शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

पाच ग्रामपंचायतींकरिता ६५ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 22, 2015 02:49 IST

तालुक्यातील पारडी, आजनडोह, जऊरवाडा, नरसींगपूर व कन्नमवारग्राम या पाच गावांची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि. २५) होऊ घातली आहे.

कारंजा (घाडगे) : तालुक्यातील पारडी, आजनडोह, जऊरवाडा, नरसींगपूर व कन्नमवारग्राम या पाच गावांची सार्वत्रिक निवडणूक शनिवारी (दि. २५) होऊ घातली आहे. पाच गाव मिळून ४३ सदस्य निवडून द्यायचे आहे. त्यापैकी १४ सदस्य अविरोध आले आहे. उर्वरीत २९ सदस्यांसाठी ६५ उमेदवार रिंगणात आहेत. या ६५ मध्ये तरुणाचा भरणा अधिक आहे. ज्यांना आरक्षणामुळे उभे राहता आले नाही त्यांनी राजकीय सत्ता हातची जावू नये म्हणून आपल्या नातेवाईक महिलांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. आजनडोह येथील तीन, जऊरवाडा दोन, नरसींगपूर दोन व कन्नमवारग्राम येथील एक सदस्य अविरोध निवडून आल्याची माहिती देण्यात आली आहे. खैरवाडा, मेटहिरजी, माळेगाव (काळी), पालोरा, सिंदीविहिरी, काजळी, दानापूर, बेलगाव या आठ गावामध्ये पोट निवडणूक होऊ घातली आहे. काजळी, दानापूर आणि बेलगाव येथे प्रत्येकी एक जागा निवडून द्यायची होती. या तिन्ही जागा अविरोध निवडून आल्या आहेत. माळेगाव (काळी), पालोरा, सिंदीविहिरी येथे प्रत्येकी एक जागा ना.मा.प्र. प्रवर्गाकरिता निवडून द्यायची होती. येथे एकही योग्य उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही म्हणून जागा रिक्त आहेत. खैरवाडा व मेटहिरजी येथे प्रत्येकी एक जागा निवडून द्यायची आहेत. तेथे दोन-दोन अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक होणार आहे. मतमोजणी २७ जुलैला होवून निकाल त्वरित जाहीर होईल. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार गजेंद्र बालपांडे तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायाब तहसीलदार गणेश बर्वे व व्ही.एन. कातोरे, श्रीवास्तव, ढाकणे काम पाहत आहेत.(तालुका प्रतिनिधी)सरपंच, उपसरपंच पदाकरिता मनसेला भाव गावात त्रिशंकू परिस्थिती : नव्या सरपंचाकडे साऱ्यांच्या नजरा लालसिंह ठाकूर  गिरडयेथील १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक २२ एप्रिल रोजी झाली. यात काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे व अपक्षांनी निवडणूक लढविली होती. यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही. यामुळे गावात त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. यात मनसेकडे असलेल्या दोन जागा निर्णायक ठरणार आहे. यामुळे येथील ग्रामपंचायतीची किल्ली मनसेच्या हाती आली आहे. शिवसेनेचे पाच सदस्य आहेत. भाजपकडे तीन सदस्य तर माजी सरपंच शेख इस्त्राईल यांच्या गटाचे तीन सदस्य आहेत. राष्ट्रीय काँग्रेस व मनसेकडे प्रत्येकी दोन सदस्य आहेत. यामध्ये बहुमत कोणाजवळ नसल्यामुळे आता सरपंच व उपसरपंच करण्यासाठी सत्ता-समिकरणे मांडणे व तडजोडीचे राजकारण गावात सुरू झाले आहे. ३० किंवा ३१ जुलैला ही निवडणूक होणार आहे. सरपंचपद इतरमागासवर्गीय महिलेकरिता राखीव आहे. माजी सरपंचाच्या गटासह सेना व भाजपकडून दावा करण्यात येत आहे. उपसरपंच पदासाठी मनसेकडून दावा करण्यात येत आहे. गत पंचवार्षिकमध्ये सेनेच्या गिरजा कापसे तर भाजपचे उपसरपंच नुतन गिरडे होते. चार वर्षांनंतर अविश्वास येऊन एक वर्षासाठी काँग्रेसच्या संध्या पर्बत व सेनेचे महेश गौर उपसरपंच झाले. या सर्व प्रकारात तीन वर्षे न्यायालयात गेल्याने गावाचा विकास झाला नाही. त्यामुळे जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत न देता उमेदवार आणि त्याच्या पारदर्शकतेवर कौल दिला. मागील पंचवार्षिकमध्ये काँग्रेसच्या आठ सदस्य तर सेनेचे सहा सदस्य व एक जागा भाजपाकडे होती. या निवडणुकीत काँग्रेसला सहा तर सेनेला एका जागेचे नुकसान झाले. या काँग्रेसकडून बंडखोरी करून माजी सरपंच गटाने दोन जागा बळकावल्या आहेत. भाजपाला दोन जागा मिळाल्या तर मनसेने येथे दोन जागा मिळवित खाते उघडले. आता सरपंच पदासाठी ईस्त्राईल यांच्या तीन, भाजप तीन व मनसे दोन मिळून सरपंच व उपसरपंच पदासाठी बैठक झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे सेनेच्या पाच, काँग्रेसच्या दोन व मनसेच्या दोन अशा समिकरणाची तयारी आहे. असे असले तरी सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सत्तेची चाबी मात्र मनसेच्या हाती आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतच्या राजकारणात मनसेची भूमिका निर्णायक ठरणार हे मात्र नक्की आहे.