शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विदेशातून परतलेल्या 33 व्यक्तींची झाली आरटीपीसीआर कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

सध्या हे ३३ व्यक्ती विलगीकरणात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचा वॉच आहे. कोविडचा नवा प्रकार असलेला ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या आतापर्यंत अभ्यासात पुढे आले आहे. राज्यात कोविडच्या या प्रकाराची एन्ट्री झाली असली, तरी वर्धा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. असे असले तरी ओमायक्रॉनला वेळीच ब्रेक लावण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मागील सात दिवसांत विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात तब्बल ३३ व्यक्ती परतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या हे ३३ व्यक्ती विलगीकरणात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचा वॉच आहे. कोविडचा नवा प्रकार असलेला ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या आतापर्यंत अभ्यासात पुढे आले आहे. राज्यात कोविडच्या या प्रकाराची एन्ट्री झाली असली, तरी वर्धा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. असे असले तरी ओमायक्रॉनला वेळीच ब्रेक लावण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून विदेशवारी करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेत त्यांची कोविड टेस्ट करून त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे. विदेशवारी करून परतलेले तब्बल ३३ व्यक्ती जिल्हा प्रशासनाने ट्रेस करून त्यांची कोविड चाचणी केली असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते सध्या विलगीकरणात आहेत.

दिल्ली, मुंबई अन् हैदराबाद होत पोहोचले वर्धाविदेशवारी करून परतलेल्या ३३ व्यक्तींपैकी काही व्यक्ती दिल्ली, मुंबई तर काही हैदराबाद येथील विमानतळावर उतरलेत. त्यानंतर त्यांनी वर्धा जिल्हा गाठल्याचे सांगण्यात आले.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभाग वॉच ठेवून आहे. नागरिकांनीही विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींची माहिती स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला देऊन सहकार्य करावे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

सहा व्यक्तींचे घेतले दुसऱ्यांदा स्वॅब-   विदेशवारी करून परतलेल्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे विलगीकरण कालावधीतील पाचव्या व दहाव्या दिवशी या व्यक्तींचे पुन्हा स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे क्रमप्राप्त आहे. -  शासनाच्या याच सूचनेनुसार विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

विदेशातून परतलेल्यांत पुरुष सर्वाधिक-   विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांची संख्या सध्या ३३ असून यात ११ महिला, तर २२ पुरुषांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. -   या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या