शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

१४५ पैकी ८२ वॉटर फिल्टर बंद

By admin | Updated: July 13, 2015 02:08 IST

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता काही शाळेत प्रायोगिक तत्त्वावर १४५ जल शुद्धीकरण यंत्र (वॉटर फिल्टर) लावण्यात आले होते.

१३ लाखांचा खर्च वाया : जि.प. विद्यार्थ्यांच्या वाट्याला अशुद्ध पाणी वर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे याकरिता काही शाळेत प्रायोगिक तत्त्वावर १४५ जल शुद्धीकरण यंत्र (वॉटर फिल्टर) लावण्यात आले होते. त्यातील तब्बल ८२ यंत्र बंद असून त्यांची दुरूस्ती करण्याकडेही जि.प.च्या शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जि.प.च्या विद्यार्थ्यांना अशुद्ध पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. सन २००६-०७ मध्ये १२ व्या वित्त आयोनुसार जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेला ‘जलमणी’ असे नामकरण करण्यात आले होते. योजना अंमलात आणण्याकरिता १३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. योजना राबविण्याची जबाबदारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला देण्यात आली होती. यानुसार सदर यंत्रणेने जल शुद्धीकरण यंत्राची खरेदी केली. ती लावण्याकरिता पाण्याची सोय असलेल्या शाळांची निवड करण्यात आली होती. यानुसार जिल्ह्यातील एकूण १४५ शाळेत ही यंत्रे लावण्यात आली. त्याच्या कार्यक्षमतेची माहिती शिक्षकांना देण्यात आली.यानुसार कार्य सुरू असताना अचानक या यंत्रात बिघाड येत असल्याचे समोर आले. यंत्रात बिघाड येत असल्याने त्याची दुरूस्ती करण्याकरिता सर्वांची मागणी असताना ती यंत्रे पुरविणारी कंपनीच बंद झाल्याचे समोर आले. यामुळे ही यंत्र नादुरूस्त झाली. आजच्या घडीला ८२ यंत्र बंद पडली असून त्यांच्या दुरूस्तीची कुठलीही उपाययोजना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्यावतीने होत नसल्याचे दिसून आले आहे. सुरू असलेले ६३ यंत्रही नावालाच सुरू असल्याचे चित्र आहे. जल शुद्धीकरण यंत्र सुरू असलेल्या शाळेतील शिक्षकांनी ते काढून ठेवल्याची माहिती आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत असलेल्या रांजनातून किंवा घरून आणलेल्या पाण्यावरच तहान भागवावी लागत आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्यावतीने हे यंत्र पुरविणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करीत त्याच्याकडून झालेल्या खर्चाची वसुली करण्याचा ठराव घेण्यात आला आहे. त्याची माहिती राज्य शासनाकडे पाठविण्यात आली असून त्यांच्याकडून अद्याप कुठलेही मार्गदर्शन करण्यात आले नाही. त्यामुळे हा प्रश्न गत अनेक वर्षांपासून खितपतच आहे. याकडे जि.प. च्या संबंधित विभागाने लक्ष देत मुलांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यासंदर्भात योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)१२ लाख ९६ हजार ८८० रुपयांत झाली होती खरेदी