शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

By admin | Updated: June 30, 2017 01:42 IST

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात.

महाबीजकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : काही कृषी केंद्रांवर अनागोंदीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांकरिता एकूण ३ हजार ५०० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय झाला आहे. याचा लाभ साधारणत: ११ हजार ६६६ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला होता. केवळ कपाशीची लागवड होत होती. या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांकरिता लगबग सुरू केली आहे. शासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या अनुदानित बियाण्यांकरिता काही भागांत कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना अनुदानीत बियाणे देण्यास टाळटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर आर्वी तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे म्हणत काही शेतकऱ्यांनी बियाणे परत केल्याचा प्रकार घडला आहे. बियाणे पुरविण्याची जबादारी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि कृभको यांना देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनसह इतर पिकांचा पेरा सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड तालुका स्तरावरच होत असल्याचे दिसून आले आहे. महाबीजने पुरविले केवळ १,२०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असल्या बियाण्यांची पुर्तता करण्याकरिता महाबीजला २ हजार ८०० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली. असे असताना त्यांच्याकडून केवळ १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. तर राष्ट्रीय बीज निगमला ३५० आणि कृभकोला ३५० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बियाण्यांवर २५ टक्के सूट शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना बियाण्यांवर २५ टक्के सूट देण्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शासकीय बियाणे घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहेजिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार बियाणे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कंपनीकडे बियाण्यांचा तुटवडा नाही. कृषी विभागाने सुचना केल्यास आणखी बियाणे पुरविण्यात येईल. - अजय फुलझले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वर्धा.अनुदानावर बियाणे देण्याच्या सूचना निवड करण्यात आलेल्या कृषी केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. यात कुठे बियाणे देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड नाही. तसे असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात संपर्क साधावा. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.