शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दुष्काळ निवारणार्थ ९२ ‘निर्माणी’ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:38 IST

यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहिवरा अन् दिंदोडा गावात निवासी शिबिर : जाणून घेतले पाण्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. या दुष्काळ निवारणार्थ ‘निर्माण’च्या कृती शिक्षण उपक्रमांतर्गत सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा गावामध्ये त्रि-दिवसीय निवासी शिबीर पार पडले. यात राज्यभरातील ९२ निमार्णी युवा सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने ‘निर्माण’ हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले राज्यासह देशभरातील युवा विविध सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहेत. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि संघटना आपापल्या परीने यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फाऊंडेश मागील तीन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदान करून राज्यातील बरीच गावे जलसंवर्धनाची कामे करत आहेत. सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा ही दोन गावे स्वत:ला पाणीदार करून घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. गाव पाणीदार व्हावे याच उद्देशाने हिवरा व दिंदोडा या गावात पार पडलेल्या विशेष शिबिरात नागपूर, मुंबई, अकोला, वर्धा, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले डॉक्टर, इंजिनीअर, समाजकार्य, वकील आदी सहभागी झाले होते.तयार केला आराखडाशिबिरार्थी युवांनी गाव, पाण्याचा प्रश्न, त्याची गंभीरता, त्यावरील उपाय, गावातील जीवनमान या गोष्टी अनुभवल्या आणि या पुढे मी शेती आणि पाण्यासाठी काय कृती करू शकतो त्याचा प्रत्येकांनी स्वत:चा आराखडा आखला. दोन्ही गावात एकूण ९४० घनमिटर एवढे काम झाले. ज्यामध्ये १४ लाख ११ हजार किंमतीचे ४७० टँकर पाणी सामावू शकेल. डॉ. उल्हास जाजू यांनी शिबिरार्थांना मार्गदर्शन केले.श्रमदानाने झाली सुरुवातशिबिरासाठा आलेल्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच शिबीराची सुरूवात श्रमदानाने झाली. श्रमदानाव्यतिरिक्त शिबिरात पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेती आणि पाणीप्रश्नांवर काम करणारे मंदार देशपांडे यांनी ‘पाणी आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील पाण्याची समस्या कशी आणि का निर्माण झाली या बाबतीत शिबिरार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.