शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

विदेशातून परतलेल्या 33 व्यक्तींची झाली आरटीपीसीआर कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

सध्या हे ३३ व्यक्ती विलगीकरणात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचा वॉच आहे. कोविडचा नवा प्रकार असलेला ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या आतापर्यंत अभ्यासात पुढे आले आहे. राज्यात कोविडच्या या प्रकाराची एन्ट्री झाली असली, तरी वर्धा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. असे असले तरी ओमायक्रॉनला वेळीच ब्रेक लावण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मागील सात दिवसांत विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात तब्बल ३३ व्यक्ती परतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वच व्यक्तींची आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या हे ३३ व्यक्ती विलगीकरणात असून त्यांच्यावर जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागाचा वॉच आहे. कोविडचा नवा प्रकार असलेला ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या आतापर्यंत अभ्यासात पुढे आले आहे. राज्यात कोविडच्या या प्रकाराची एन्ट्री झाली असली, तरी वर्धा जिल्ह्यात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. असे असले तरी ओमायक्रॉनला वेळीच ब्रेक लावण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून खबरदारीचा उपाय म्हणून विदेशवारी करून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती घेत त्यांची कोविड टेस्ट करून त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे. विदेशवारी करून परतलेले तब्बल ३३ व्यक्ती जिल्हा प्रशासनाने ट्रेस करून त्यांची कोविड चाचणी केली असता या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून ते सध्या विलगीकरणात आहेत.

दिल्ली, मुंबई अन् हैदराबाद होत पोहोचले वर्धाविदेशवारी करून परतलेल्या ३३ व्यक्तींपैकी काही व्यक्ती दिल्ली, मुंबई तर काही हैदराबाद येथील विमानतळावर उतरलेत. त्यानंतर त्यांनी वर्धा जिल्हा गाठल्याचे सांगण्यात आले.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या प्रत्येक व्यक्तीवर आरोग्य विभाग वॉच ठेवून आहे. नागरिकांनीही विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या व्यक्तींची माहिती स्वत: पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला देऊन सहकार्य करावे.- डॉ. प्रवीण वेदपाठक, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

सहा व्यक्तींचे घेतले दुसऱ्यांदा स्वॅब-   विदेशवारी करून परतलेल्यांचा कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांप्रमाणे विलगीकरण कालावधीतील पाचव्या व दहाव्या दिवशी या व्यक्तींचे पुन्हा स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणे क्रमप्राप्त आहे. -  शासनाच्या याच सूचनेनुसार विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्या सहा व्यक्तींचे दुसऱ्यांदा स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

विदेशातून परतलेल्यांत पुरुष सर्वाधिक-   विदेशवारी करून वर्धा जिल्ह्यात परतलेल्यांची संख्या सध्या ३३ असून यात ११ महिला, तर २२ पुरुषांचा समावेश आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. -   या सर्व व्यक्तींची आरटीपीसीआर कोविड चाचणी निगेटिव्ह आली असली, तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या