शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

पुन्हा वादळी पावसाचा तडाखा

By admin | Updated: March 11, 2015 01:43 IST

जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला.

कारंजा(घाडगे), देवळी : जिल्ह्यात गत आवड्यात आलेल्या वादळी पावसाच्या खुना सुकते न सुकते सोमवारी रात्री पुन्हा जिल्ह्यातील काही भागात वादळा पावसाने कहर केला. यात कारंजा व देवळी तालुक्यातील काही भागात आलेल्या या वादळी पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी पावसासह गारपीट झाल्याने चना, गहू या पिकांसह संत्रा उत्पाकांचा पट्टा असलेल्या या भागात संत्र्याचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.देवळी तालुक्यातील विजयगोपाल परिसरात आलेल्या वादळी पावसामुळे भिडी नजीक झाड कोसळल्याने यवतमाळ-वर्धा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रात्री उशिरा हे झाड तोडल्याने वाहतूक सुरळीत झाली. तर कारंजा येथे शेतात असलेल्या कृषी पंपाच्या पेटीवर वीज कोसळल्याने पेटी जळून खाक झाली. यात शेतकऱ्याचे नुकसान झाले. कारंजा तालुक्यातील धर्ती, भालु, बोरी, सोनेगांव, ठाणेगांव या गावांना वादळी वारा व गारपीटीने झोडपले. सर्वाधिक गारपीट धर्ती येथे झाले. सुमारे एक तासभर सुरू असलेल्या या गारपीटीने व मुसळधार पावसाने गहु, चना, संत्रा, व भाजीपाला पिकांचे नुकसान केले. यावेळी झालेल्या गारपीटीत गारांचा मारा इतका जबर होता की अनेकांना घरातील सज्जाचा आश्रय घ्यावा लागला. गारा फावड्याने गोळा कराव्या लागल्या. येथील शेतकरी प्रदीप हिंगवे यांच्या शेतातील संत्र्यासह १० एकरातील चणा एैन संवंगणीच्या वेळी गारपीटीने उद्ध्वस्त झाल. यात त्यांचे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना याचा फटका बसला. सदर नुकसानीचा प्राथमिक सर्व्हे येथील तलाठी लताड व कृषी सहाय्यक अरुण कुटे यांनी केला. धर्ती येथील सरपंच अनुसया मानमोडे, उपसरपंच व सदस्यांनी विशेष सभा बोलावत सचिव अर्चना धारपुरे यांनी नुकसानीबाबत ठराव घेवुन गावातील १०० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले.आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची पाठ निसर्ग सोडतांना दिसत नाही. अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा एक ना अनेक आसमानी संकटाला समोर जात असलेल्या शेतकऱ्यांना आता गारपीटीने झालेले नुकसान मिळणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. तसा शासनाचा आदेश असल्याचे सांगण्यात येत आहे.(शहर प्रतिनिधी/प्रतिनिधी)