शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
6
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
7
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
8
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
9
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
10
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
11
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
12
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
13
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
14
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
15
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
16
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
17
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
18
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
19
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
20
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरी ठरल्या पिकांना अमृतधारा

By admin | Updated: July 21, 2015 02:47 IST

गत महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतात उगविलेले अंकुर मरणासन्न अवस्थेत आले होते. यामुळे शेतकऱ्यांवर

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : २.७६ लाख हेक्टरवरील पिकांना संजीवनी; दमदार पावसाची प्रतीक्षा कायमवर्धा : गत महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतात उगविलेले अंकुर मरणासन्न अवस्थेत आले होते. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट गडद होण्याचे संकेत मिळत होते. अशात जिल्ह्यात काही भागात रविवारी रात्री व तर काही भागात सोमवारी सकाळी आलेल्या पावसाने पिकांना संजीवणी मिळाली. पावसाच्या आलेल्या या सरी पिकांकरिता जणू अमृतधाराच ठरल्या. महिन्यापासून आकाशात ढग दाटून येत होते. ढग येताच पाऊस येईल, असे वाटत असताना पावसाचा टिपूसही येत नव्हता. सायंकाळच्यावेळी कधी येणारा थंड वारा कुठेतरी पाऊस आला याची आठवण देत होता. मात्र जिल्ह्यात कुठे पाऊस आला याची नोंद होत नव्हती. मृगाच्या प्रारंभी आलेल्या पावसात शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. पेरण्या उगविल्यानंतर पाऊस येईल, असे वाटत असताना पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली. आज पाऊस येईल उद्या येईल, असे वाटत होते. शेतकऱ्यांच्या नजरा रोज आभाळात जमणाऱ्या ढगाकडे जात होत्या. मात्र ढगातून पावसाचा थेंबही पडत नव्हता. पावसाच्या प्रतीक्षेत शेतातील पीक वाळण्याच्या स्थितीत आले. ज्याच्याकडे ओलिताची सोय होती तो बियाण्यांचे अंकूर वाचविण्याकरिता प्रयत्न करताना दिसला. शेतातील पिकांची स्थिती पाहून शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येत होते; मात्र ढगातून पाणी बरसत नव्हते. पाऊस येताच आपल्या पिकांना त्याचा लाभ व्हावा, या आशेत डवरणी व निंदण करून शेतकरी मोकळा झाला. अशात आर्द्रा नक्षत्र कोरडे जात असल्याचे दिसताच त्याची चिंता आणखी वाढली. तहान भूक हरविली. अखेर शेतकऱ्यांवर येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ आली. वरूण राजा रूसला असल्याने कोरडवाहून क्षेत्रातील पिके करपू लागली तर डोबण साधत नसल्याने बहुतांश क्षेत्रात पीक लागवडीत अंतर पडू लागले. ते तसेच राहिल्याने उत्पन्नात घट येणार हे निश्चित असताना पुर्नवसु नक्षत्राने ही शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे चित्र निर्माण झाले. अन् चिंतेत भर पडू लागली. आर्थिकदृष्ट्या हवालदिल असलेल्या बळीराजाला सतत तीन वर्षांपासून निसर्गही साथ देत नाही. याची प्रचिती येवू लागली. मृग नक्षत्र संपले अन् पावसाने पाठ फिरविली. तो पुष्य (एक) नक्षत्र सुरू होताच पावसाच्या रिमझिम सरीने सुरुवात झाली. यामुळे पिकांची खुंटलेली वाढ आता या पावसामुळे होण्यास मदत होणार असून पिकांना एकप्रकारे अमृत मिळाल्याने शेतकऱ्यातही समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही पिकांना दमदार पावसाची गरज आहे. जर पुन्हा पावसाने दडी मारली तर सलग चौथ्यावर्षी सुद्धा नापिकीला समोरे जाण्याची वेळी येणार असल्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)वाढ खुंटलेली पिके जगणार४मृगात आलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या. त्या उगविल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने ओलावा संपत जमिनी भेगाळल्या जावू लागल्या. काही भागातील पिकांची वाढ खुंटली तर ओलावा नसलेल्या जमिनीतील पिके करपल्या जावू लागली. सोमवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस पिकांकरिता संजीवणी ठरणार असून पिकांची खुंटलेली वाढ होण्यास मदत होईल. यामळे शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे. उत्पन्नात घट निश्चित ४बियाणे अंकूरल्यावर या अंकूराच्या वाढीकरिता पावसाची गरज असताना पावसाने दडी मारली. यामुळे दिवसानुसार रोपटे वाढली नाहीत. याचा परिणाम त्यांच्या फलधारणेवर होणार असून शेतकऱ्यांना उत्पन्न कमी होणार हे निश्चित. लागवडीतील अंतर वाढले४ऐन पेरणीच्या काळात पावसाने दडी मारल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याचे टाळले. गत तीन वर्षांपासून पेरणीच्या काळात पावसाच्या दडीचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्याच केल्या नाहीत. यामुळे जिह्यात आजच्या घडीला केवळ २.८६ लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. पावसाने सुमारे महिनाभराची दडी मारल्याने विविध पिकातील लागवडीचे अंतर वाढणार असल्याचे चित्र आहे. याचा परिणात पिकांच्या उत्पादन क्षमतेवर होणार आहे.जिल्ह्यात केवळ २६ टक्के पावसाची नोंद ४जून महिन्यापासून पावसाला प्रारंभ झाला असला तरी जिल्ह्यात आजपर्यंत केवळ २५.८२ टक्के पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस अत्यल्प असून आणखी पावसाची गरज आहे. सोमवारी सकाळी व रविवारी रात्री काही भागात आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवणी मिळाली. पाण्याची पातळी वाढण्याकरिता व पिकांची योग्य वाढ होण्याकरिता पावसाची नितांत गरज असल्याचे शेतकरी बोलत आहेत.