शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

जिल्ह्यातील ४९३ सौरदिवे भंगार

By admin | Updated: July 10, 2014 23:44 IST

पाण्याचा व कोळशाचा तुटवडा आणि विजनिर्मितीसाठी तोकडी भांडवलव्यवस्था यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य शासनाने गाव तिथे सौर दिवे कल्पना उदयास आणली. त्याची अंमलबजावणीही झाली;

अमोल सोटे - आष्टी (श़)पाण्याचा व कोळशाचा तुटवडा आणि विजनिर्मितीसाठी तोकडी भांडवलव्यवस्था यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य शासनाने गाव तिथे सौर दिवे कल्पना उदयास आणली. त्याची अंमलबजावणीही झाली; मात्र देखभाल व दुरुस्तीअभावी आजघडीला वर्धा जिल्ह्यातील २१७ ग्रामपंचायतीमधील ४९३ सौरदिवे भंगार झाले आहेत. शासनाची लाखो रुपयाने धूळदान झाली आहे. गावकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याने सौरदिवे संकल्पना लगेच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.वर्धा जिल्हा निर्मल, हागणदारीमुक्त, रोजगाराभिमुख, उर्जासंपन्न व्हावा म्हणून शासनाच्या अनेक योजना तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांनी राबविल्या. ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या परिश्रमातून अनेक समस्या मार्गी लागल्या. शासनाच्या पर्यावरण ग्राम संतुलीत समृद्ध प्रकल्प, पाणलोट प्रकल्प, तंटामुक्त गाव समिती पुरस्कार योजनांसह विविध योजनेमधून गावागावात सौरउर्जेवरील दिवे लागवण्यात आले. एका दिव्यासाठी १२ ते १५ हजार रुपये खर्च झाला.जिल्ह्यातील तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास वर्धा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीमध्ये ६० सौरदिवे, समुद्रपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतमध्ये २६ दिवे, हिंगणघाट तालुक्यातील ४० ग्रामपंचायत मध्ये ८३ दिवे, देवळी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतमध्ये ३७ दिवे, सेलू तालुक्यातील २४ ग्रामपंचायतीमध्ये ५२ दिवे, आर्वी तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीमध्ये १०२ सौरदिवे, आष्टी तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीमध्ये ६५ दिवे तर कारंजा तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये ६८ सौरदिवे लावण्यात आले.सन २०१२-१२, २०१२-१३ या वर्षात ८० टक्के तर सन् २०१३-१४ वर्षात २० टक्के सौरदिवे बसविण्यात आले. हे दिवे कंपनीकडून खरेदी केल्यावर ग्रामपंचायतीला पाठविण्यात आले. ग्रामसभेतून वॉर्डनिहाय गरज लक्षात घेत त्यांचे वितरण करण्यात आले. दिवे लावण्याकरिता सिमेंट-काँक्रीटच्या खड्यात पोल उभारण्यात आले. सौरउर्जावर असल्यामुळे या दिव्यांचा फायदा होईल असे गावकऱ्यांना वाटत होते; पण गावातील काही भुरट्या चोरांची नजर सौरउर्जेवरील दिव्यांच्या बॅटरीवर गेली. टप्प्याटप्प्याने बॅटरी व काही उपकरणे चोरी जाण्याच्या घटना घडू लागलया. बॅटऱ्या नसल्याने हे दिवे भंगार बनले आहे. आता दिव्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे जवळपास ९० टक्के सौरदिवे पांढरा हत्ती बनले आहे. या दिव्यांचा प्रकाश ग्रामीण भागातील नागरिकांकरिता सध्या तरी कठीण झाला आहे.