शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

२१ ग्रा.पं.तील २७ गावे टंचाईग्रस्त

By admin | Updated: March 11, 2015 01:40 IST

उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होते. आर्वी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील सात गावे १ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त घोषित केली आहे.

सुरेंद्र डाफ आर्वीउन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईचे सावट अधिक गडद होते. आर्वी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमधील सात गावे १ ते ३१ जानेवारी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात टंचाईग्रस्त घोषित केली आहे. तर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीमधील २७ गावे संभाव्य पाणी टंचाईसाठी आर्वी पं.स. ने उपाययोजनेसाठी पाठविली आहे. तालुक्यात एकूण ६९ ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यापैकी २८ ग्रामपंचायतीमधील गावात तीव्र पाणी टंचाई सदृश्य स्थितीतील गावावर संभाव्य पाणी अंचाई भासणार आहे. यासाठी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखड्याद्वारे आर्वी तालुक्यातील बोदड, पाचोड (ठाकूर), बेल्हारा (ता.) जांब पुनर्वसन, तरोडा, खुबगाव, नांदपूर ही गावे १ जानेवारी ते ३१ जानेवारी या तीमाहीसाठी टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहे. यावर मार्ग काढण्याकरिता सार्वजनिक विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. या पाणी टंचाईवरील उपायासाठी तालुक्यातील ९ सार्वजनिक विहिरींचे अधिग्रहण, सात नवीन हातपंप नळयोजनेंतर्गत विहीर खोलीकरण, पाईप लाईन दुरूस्तीचे दोन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या उपाययोजनातून पहिल्या टप्प्यातील पाणी टंचाईवर मात करण्यात येणार आहे.