शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

गृह विलगीकरणातील बेजबाबदारांकडून कोरोनाचा वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 23:30 IST

जिल्ह्यासह आर्वी तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. येथे कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला, तर लक्षणे नसलेल्यांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे.

ठळक मुद्देअहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर फिरतोय गावभर

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : मार्च महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून, कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच आहेत. त्यामुळे चाचण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. कोरोना रुग्णाची चाचणी केल्यानंतरही त्याला काही त्रास नसल्यास गृह विलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. मात्र, पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्ण शहरात बेजबाबदारपणे कोरोना वाटत फिरत असल्याचे चित्र आर्वी शहरात बघावयास मिळाले. ही परिस्थिती इतरही ठिकाणी असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.जिल्ह्यासह आर्वी तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शासनाच्या निर्देशानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात अँटिजेन आणि आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चाचणीमध्ये वाढ करण्यात आली आहे. येथे कोरोनाची चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला, तर लक्षणे नसलेल्यांना गृहविलगीकरणाचा पर्याय दिला जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाने सरळ घरी जाऊन गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. परंतु, बरेच बेजबाबदार नागरिक अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरही बाजारात बिनधास्त फिरताना दिसतात. मित्रमंडळींसोबत किंवा निकटवर्तीयांची गप्पा गोष्टी करणे, चहा-पान, नास्ता करणे, तसेच बाजारात जाऊन खरेदी करणे, आदी प्रकार पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीत आणखीच भर पडत आहे. कोरोनाचे लसीकरण केल्यानंतर कोरोना होत नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. लसीकरण हे केवळ सुरक्षाकवच आहे. त्यामुळे लसीकरणानंतरही आवश्यक ती काळजी घेण्याची गरज नाही. जिल्ह्यात लसीकरणानंतरही २४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना घरापर्यंत सोडून त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने घेण्याची गरज आहे. 

तिघांना भेटला अन् कोरोना वाटलाएक युवक दुचाकीने उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी आला. पॉझिटिव्ह आल्यानंतर येथून घरी जाताना तो पद्मावती चौकात थांबला. येथे तिघांना भेटला, तर शिवाजी चौकात काही जणांशी चर्चा केली. येथे एक तास घालविल्यानंतर बसस्थानका-वरील चौकशी कक्षात जाऊन चौकशी केली. त्यानंतर घराकडे निघाला.

चहा प्यायला अन् भाजीपालाही घेतलाउपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोनाची चाचणी केल्यानंतर  पॉझिटिव्ह आलेला एक व्यक्ती थेट घरी न जाता चौकात थांबून चहा प्यायला. त्यानंतर मास्क लावून सर्वांशी चर्चा केली. जवळच्याच हातगाडीवरील भाजीपाला व फळ विकत घेतले. येथेच कोरोना वाटला.

या बेजबाबदारपणाला आवर घालणार तरी कोण? आर्वी विभागात विलगीकरण केंद्र नाहीत. शासनाने डिसेंबरपासून ते बंद केले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र, कोणाच्या घरी दोन खोल्या आहेत, तर कोणाच्या घरी चार, तर अनेकांच्या घरी वेगळ राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही. तरीही पॉझिटिव्ह रुग्णाला घरीच राहण्याचा आग्रह केल्या जातो. तो घरी राहून बरे वाटायला लागला की घराबाहेर कोरोना वाटत फिरतो. वयोवृद्ध आणि ज्येष्ठांना उपचारांकरिता रुग्णालयात दाखल केले जाते; पण इतर रुग्णांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्राची मागणी आहे.विलगीकरणात असूनही अनेकजण शहरात बिनधास्त फिरताना दिसतात. एवढेच नाही तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही शहरात मुक्त वावर राहत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या