शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

२३६ विहिरींना दुरूस्तीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 12, 2015 01:37 IST

गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे;...

रूपेश मस्के कारंजा (घा़)गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे; पण काम वाटप योग्यरित्या केलेले नाही़ यामुळे २०१५ उजाडला असताना शासकीय मदतीचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही़ अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींची दुरूस्ती शासन करून देत आहे; पण त्याचे नियोजन न केल्याने तालुक्यात २३६ विहिरी अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़अतिवृष्टी, ओला व कोरडा दुष्काळ असे एक ना अनेक आसमानी संकट शेतकऱ्यांवर ओढवत आहे पाहिजे तेव्हा पाऊस शेतकऱ्यांना हुलकावनी देतो आणि गरज नसताना कोपल्यागत कोसळतो़ गत चार वर्षांत अतिवृष्टीमुळे जुन्या खचलेल्या विहरींची संख्या वाढली़ शासनाने २०१२-२०१३ वर्षात खचलेल्या विहरींचे पंचनामे करून विहरी दुरुस्तीचे लक्ष ठेवले होते़ सदर योजनेंतर्गत कृषी सहायक व तलाठी यांनी पंचनामे करून सदर अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवायचा होता़ यात बरीच तफावत असून पात्र डावलून अपात्र शेतकऱ्यांच्या शेताचे पंचमाने केले जात असल्याची ओरड होत आहे़ प्राथमिक पंचनामे करून ग्रामसभेत पात्र-अपात्र शेतकरी निश्चित करायचे होते़ याची माहिती ग्रामस्थांना द्यावयाची होती; पण तसे झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला़ या योजनेतून अनेक गरजुंना वगळले गेले तर ज्यांच्या विहिरी सुस्थितीत आहे, अशांची निवड झाल्याचे शेतकरी सांगतात़ बिहाडी येथील शेतकरी महादेव रेवतकर यांची विहीर खचली आहे; पण त्या विहिरीचा पंचनामाच झाला नाही़ यामुळे ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत़ तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहेत़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत गरजू लाभार्थ्यांची निवड करावी आणि विहीर दुरूस्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे़