शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

२१ ग्रा.पं.तील २७ गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: March 11, 2015 01:40 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होते. आर्वी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील सात गावे १ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त घोषित केली आहे.

सुरेंद्र डाफ आर्वीउन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होते. आर्वी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील सात गावे १ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त घोषित केली आहे. तर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमधील २७ गावे संभाव्य पाणी टंचाईसाठी आर्वी पं.स. ने उपाययोजनेसाठी पाठविली आहे. तालुक्यात एकूण ६९ ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यापैकी २८ ग्रामपंचायतीमधील गावात तीव्र पाणी टंचाई सदृश्य स्थितीतील गावावर संभाव्य पाणी अंचाई भासणार आहे. यासाठी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्याद्वारे आर्वी तालुक्यातील बोदड, पाचोड (ठाकूर), बेल्हारा (ता.) जांब पुनर्वसन, तरोडा, खुबगाव, नांदपूर ही गावे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या तीमाहीसाठी टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहे. यावर मार्ग काढण्याकरिता सार्वजनिक विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या पाणी टंचाईवरील उपायासाठी तालुक्यातील ९ सार्वजनिक विहिरींचे अधिग्रहण, सात नवीन हातपंप नळयोजनेंतर्गत विहीर खोलीकरण, पाईप लाईन दुरूस्तीचे दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या उपाययोजनातून पहिल्या टप्प्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.