरकोळ अपघातही होत आहे.उडणारी राख सिंदी (मेघे), विक्रमशीला नगर, थुल ले-आऊट, सावंगी टि-पार्इंट या परिसरातील वस्तीतील घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे महिला वर्गांना दिवसातून दोन ते तीन वेळा घर साफ करावे लागत आहे. तसेच विहिरी व घरात साठवून पाण्यावरही ही राख गोळा होत आहे.या राखीमुळे या परिसरातील वातावरण पुर्णत: धुळयुक्त होत असल्याने परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व त्वचेचे आजार बळावत आहे. तसेच लहान बालकांनाही घराबाहेर काढणे कठीण झाले आहे. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.