शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

आर्वीत महिनाभर सिंचन होईल एवढेच पाणी!

By admin | Updated: December 9, 2015 02:28 IST

यंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला.

पाण्याचा उपसा वाढला : उपविभागात ३५ टक्केच जलसाठा सुरेंद्र डाफ आर्वीयंदा पावसाळा कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. सप्टेंबर महिन्यातच पावसाने उघाड दिल्याने खरीप हंंगामातील पिकांना पाण्याचा ताण सहन करावा लागला. यामुळे रबी हंगामात पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाल्याने पाण्याचा उपसा वाढला. आजच्या स्थितीत उपविभागातील जलसाठ्यात ३५ टक्के पाणी आहे. असलेले पाणी सिंचनाकरिता एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याची माहिती आहे. उपविभागातील आर्वी, आष्टी, कारंजा अशी तीन तालुके आहेत. या तालुक्यात १७ लघुतलाव आहेत. आर्वीत सहा, कारंजा १० तर आष्टीत एक तलाव आहे. आर्वी तालुक्यात १५ पाझर तलाव, १३ गावतलाव आहे. या १३ गावतलावांपैकी सात हिवाळ्यातच कोरडे झाले आहेत. या सर्व तलावात ३० टक्के जलसाठा शिल्लक आहे. आर्वी तालुक्यातील सालधरा, गोंडखैरी, काकडधरा, गौरखेडा, दहेगाव (गोंडी), पाचोड, तरोडा, किन्हाळा, चांदणी, पिंपळझरी, हुसेनपूर, पिंपळझरी खैरी, पांजरा बो. खानापूर, सालधरा, परसोडी, रामपूर, अजनगाव, पिंपळगाव (भोसले) आदी लघुतलावांचा समावेश आहे. कारंजा तालुक्यात १३ पाझर तलाव पाच गाव तलाव व ३४ कोल्हापूरी बंधारे आहेत. आर्वी तालुक्यात २६ कोल्हापूरी बंधारे आहेत. त्यापैकी फक्त सात बंधाऱ्यात पाणी आहे, तदर कोरडे पडले आहे. आष्टी तालुक्यात एक दोन पाझर तलाव, पाच गाव तलाव व एक कोल्हापूरी बंधारा आहे. आर्वीत गत वर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने लघुतलाव शंभर टक्के भरले होते. यावर्षी मात्र येथील जलायशये ५० टक्केही भरले नाही. फक्त एक महिना पुरेल एवढाच जलसाठा येथे असल्याची माहिती आहे. यावर्षीच्या अल्प पावसाचा खरीप व रब्बी हंगामातील पिकांना फटका व ताण सहन करावा लागला. यात रब्बी हंगामात जमिनीतील ओलाव्याअभावी पाण्याचा उपसा दुप्पट वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची मागणी दुप्पट झाली. रब्बीच्या पिकांना या उपविभागातून जानेवारी महिन्यापर्यंत पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु यावर्षी रब्बी हंगाम उलटून एक महिलाच झाला आहे. अशात या जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असल्याने पाण्याअभावी रबी हंगामही शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची चिन्हे आहेत. ऐन हिवाळ्यातच येथील जलसाठे कोरडे पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तलाव कोरडे पडल्याने अनेक उपविभागात पाणी टंचाईचे निर्माण झाले आहे.