शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२३६ विहिरींना दुरूस्तीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 12, 2015 01:37 IST

गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे;...

रूपेश मस्के कारंजा (घा़)गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे; पण काम वाटप योग्यरित्या केलेले नाही़ यामुळे २०१५ उजाडला असताना शासकीय मदतीचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही़ अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींची दुरूस्ती शासन करून देत आहे; पण त्याचे नियोजन न केल्याने तालुक्यात २३६ विहिरी अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़अतिवृष्टी, ओला व कोरडा दुष्काळ असे एक ना अनेक आसमानी संकट शेतकऱ्यांवर ओढवत आहे पाहिजे तेव्हा पाऊस शेतकऱ्यांना हुलकावनी देतो आणि गरज नसताना कोपल्यागत कोसळतो़ गत चार वर्षांत अतिवृष्टीमुळे जुन्या खचलेल्या विहरींची संख्या वाढली़ शासनाने २०१२-२०१३ वर्षात खचलेल्या विहरींचे पंचनामे करून विहरी दुरुस्तीचे लक्ष ठेवले होते़ सदर योजनेंतर्गत कृषी सहायक व तलाठी यांनी पंचनामे करून सदर अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवायचा होता़ यात बरीच तफावत असून पात्र डावलून अपात्र शेतकऱ्यांच्या शेताचे पंचमाने केले जात असल्याची ओरड होत आहे़ प्राथमिक पंचनामे करून ग्रामसभेत पात्र-अपात्र शेतकरी निश्चित करायचे होते़ याची माहिती ग्रामस्थांना द्यावयाची होती; पण तसे झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला़ या योजनेतून अनेक गरजुंना वगळले गेले तर ज्यांच्या विहिरी सुस्थितीत आहे, अशांची निवड झाल्याचे शेतकरी सांगतात़ बिहाडी येथील शेतकरी महादेव रेवतकर यांची विहीर खचली आहे; पण त्या विहिरीचा पंचनामाच झाला नाही़ यामुळे ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत़ तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहेत़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत गरजू लाभार्थ्यांची निवड करावी आणि विहीर दुरूस्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे़