शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ निवारणार्थ ९२ ‘निर्माणी’ एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 23:38 IST

यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहिवरा अन् दिंदोडा गावात निवासी शिबिर : जाणून घेतले पाण्याचे महत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षीही भीषण दुष्काळ असून राज्य शासनाने २६ जिल्ह्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. यातील ११२ तालुक्यांत गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. या दुष्काळ निवारणार्थ ‘निर्माण’च्या कृती शिक्षण उपक्रमांतर्गत सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा गावामध्ये त्रि-दिवसीय निवासी शिबीर पार पडले. यात राज्यभरातील ९२ निमार्णी युवा सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील युवांना सामाजिक समस्यांविषयी सजग करावे आणि त्यातून परिवर्तन घडवणारे नेतृत्व तयार व्हावे या हेतूने पद्मश्री डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांच्या पुढाकाराने ‘निर्माण’ हा उपक्रम जून २००६ मध्ये सुरू झाला आहे. या उपक्रमात सहभागी झालेले राज्यासह देशभरातील युवा विविध सामाजिक प्रश्नांवर काम करीत आहेत. शासनाबरोबरच विविध सामाजिक संस्था आणि संघटना आपापल्या परीने यावर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुष्काळाला हरवण्यासाठी पाणी फाऊंडेश मागील तीन वर्षांपासून विशेष प्रयत्न करीत आहे. स्पर्धेच्या माध्यमातून श्रमदान करून राज्यातील बरीच गावे जलसंवर्धनाची कामे करत आहेत. सेलू तालुक्यातील हिवरा आणि दिंदोडा ही दोन गावे स्वत:ला पाणीदार करून घेण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. गाव पाणीदार व्हावे याच उद्देशाने हिवरा व दिंदोडा या गावात पार पडलेल्या विशेष शिबिरात नागपूर, मुंबई, अकोला, वर्धा, पुणे, यवतमाळ, औरंगाबाद, चंद्रपूर, वाशिम अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले डॉक्टर, इंजिनीअर, समाजकार्य, वकील आदी सहभागी झाले होते.तयार केला आराखडाशिबिरार्थी युवांनी गाव, पाण्याचा प्रश्न, त्याची गंभीरता, त्यावरील उपाय, गावातील जीवनमान या गोष्टी अनुभवल्या आणि या पुढे मी शेती आणि पाण्यासाठी काय कृती करू शकतो त्याचा प्रत्येकांनी स्वत:चा आराखडा आखला. दोन्ही गावात एकूण ९४० घनमिटर एवढे काम झाले. ज्यामध्ये १४ लाख ११ हजार किंमतीचे ४७० टँकर पाणी सामावू शकेल. डॉ. उल्हास जाजू यांनी शिबिरार्थांना मार्गदर्शन केले.श्रमदानाने झाली सुरुवातशिबिरासाठा आलेल्यांचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. तसेच शिबीराची सुरूवात श्रमदानाने झाली. श्रमदानाव्यतिरिक्त शिबिरात पाणीप्रश्न समजून घेण्यासाठी वर्धा जिल्ह्यात शेती आणि पाणीप्रश्नांवर काम करणारे मंदार देशपांडे यांनी ‘पाणी आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन केले. गावातील पाण्याची समस्या कशी आणि का निर्माण झाली या बाबतीत शिबिरार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.