शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

२१७ गावांत जलसंधारण

By admin | Updated: January 27, 2015 23:36 IST

पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान

जलयुक्त शिवार अभियान : टंचाईवर कायम मात करण्याचे उद्दिष्टवर्धा : पाणीटंचाईवर मात करण्यासह शेती तसेच गावांच्या गरजेनुसार गावातच पाणी उपलब्ध व्हावे म्हणून गावातील पाणी गावात व शेतातील पाणी शेतातच अडविण्याचे महत्त्वांकाक्षी जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यातील २१७ गावांत राबविले जात आहे़ पालोती येथील नाला खोलीकरण या प्रत्यक्ष कामाने हा उपक्रम सुरू झाला़ यात ४४ लाख रुपयांत जलस्त्रोतांचे बळकटीकरण केले जाणार आहे़सर्वांसाठी पाणी-टंचाईमुक्त महाराष्ट्र या अंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ खासदार रामदास तडस यांच्या हस्ते झाला. यावेळी आ़ पंकज भोयर, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे, जि़प़ सदस्य मीरा वाळके, विरेंद्र रणनवरे, सरपंच ज्योत्स्ना वर्धने, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जि़प़ उपमुख्य कार्यपालन अधिकारी राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते.पिण्याच्या पाण्यासाठी तसेच कोरडवाहू शेतीला सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे सांगताना खा़ तडस यांनी शेतकऱ्यांनी निसर्गावर अवलंबून न राहता जलसंधारणाच्या उपक्रमात सहभागी होऊन वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. आ़ भोयर यांनी जिल्हा पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी गावातील पाण्याचे नियोजन करून गरजेनुसार पाण्याचा वापर केल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. पालोती येथे ८६५ टीसीएम पाण्याची मागणी असताना केवळ ३५० टीसीएम पाणी उपलब्ध आहे. नाला खोलीकरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे़ यामुळे शेतकऱ्यांनीही आपला सहभाग द्यावा, असेही त्यांनी सांगितले.पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देता यावे, यासाठी जलयुक्त शिवार हा कार्यक्रम प्रत्येक गावात राबविण्याची गरज जिल्हाधिकारी सोना यांनी व्यक्त केली़ मार्च २०१६ अखरेपर्यंत २१७ गावांत हा उपक्रम राबवायचा आहे़ ५३ गावांमध्ये जलस्त्रोत बळकटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. हा उपक्रम केवळ शासनाचा नसून जनतेनेही या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले़ यावेळी वाळके, उपसरपंच रवी राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बऱ्हाटे यांनी स्वागत करून जलयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली.(कार्यालय प्रतिनिधी)