शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू तसेच आर्वी तालुक्यातील एकूण ३४ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या एकूण ६०.७४ किमीच्या मार्गासाठी सदर तिन्ही तालुक्यांमधील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. तर शासनाकडून विविध परवानग्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे लागला होता ब्रेक : सोशल डिस्टन्सिंगचे पालन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर राज्याचा महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गाच्या कामाला ब्रेक लागला. शिवाय सदर मार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या मजुरांचा रोजगार हिरावला होता; पण आता याच महामार्गाच्या कामाला पुन्हा नव्या जोमाने परवानगी घेत सुरूवात करण्यात आली आहे. शिवाय या कामादरम्यान कुठल्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात झाल्याने सुमारे २ हजार २०० मजुरांसह कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे.वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू तसेच आर्वी तालुक्यातील एकूण ३४ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या एकूण ६०.७४ किमीच्या मार्गासाठी सदर तिन्ही तालुक्यांमधील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यात सरळ खरेदीतून ३७९.८८ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. तर शासनाकडून विविध परवानग्या घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वाकांशी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ब्रेक लागला होता. त्यामुळे सुमारे २ हजार २०० मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आणि शासनाचा महत्त्वाकांशी प्रकल्प या दोन्ही बाजू केंद्रस्थानी ठेऊन ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामाला पुन्हा नव्या जोमाने सुरूवात करण्यात आली आहे. या कामादरम्यान सोशल डिस्टन्सिंग यासह कोरोनाचा प्रसार होऊ नये यासंबंधिच्या विविध प्रतिबंधात्मक उपायांचे मजुरांकडून पालन केले जात आहे.विभागांकडून प्रस्ताव आल्यास मिळणार परवानगीकोरोनाच्या ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्याचे विविध विषय आणि कामकाज पुर्ववत येण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाऊले टाकण्यास सुरूवात करण्यात आली आहे. अत्यावश्यक असलेली कामे लॉकडाऊनच्या काळात सुरू करावयाची असल्यास विविध विभागांनी तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा. त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.अधिकाऱ्यांकडून केली जाते वेळोवेळी पाहणीलॉकडाऊनच्या काळात वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाला नियम व अटींचे पालन करून गती दिली जात आहे. असे असले तरी खरोखर नियमांचे पालन होत आहेत काय याची शहानिशा प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन अधिकाºयांकडून केली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या कामादरम्यान कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, अशा सूचनाही कंत्राटदाराला देण्यात आल्या आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात काही नियम व अटींवर समृद्धी महामार्गाच्या कामाला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे २ हजार २०० मजुर व कामगारांना रोजगार मिळाला आहे. ग्रीन झोन असलेल्या वर्धा जिल्ह्याचा आर्थिक व विकासात्मक गाढा पुन्हा पूर्वस्थितीत कसा येईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न होत आहेत.- अशोक लटारे, अपर जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग