शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

By admin | Updated: June 30, 2017 01:42 IST

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात.

महाबीजकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : काही कृषी केंद्रांवर अनागोंदीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांकरिता एकूण ३ हजार ५०० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय झाला आहे. याचा लाभ साधारणत: ११ हजार ६६६ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला होता. केवळ कपाशीची लागवड होत होती. या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांकरिता लगबग सुरू केली आहे. शासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या अनुदानित बियाण्यांकरिता काही भागांत कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना अनुदानीत बियाणे देण्यास टाळटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर आर्वी तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे म्हणत काही शेतकऱ्यांनी बियाणे परत केल्याचा प्रकार घडला आहे. बियाणे पुरविण्याची जबादारी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि कृभको यांना देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनसह इतर पिकांचा पेरा सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड तालुका स्तरावरच होत असल्याचे दिसून आले आहे. महाबीजने पुरविले केवळ १,२०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असल्या बियाण्यांची पुर्तता करण्याकरिता महाबीजला २ हजार ८०० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली. असे असताना त्यांच्याकडून केवळ १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. तर राष्ट्रीय बीज निगमला ३५० आणि कृभकोला ३५० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बियाण्यांवर २५ टक्के सूट शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना बियाण्यांवर २५ टक्के सूट देण्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शासकीय बियाणे घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहेजिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार बियाणे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कंपनीकडे बियाण्यांचा तुटवडा नाही. कृषी विभागाने सुचना केल्यास आणखी बियाणे पुरविण्यात येईल. - अजय फुलझले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वर्धा.अनुदानावर बियाणे देण्याच्या सूचना निवड करण्यात आलेल्या कृषी केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. यात कुठे बियाणे देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड नाही. तसे असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात संपर्क साधावा. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.