शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

अनुदानावर ३,५०० क्विंटल सोयाबीन बियाणे

By admin | Updated: June 30, 2017 01:42 IST

शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात.

महाबीजकडून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी : काही कृषी केंद्रांवर अनागोंदीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानंतर्ग अनुदानावर बियाणे देण्यात येतात. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांकरिता एकूण ३ हजार ५०० क्विंटल बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय झाला आहे. याचा लाभ साधारणत: ११ हजार ६६६ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाच्यावतीने करण्यात आला आहे. गत आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना ब्रेक दिला होता. केवळ कपाशीची लागवड होत होती. या आठवड्यात पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांकरिता लगबग सुरू केली आहे. शासनाच्यावतीने देण्यात येत असलेल्या अनुदानित बियाण्यांकरिता काही भागांत कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांना अनुदानीत बियाणे देण्यास टाळटाळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर आर्वी तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याचे म्हणत काही शेतकऱ्यांनी बियाणे परत केल्याचा प्रकार घडला आहे. बियाणे पुरविण्याची जबादारी महाबीज, राष्ट्रीय बीज निगम आणि कृभको यांना देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांकडून सोयाबीनसह इतर पिकांचा पेरा सुरू आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची निवड तालुका स्तरावरच होत असल्याचे दिसून आले आहे. महाबीजने पुरविले केवळ १,२०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येत असल्या बियाण्यांची पुर्तता करण्याकरिता महाबीजला २ हजार ८०० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली. असे असताना त्यांच्याकडून केवळ १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. तर राष्ट्रीय बीज निगमला ३५० आणि कृभकोला ३५० क्विंटल बियाणे पुरविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बियाण्यांवर २५ टक्के सूट शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना बियाण्यांवर २५ टक्के सूट देण्यात असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. शासकीय बियाणे घेण्याकरिता तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी होत असल्याचे दिसून आले आहेजिल्ह्याच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचनेनुसार बियाणे पुरविण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार २०० क्विंटल बियाणे पुरविण्यात आले आहे. कंपनीकडे बियाण्यांचा तुटवडा नाही. कृषी विभागाने सुचना केल्यास आणखी बियाणे पुरविण्यात येईल. - अजय फुलझले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वर्धा.अनुदानावर बियाणे देण्याच्या सूचना निवड करण्यात आलेल्या कृषी केंद्र चालकांना देण्यात आल्या आहेत. यात कुठे बियाणे देण्यास टाळाटाळ होत असल्याची ओरड नाही. तसे असल्यास शेतकऱ्यांनी थेट कृषी कार्यालयात संपर्क साधावा. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.