शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आठ महिन्यात वन्यप्राण्यांचे ९५ हल्ले

By admin | Updated: January 18, 2017 00:36 IST

अस्वलाच्या हल्ल्याने आष्टी तालुका हादरला असताना वनविभागात गत आठ महिन्यात तब्बल ९५ हल्ले वन्यप्राण्यांनी चढविले आहेत.

२३ जण जखमी, ७२ जनावरांचा फडशा : नुकसानग्रस्तांना आतापर्यंत १.१० कोटींची आर्थिक मदत महेश सायखेडे  वर्धा अस्वलाच्या हल्ल्याने आष्टी तालुका हादरला असताना वनविभागात गत आठ महिन्यात तब्बल ९५ हल्ले वन्यप्राण्यांनी चढविले आहेत. यामध्ये २३ जण जखमी झाले, तर ७२ जनावरांचा फडशा पाडल्याची नोंद आहे. या हल्ल्यात सुदैवाने एकही मनुष्यहानी झाली नाही. असे असले तरी वन्यप्राण्यांचे गावात येत जनावरांसह नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यात वनविभागाला अपयश आल्याचे दिसून येते. जंगजलव्याप्त भागात वन्यप्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत असल्याचे प्रकार घडत असतात. शिवाय याच वन्य प्राण्यांकडून शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या जनावरांचा फडशा पाडल्याचे प्रकार घडत आहेत. अशा शेतकऱ्यांना शासनाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यात येते. शेती आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या जनावर मालकांना गत आठ महिन्यात तब्बल १ कोटी १० लाख ३६ हजार ९२६ रुपयांची मदत दिल्याची नोंद वनविभागात आहे. ही मदत विभागात दाखल झालेल्या एकूण १ हजार ६९९ प्रकरणातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघ, बिबट, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तडस, कोल्हा, हत्ती, मगर व रानकुत्रे यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत किंवा जखमी झाल्यास तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे गाय, बैल, बकरी, म्हैस, मेंढी आदी जखमी व मृत झाल्यास शासनाच्यावतीने शासकीय मदत दिली जाते. त्याचप्रमाणे वन्य प्राण्यांनी विविध शेतपिकांचे नुकसान केल्यासही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. सन २०१५-१६ या वर्षांत ३ हजार ६१० प्रकरणे पात्र ठरली असून २ कोटी १५ लाख ४९ हजार ७८४ रुपयांची मदत नुकसानग्रस्तांना देण्यात आली आहे. दरम्यान, वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या कुटुंबीयांना आठ लाखांची मदत दिली गेली. संत्रा उत्पादकांनाही आर्थिक मदत जिल्ह्यातील काही भागात अनेक शेतकरी संत्रा पिकाचे उत्पन्न घेतात. वन्य प्राण्यांनी मोसंबी व संत्राच्या झाडांचे नुकसान केल्यास बागायदार नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय आर्थिक मदत दिली जाते. शासनाच्या परिपत्रकानुसार नुकसान झालेल्या मोसंबी व संत्राच्या प्रती झाडामागे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला २ हजार ४०० रुपयांची शासकीय आर्थिक मदत केली जात असल्याचे सांगण्यात आले.