शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

२१७ गावांत करणार ११० संघटना महाश्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:27 IST

पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत.

ठळक मुद्देवॉटर कपसाठी संवाद बैठक : प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंच व पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत. याबाबत विकास भवन येथे बुधवारी पार पडलेल्या संवाद बैठकीत पाणीदार गावांचा संकल्प करण्यात आला.जिल्हा प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंद व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो स्मीता पाटील, जलनायक डॉ. सचिन पावडे, पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक मंदार देशपांडे, अशोक बगाडे, माधव कोटस्थाने, डॉ. उल्हास जाजू, वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव, डॉ. संदीप इरटवार उपस्थित होते.मार्गदर्शन करताना स्मीता पाटील यांनी, पाणीदार गाव ते समृद्ध जीवन हा मार्ग जल चळवळीतून पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी लोक-सहभाग व लोकाभिमुख प्रशासनाच्या समन्वयाने शक्य असल्याचे सांगितले. देशपांडे यांनी पाणी फाऊंडेशनची भूमिका व दोन वर्षांतील वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणीदार कामगिरी व्यक्त केली. आगामी वॉटर कप स्पर्धेकरिता सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. बगाडे तथा तालुका समन्वयक अमित दळवी, दीपक तपासे, भूषण कडू, शिल्पा अडसड यांनी आपापल्या तालुक्यातील कामांची माहिती दिली. सामाजिक संघटनाकडून कोणते काम अपेक्षित आहे, यावर चर्चा केली. माधव कोटस्थाने, डॉ. जाजू यासह संघटनातर्फे योगेंद्र फत्तेपुरीया, अनिल फरसोले, सुभाष पाटणकर, नितेश कराळे, मुरलीधर बेलखोडे, दीपक सावरकर, हर्षवर्धन, विशाल घाडगे यांनी सूचना केल्या. गुरव यांनी हेल्मेट वापराचे आवाहन केले. संचालन अमोल गाढवकर यांनी केले तर आभार श्याम भेंडे यांनी मानले. बैठकीला ११० संघटना उपस्थित होत्या.संघटनांचा सक्रीय सहभाग गरजेचाआगामी वॉटर कप स्पर्धेत सर्व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. सेलू, देवळी, आर्वी व कारंजा तालुक्यातील एकूण २१७ गावांत महाश्रमदान, यंत्र पुरवठा, आर्थिक सहकार्य, तांत्रिक मार्गदर्शन, अन्नदान, वस्त्रदान, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय मदत या माध्यमातून संघटनांनी सहकार्य करावे, असे प्रास्ताविकातून डॉ. सचिन पावडे यांनी सुचविले.