शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

शासन निर्णयानंतरही विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखालीच

By admin | Updated: August 5, 2016 02:02 IST

शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. डिजिटल शिक्षणाकडे सर्वांचा कल आहे. यामुळेच आज सर्वत्र ई-लर्निंगची संकल्पना उदयास येत आहे.

दप्तराच्या वजनाकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष पुलगाव : शिक्षणक्षेत्रात आमुलाग्र बदल होत आहे. डिजिटल शिक्षणाकडे सर्वांचा कल आहे. यामुळेच आज सर्वत्र ई-लर्निंगची संकल्पना उदयास येत आहे. यातूनच शासनाच्यावतीने दप्तरमुक्तीचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय असला तरी यावर जिल्ह्यात कार्यवाही होत नसल्याचे शाळांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर असलेल्या दप्तराच्या ओझ्यावरून दिसत आहे. पुर्वीच्या शिक्षणात इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान, भुगोल, इतिहास इत्यादी विषयाचा अभ्यासक्रमात समावेश होता. त्यामुळे शिक्षकांना शिकवितांना व विद्यार्थ्यांना शिकतांना त्रास होत नव्हता. तसेच दररोजच्या तासिकाप्रमाणे अभ्यासक्रमाचे नियोजन केल्या जात होते. त्यामुळे नेमकी पुस्तके वह्या विद्यार्थी आणत होते. सप्ताहातून एक दिवस गृहपाठ किंवा पाठातंर होत असे. डिसेंबर, जानेवारी पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करून त्यानंतर त्याची उजळणी केली जात होती. आज परिस्थिती बदलल्याने बाजारपेठेत सर्व अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके, मार्गदर्शिका, गृहपाठ, स्वाध्याय, वह्या उपलब्ध झाल्या. त्यामुळे कित्येक संस्थातून विद्यार्थ्यांचे अभ्यास पूर्ण होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा कल, मार्गदर्शक पुस्तिका व शिकवणी वर्गाकडे झाला. त्यामुळे सकाळी शाळेत जाणारा विद्यार्थी दैनंदिन अभ्यासक्रम शाळेत करून शिकवणी वर्गाकडे जावू लागला. त्यामुळे स्वाभाविकच अभ्यासक्रमाची पुस्तके, वह्या गृहपाठ यासह शिकवणी वर्गाच्या वह्यांचे ओझे दप्तारात भरून शाळेत जाऊ लागले. पर्यायाने शासनाने काढलेल्या आदेशाला तिलांजली मिळाली व विद्यार्थी पुस्तक व दप्तराच्या ओझ्याखाली दबू लागला. शिक्षण पद्धत बदलली पूर्वी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून समाजसेवी संस्थाकडून शिक्षण संस्था चालविल्या जात होत्या. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष देण्याकरिता तशा शिक्षकांची नियुक्तीही होत होती. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणही मिळत होते. या शिक्षणाकरिता पाठ्यपुस्तक आणि वर्गपाठ वही इतकेच साधन आणि माध्यम होते; परंतु आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात व अभ्यासक्रमात मोठ्या प्रमाणात बदल झाला. नव्या अभ्यासक्रमावरील विविध प्रकारची मार्गदर्शिका, गृहपाठ अशी पुस्तक व्यवस्था उदयास आली. पुस्तकी ज्ञानाच्या बाजारामुळे विद्यार्थ्यांनी विविध विषयाच्या मार्गदर्शिका स्वाध्याय पुस्तिका वह्या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे वाढु लागले. या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक परिणाम होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.