शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शहरातील बाजारपेठेत साखरगाठ्यांचे आगमन

By admin | Updated: March 4, 2015 02:11 IST

शिशिर ऋतुचा उत्तरार्ध होतो तो होलिकात्सवाने. यानंतर चाहुल लागते

होळीच्या सणाची चाहुल : गाठ्यांवरही महागाईचे सावट; ८० रुपये किलोचा दरवर्धा : शिशिर ऋतुचा उत्तरार्ध होतो तो होलिकात्सवाने. यानंतर चाहुल लागते वसंतागमनाची. निसर्गही या काळात आपले रूप पालटतो. होळी हा जसा रंगांचा सण मानला जातो तसाच गोधधोड पदार्थांचीही याकाळात रेलचेल असते. या सणाला घरातील लहानग्यांना गाठी देण्याची परंपरा आजतागत कायम आहे. शहरातील बाजारपेठेतही साखरगाठ्यांनी दुकाने सजलेली पहायला मिळत आहे.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखरगाठ्यांच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येते. गत वर्षी गाठ्यांचा दर ८० ते १५० रुपयांपर्यंत होते. यंदा मात्र तेच दर ६० ते ८० रुपयांपर्यंत आहे. यामुळे महागाईच्या धबडग्यात सर्वसामान्यांना ही बाब दिलासा देणारी ठरणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होळी व धुलिवंदन आहे. यानिमित्ताने शहरातील बाजारपेठतेही आवश्यक वस्तुंची आवक सुरू झाली आहे. शुभ्र रंगासह विविध रंगातील गाठ्या दुकानांमध्ये विक्रीकरिता उपलब्ध आहे. शिवाय पिचकारी, गुलाल यांनी तर बाजारपेठही खुलून गेली आहेत. ग्रामीण भागातूनही लोक शहारात गाठ्या खरेदी करण्याकरिता येत आहेत. शहरातील प्रमुख बाजारपेठेत होळी व धूलिवंदनानिमित्त गाठीची ठिकठिकाणी दुकाने थाटलेली दिसतात. यातच भाव कमी असल्याने यंदा गाठ्यांची विक्री मागील वर्षीच्या तुलनेत बऱ्यापैकी होईल, अशी माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली. सध्या गाठ्यांच्या दुकानात गर्दी होत असल्याचे चित्र आहे.(स्थानिक प्रतिनिधी)विविध आकारातील व रंगातील गाठ्या ठरताहेत ग्राहकांचे आकर्षण होळी सणाच्या आठ दिवसांपूर्वी पासूनच बाजारात गाठीचे दुकाने सजली आहेत. विशेष म्हणजे साधारण गाठ्यांसह वेगवेगळया आकारातील गाठ्या ग्राहकांना आकर्षित करताना दिसतात. बाजारात सध्या लहान आकारातील तसेच मोठे पदक असलेल्या गाठ्या अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. यातील साधारण व लहान ठपक्यांच्या गाठ्या ८० रुपये प्रति किलो दराने तर मोठ्या पदकांच्या गाठ्या १२० व ७० रुपये दराने विकल्या जात आहेत.गाठ्यांचे नवे रूपगाठ्या ग्राहकांच्या पसंतीस याव्यात यासाठी दरवर्षी त्यांच्या आकारात बदल केले जात असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. साध्या रूपात रंगीबिरंगी व विविध कलाकृती केलेल्या गाठ्यांची गर्दी बाजारात दिसून येत आहे.