शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

आर्वीत महिनाभर सिंचन होईल एवढेच पाणी!

By admin | Updated: December 9, 2015 02:28 IST

यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला.

पाण्याचा उपसा वाढला : उपविभागात ३५ टक्केच जलसाठा सुरेंद्र डाफ आर्वीयंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. यामुळे रबी हंगामात पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाल्याने पाण्याचा उपसा वाढला. आजच्या स्थितीत उपविभागातील जलसाठ्यात ३५ टक्के पाणी आहे. असलेले पाणी सिंचनाकरिता एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याची माहिती आहे. उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा अशी तीन तालुके आहेत. या तालुक्यात १७ लघुतलाव आहेत. आर्वीत सहा, कारंजा १० तर आष्टीत एक तलाव आहे. आर्वी तालुक्यात १५ पाझर तलाव, १३ गावतलाव आहे. या १३ गावतलावांपैकी सात हिवाळ्यातच कोरडे झाले आहेत. या सर्व तलावात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. आर्वी तालुक्यातील सालधरा, गोंडखैरी, काकडधरा, गौरखेडा, दहेगाव (गोंडी), पाचोड, तरोडा, किन्हाळा, चांदणी, पिंपळझरी, हुसेनपूर, पिंपळझरी खैरी, पांजरा बो. खानापूर, सालधरा, परसोडी, रामपूर, अजनगाव, पिंपळगाव (भोसले) आदी लघुतलावांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात १३ पाझर तलाव पाच गाव तलाव व ३४ कोल्हापूरी बंधारे आहेत. आर्वी तालुक्यात २६ कोल्हापूरी बंधारे आहेत. त्यापैकी फक्त सात बंधाऱ्यात पाणी आहे, तदर कोरडे पडले आहे. आष्टी तालुक्यात एक दोन पाझर तलाव, पाच गाव तलाव व एक कोल्हापूरी बंधारा आहे. आर्वीत गत वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने लघुतलाव शंभर टक्के भरले होते. यावर्षी मात्र येथील जलायशये ५० टक्केही भरले नाही. फक्त एक महिना पुरेल एवढाच जलसाठा येथे असल्याची माहिती आहे. यावर्षीच्या अल्प पावसाचा खरीप व रब्बी हंगामातील पिकांना फटका व ताण सहन करावा लागला. यात रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्याअभावी पाण्याचा उपसा दुप्पट वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाली. रब्बीच्या पिकांना या उपविभागातून जानेवारी महिन्यापर्यंत पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु यावर्षी रब्बी हंगाम उलटून एक महिलाच झाला आहे. अशात या जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाण्याअभावी रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. ऐन हिवाळ्यातच येथील जलसाठे कोरडे पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलाव कोरडे पडल्याने अनेक उपविभागात पाणी टंचाईचे निर्माण झाले आहे.