शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

स्वच्छतागृह उभारण्यात उदासीनता

By admin | Updated: May 1, 2015 01:42 IST

गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.

वर्धा : गर्दीच्या ठिकाणी महिलांकरिता स्वच्छतागृहांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. मात्र पालिका प्रशासनाकडून या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसते. शहरात स्वच्छतागृह नसल्याने महिलांची कुचंबना होत आहे. याबाबत स्थानिक नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे. शहरातील प्रमुख चौक व गर्दीच्या स्थळी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांची कुचंबना होते. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे आणि ती स्वच्छ ठेवावीत असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिका प्रशासनाला दिला होता. याकरिता ३१ मार्च पर्यंत मुदत आखुन दिली होती. मात्र याबाबतची अंतिम योजना अद्याप पूर्ण न झाल्याचीही माहिती मिळाल्याने तसेच चार पालिकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात असल्याने नमूद करून न्यायालयाने सर्व पालिकांना १५ जुन पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच ही अंतिम संधी असल्याचे न्यायालयाने खडसावले. वर्धा पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाजपा नगरसेवकांकडून निषेध करण्यात येत असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. नगरपालिकेत भाजपाचे शासन असताना शहराच्या विकासासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाकडे व न.प. चे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोणातून आखलेल्या योजनांकडे सत्ताधारी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी निवेदनातून करण्यात आला. या विविध मागण्याचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांना देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यासोबत केलेल्या चर्चेत काही सूचना सांगितल्या. दूर्गा टॉकीजच्या परिसरात नाल्यावर स्लॅब टाकून स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात यावी, यासह आर्वी नाका चौकात स्वच्छतागृह बांधावे. यावेळी माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, गटनेते कमल कुलधारिया, प्रदीप ठाकरे, मंगेश मांगलेकर, सतीश मिसाळ, वीरू पांडे यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)