शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतरही गोहदा ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा

By admin | Updated: May 27, 2015 01:58 IST

हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही.

बोरधरण : हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही. स्वातंत्र्यानंतरही गावातील नागरिक या सुविधेपासून वंचित आहे. वारंवार मागणी करूनही उपयोग होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यशीलतेवर संताप व्यक्त केल्या जात आहे. येथील ग्रामस्थांची प्रवासाकरिता होणारी पायपीट आजतागायत कायम आहे.गोहदावासियांची बसफेरीची प्रतीक्षाच कायम असली तरी प्रशासकीय स्तरावर अद्याप कोणतीच कार्यवाही होताना दिसत नाही. शिवाय लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार करूनही बस आजवर गावात आली नसल्याने गावकरी संताप व्यक्त करतात. निवडणूक काळात मत मागण्यासाठी आलेले उमेदवार बसफेरी चालु करून देऊ, असे आश्वासन देतात. मात्र निवडणूक आटोपल्यावर याचा विसर पडतो. असा आजवरचा गोहदावासियांचा अनुभव आहे. गोहदा गावाची लोकसंख्या ४०० च्या घरात आहे. येथील ग्रामस्थांना कामाकरिता तसेच आठवडी बाजाराकरिता हिंगणी येथे जावे लागते. मात्र बस नसल्याने पायी किंवा खासगी वाहनाने जावे लागते. आठवडी बाजाराच्या दिवशी खासगी वाहने सुरू असतात. परंतु अन्य दिवस सायकल किंवा खासगी वाहनांखेरीज पर्याय नसतो.विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू झाल्यावर पायपीट करावी लागते. यात विद्यार्थ्यांची कसरतच होते. हिंगणी येथे इयत्ता ५ ते १० वी पर्यंत शाळा आहे. शिक्षणासाठी तेथेच जावे लागते. अशात शाळेला उशीर झाल्यास शिक्षक दंड करतात. घरी जाताना काळोख पडण्यापूर्वी जावे लागते. पायपीट करण्यातच विद्यार्थी थकतात. यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पालक सांगतात. लोकप्रतिनिधींनी या मागणीकडे लक्ष देत गावकऱ्यांची समस्या त्वरीत सोडवावी अशी मागणी होत आहे. परिवहन विभागाने दखल घेण्याची मागणी आहे.