शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

स्वच्छतागृह उभारण्यात उदासीनता

By admin | Updated: May 1, 2015 01:42 IST

गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

वर्धा : गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र पालिका प्रशासनाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसते. शहरात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. याबाबत स्थानिक नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या स्थळी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबना होते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे आणि ती स्वच्छ ठेवावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिका प्रशासनाला दिला होता. याकरिता ३१ मार्च पर्यंत मुदत आखुन दिली होती. मात्र याबाबतची अंतिम योजना अद्याप पूर्ण न झाल्याचीही माहिती मिळाल्याने तसेच चार पालिकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने नमूद करून न्यायालयाने सर्व पालिकांना १५ जुन पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच ही अंतिम संधी असल्याचे न्यायालयाने खडसावले. वर्धा पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाजपा नगरसेवकांकडून निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. नगरपालिकेत भाजपाचे शासन असताना शहराच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाकडे व न.प. चे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून आखलेल्या योजनांकडे सत्ताधारी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून करण्यात आला. या विविध मागण्याचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांना देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेल्या चर्चेत काही सूचना सांगितल्या. दूर्गा टॉकीजच्या परिसरात नाल्यावर स्लॅब टाकून स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात यावी, यासह आर्वी नाका चौकात स्वच्छतागृह बांधावे. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, गटनेते कमल कुलधारिया, प्रदीप ठाकरे, मंगेश मांगलेकर, सतीश मिसाळ, वीरू पांडे यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)