शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

जिल्ह्यातील ३५७ गावांची ‘वॉटर न्युट्रल’कडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:37 IST

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देजलयुक्त शिवार ठरलेय फायद्याचे : जिल्ह्यातील रबीचे क्षेत्रही वाढल्याचा प्रशासनाचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली. निवड केलेल्या गावात जलयुक्त शिवारंतर्गत झालेल्या कामामधून ९५ हजार ४७३ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा लाभ मोठ्या संख्येने शेतकºयांना मिळत आहे.पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रीत जलसाठे निर्माण करणे, अस्तित्त्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांच्या पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे व पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा या योजनेचा उद्देश आहे. २०१५ पासून सुरू करण्यात आलेली ही योजना जिल्ह्यात उत्तम पद्धतीने राबविल्या जात आहे. कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. या सर्व विभागाच्या नियोजनामुळे जलयुक्त शिवार अभियानाची यशस्वी वाटचाल जिल्ह्यात सध्या बघावयास मिळत आहे. २०१५-१६ मध्ये आठ तालुक्यातील २१४ गावांची निवड करण्यात आली. २१४ गावात विविध यंत्रणांमार्फत २,८०८ कामे करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा परिणाम पाहता जिल्ह्यातील २०१५-१६ मध्ये समाविष्ट करण्यात आलेली २१४ गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली आहेत. जिल्ह्यात या वर्षात ४१ हजार २९० हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पावसाच्या खंड काळात पिकांना जलयुक्त शिवार अभियान संजीवनी देणारे ठरले आहे. पावसाचे पाणी व अडवलेले आणि जिरवलेले पाणी यांचा ताळेबंद करण्याची पद्धत जलयुक्त शिवारमध्ये ठरवून दिली आहे. त्यानुसार गावाची सिंचनाची व पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामामुळे पावसाच्या पाण्याचा जमा खर्च व ताळेबंद तयार करणे म्हणजेच वॉटर न्यूट्रल टक्केवारी होय. सन २०१६-१७ मध्ये २१२ गावाची निवड करण्यात आली. या गावात २,३२३ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी २,२२८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून ५४ हजार १८३ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. सदर वर्षात निवडण्यात आलेल्या २१२ गावांपैकी १४३ गावे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली. तर ६१ गावे ८० टक्क्यांच्या वर वाटर न्युट्रल झाली आहेत. गत दोन वर्षांत जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या कामामुळे जिल्ह्यात भाजीपाला पीक, फळपीक लागवड वाढली आहे. शिवाय रबी पिकाच्या क्षेत्रात १५ हजार हेक्टरने वाढ झाली असल्याचे सांगण्यात आले.सन २०१७-१८ मध्ये १३८ गावांची निवड करून १,४०० कामे प्रस्तावित केली आहेत. काही कामे सुरु झाली असून कामे पूर्ण झाल्यावर ३० हजार हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण होणार आहे. गत तीन वर्षात या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ९५ हजार ४७३ हेक्टर संरक्षित सिंचनामुळे शेतीला हक्काचे सिंचन मिळाले.