शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
4
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
5
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
6
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
7
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
8
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
9
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
10
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
11
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
12
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
13
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
14
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
15
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
16
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
17
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
18
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
19
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
20
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं

पुन्हा वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 11, 2015 01:43 IST

जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला.

कारंजा(घाडगे), देवळी : जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला. यात कारंजा व देवळी तालुक्यातील काही भागात आलेल्या या वादळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसासह गारपीट झाल्याने चना, गहू या पिकांसह संत्रा उत्पाकांचा पट्टा असलेल्या या भागात संत्र्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे भिडी नजीक झाड कोसळल्याने यवतमाळ-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा हे झाड तोडल्याने वाहतूक सुरळीत झाली. तर कारंजा येथे शेतात असलेल्या कृषी पंपाच्या पेटीवर वीज कोसळल्याने पेटी जळून खाक झाली. यात शेतकऱ्याचे नुकसान झाले. कारंजा तालुक्यातील धर्ती, भालु, बोरी, सोनेगांव, ठाणेगांव या गावांना वादळी वारा व गारपीटीने झोडपले. सर्वाधिक गारपीट धर्ती येथे झाले. सुमारे एक तासभर सुरू असलेल्या या गारपीटीने व मुसळधार पावसाने गहु, चना, संत्रा, व भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यावेळी झालेल्या गारपीटीत गारांचा मारा इतका जबर होता की अनेकांना घरातील सज्जाचा आश्रय घ्यावा लागला. गारा फावड्याने गोळा कराव्या लागल्या. येथील शेतकरी प्रदीप हिंगवे यांच्या शेतातील संत्र्यासह १० एकरातील चणा एैन संवंगणीच्या वेळी गारपीटीने उद्ध्वस्त झाल. यात त्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला. सदर नुकसानीचा प्राथमिक सर्व्हे येथील तलाठी लताड व कृषी सहाय्यक अरुण कुटे यांनी केला. धर्ती येथील सरपंच अनुसया मानमोडे, उपसरपंच व सदस्यांनी विशेष सभा बोलावत सचिव अर्चना धारपुरे यांनी नुकसानीबाबत ठराव घेवुन गावातील १०० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची पाठ निसर्ग सोडतांना दिसत नाही. अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा एक ना अनेक आसमानी संकटाला समोर जात असलेल्या शेतकऱ्यांना आता गारपीटीने झालेले नुकसान मिळणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसा शासनाचा आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी/प्रतिनिधी)