शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

आराध्य कोंडावार जिल्ह्यातून प्रथम

By admin | Updated: June 4, 2017 00:57 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला.

सीबीएसई दहावीचा निकाल लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवारी जाहीर झाला. यात हिंगणघाट येथील गिरधरदास मोहता भवन्स विद्यालयाचा आराध्य कोंडावार हा जिल्ह्यातून प्रथम आला. त्याने ९९.२ टक्के गुण घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाने दिली. त्याला ४९६ गुण मिळाले. तर भुगाव येथील लॉयड्स विद्यानिकेतच्या वेदांत राठी हा ९८ टक्के गुण घेत द्वितीय आला. त्याला ४९० गुण मिळाल्याची माहिती शाळेने दिली. केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली. यातील चैन्नई विभागाचा निकाल आॅनलाईन पद्धतीने जाहीर झाला. मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारा संचालित जिल्ह्यात एकूण १४ शाळा आहेत. या शाळांतून परीक्षा देणाऱ्या १३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती शाळांतून देण्यात आली. तर पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा भांडारातील केंद्रीय विद्यालयाचा निकाल ९८.०५ टक्के लागला. दहाव्या वर्गाच्या या परीक्षेत सीजीपीए ग्रेड पद्धत असल्याने बऱ्याच शाळांचा त्यांच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढणे कठीण झाल्याचे दिसून आले. यामुळे सायंकाळपर्यंत काही शाळांची निकाल काढण्याची घावपळ सुरूच होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील टर्निंग पॉर्इंट म्हणून या परीक्षेची ओळख आहे. येथूनच विद्यार्थी त्याच्या पुढच्या शैक्षणिक भविष्याचा निर्णय घेत असतो. यामुळे या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे लक्ष होते. शनिवारी अखेर हा निकाल जाहीर झाला.या निकालात सर्वच विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील या अभ्यासक्रमाच्या सर्वच शाळांत विद्यार्थ्यांनी १० सीजीपीए तर अनेक विद्यार्थ्यांनी ९.५ सीजीपीएवर गुण घेतल्याची माहिती शाळांनी दिली आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शाळांचा निकाल उत्तम असल्याचे शाळांकडून सांगण्यात आलेल्या माहितीवरुन दिसत आहे. संकेतस्थळाच्या धिम्या गतीचा फटका सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहाव्या वर्गाचा निकाल शनिवारी सकाळी जाहीर झाला. या परीक्षेचा निकाल सकाळी जाहीर झाला. याची माहिती पूर्वीच जिल्ह्यातील शाळांना देण्यात आली होती. सर्व निकाल एकाच संकेतस्थळावर असल्याने देशभरातून एकाच वेळी गर्दी करण्यात आली. यामुळे संकेतस्थळाची गती धिमी झाल्याने शाळांना निकाल पाहण्याकरिता विलंब होत असल्याचे दिसून आले. याचा फटका शाळांना बसला.