शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

३०० विद्यार्थी ४५० प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: July 9, 2014 23:41 IST

सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अशी चार प्रकारची जवळ-जवळ ३०० विद्यार्थ्यांची

आंजी (मोठी) : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र अशी चार प्रकारची जवळ-जवळ ३०० विद्यार्थ्यांची ४५० प्रमाणपत्रे जानेवारी २०१४ मध्ये स्थानिक आदर्श विद्यालय व गर्ल्स हायस्कूल येथे शिबिर घेऊन काढण्यात आले होती. सहा महिने लोटूनही अद्याप कोणतेही प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने, विद्यार्थ्यांचे अकरावीचे प्रवेश रखडले आहे. परिणामी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ या विद्याथ्यांवर आली आहे.प्राप्त माहितीनुसार, सावंगी-वर्धा स्थित मास्टर कॉलनी येथील महा ई सेवा केंद्र (महाआॅनलाईन) चे संचालक राजेंद्र कांबळे यांनी आदर्श विद्यालय तसेच गर्ल्स हायस्कूल आंजीच्या मुख्याध्यापकांना सुवर्ण जयंती राजस्व अभियानाअंतर्गत ८ वी, ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे जात तसेच इतर प्रमाणपत्र काढण्याकरिता आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे पत्र दाखवून आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र काढावयाचे असतील त्यांच्यासाठी शिबिर घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार जानेवारी २०१४ मध्ये सदर शाळांमध्ये शिबिर घेऊन आदर्श विद्यालय येथे जवळपास ३०० प्रमाणपत्रे तर गर्ल्स हायस्कूल येथे ६६ विद्यार्थिनींची १५७ प्रमाणपत्रे काढण्यात आली. यापैकी केवळ तीन विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून इतर विद्यार्थी अजूनही प्रमाणपत्रांपासून वंचित आहे.सदर प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रती प्रमाणपत्र कही रक्कम अदा करावी लागली. यामध्ये जात प्रमाणपत्र ८० रुपये, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र ८० रुपये, उत्पन्नाचे प्रमाणपत्र ६० रुपये, अधिवास प्रमाणपत्र ६० रुपये अशी आकारणी असताना प्रत्यक्षात मात्र ई महा सेवा केंद्राचे संचालक राजेंद्र कांबळे याने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून जवळपास ७०० ते ८०० रुपये वसूल केलेत. २८० रुपयांमध्ये प्रमाणपत्र द्यायचे तिथे ७०० ते ८०० रुपये प्रमाणपात्रासाठी द्यावे लागले. ज्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले त्यावर महा ई सेवा केंद्राचे संकेतस्थळ उपलब्ध आहे. परंतु या साईटवर उर्वरित विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र उपलब्धच नाही.संचालक राजेंद्र कांबळे, सुगत टेंभरे व राहूल काळबांडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता या तिघांचेही भ्रमणध्वनी बंद दाखवीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांमध्यें संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शाळांमध्ये विचारणा केली असता या सीएससी केंद्राचा भ्रमणध्वनी क्रमांकाव्यतिरिक्त कुठलाही पुरावा शाळेकडे उपलब्ध नाही. तसेच या बाबतीत शिक्षण विभागाचे किंवा महसूल विभागाचे शिबिर घेण्याबाबतचे कुठलेही पत्र शाळेकडे नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या संचालकाने या शाळेंव्यतिरिक्त अशा अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र काढण्याच्या नावावर लुबाडणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही. दहावी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रमाणपत्र नसल्याने प्रवेश देण्यास टाळाटाळ होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)