शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

२३६ विहिरींना दुरूस्तीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 12, 2015 01:37 IST

गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे;...

रूपेश मस्के कारंजा (घा़)गत तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या दुष्टचक्रात अडकला आहे़ यामुळेच शासनाने २०१२-१३ च्या अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे; पण काम वाटप योग्यरित्या केलेले नाही़ यामुळे २०१५ उजाडला असताना शासकीय मदतीचा लाभ शेतकऱ्यांना होताना दिसत नाही़ अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरींची दुरूस्ती शासन करून देत आहे; पण त्याचे नियोजन न केल्याने तालुक्यात २३६ विहिरी अद्याप दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत़अतिवृष्टी, ओला व कोरडा दुष्काळ असे एक ना अनेक आसमानी संकट शेतकऱ्यांवर ओढवत आहे पाहिजे तेव्हा पाऊस शेतकऱ्यांना हुलकावनी देतो आणि गरज नसताना कोपल्यागत कोसळतो़ गत चार वर्षांत अतिवृष्टीमुळे जुन्या खचलेल्या विहरींची संख्या वाढली़ शासनाने २०१२-२०१३ वर्षात खचलेल्या विहरींचे पंचनामे करून विहरी दुरुस्तीचे लक्ष ठेवले होते़ सदर योजनेंतर्गत कृषी सहायक व तलाठी यांनी पंचनामे करून सदर अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठवायचा होता़ यात बरीच तफावत असून पात्र डावलून अपात्र शेतकऱ्यांच्या शेताचे पंचमाने केले जात असल्याची ओरड होत आहे़ प्राथमिक पंचनामे करून ग्रामसभेत पात्र-अपात्र शेतकरी निश्चित करायचे होते़ याची माहिती ग्रामस्थांना द्यावयाची होती; पण तसे झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला़ या योजनेतून अनेक गरजुंना वगळले गेले तर ज्यांच्या विहिरी सुस्थितीत आहे, अशांची निवड झाल्याचे शेतकरी सांगतात़ बिहाडी येथील शेतकरी महादेव रेवतकर यांची विहीर खचली आहे; पण त्या विहिरीचा पंचनामाच झाला नाही़ यामुळे ते या योजनेपासून वंचित राहिले आहेत़ तालुक्यात अशी अनेक प्रकरणे आहेत़ संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देत गरजू लाभार्थ्यांची निवड करावी आणि विहीर दुरूस्ती योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे़