शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

२१७ गावांत करणार ११० संघटना महाश्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 22:27 IST

पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत.

ठळक मुद्देवॉटर कपसाठी संवाद बैठक : प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंच व पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटर कप स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांतील २१७ गावे सहभागी झाली आहेत. या गावांना पाणीदार करण्यासाठी तब्बल ११० संघटना महाश्रमदान करण्यास सज्ज आहेत. याबाबत विकास भवन येथे बुधवारी पार पडलेल्या संवाद बैठकीत पाणीदार गावांचा संकल्प करण्यात आला.जिल्हा प्रशासन, वैद्यकीय जनजागृती मंद व पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बैठकीला उपजिल्हाधिकारी रोहयो स्मीता पाटील, जलनायक डॉ. सचिन पावडे, पाणी फाऊंडेशनचे विदर्भ समन्वयक मंदार देशपांडे, अशोक बगाडे, माधव कोटस्थाने, डॉ. उल्हास जाजू, वाहतूक नियंत्रण उपनिरीक्षक दत्तात्रय गुरव, डॉ. संदीप इरटवार उपस्थित होते.मार्गदर्शन करताना स्मीता पाटील यांनी, पाणीदार गाव ते समृद्ध जीवन हा मार्ग जल चळवळीतून पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी लोक-सहभाग व लोकाभिमुख प्रशासनाच्या समन्वयाने शक्य असल्याचे सांगितले. देशपांडे यांनी पाणी फाऊंडेशनची भूमिका व दोन वर्षांतील वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणीदार कामगिरी व्यक्त केली. आगामी वॉटर कप स्पर्धेकरिता सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. बगाडे तथा तालुका समन्वयक अमित दळवी, दीपक तपासे, भूषण कडू, शिल्पा अडसड यांनी आपापल्या तालुक्यातील कामांची माहिती दिली. सामाजिक संघटनाकडून कोणते काम अपेक्षित आहे, यावर चर्चा केली. माधव कोटस्थाने, डॉ. जाजू यासह संघटनातर्फे योगेंद्र फत्तेपुरीया, अनिल फरसोले, सुभाष पाटणकर, नितेश कराळे, मुरलीधर बेलखोडे, दीपक सावरकर, हर्षवर्धन, विशाल घाडगे यांनी सूचना केल्या. गुरव यांनी हेल्मेट वापराचे आवाहन केले. संचालन अमोल गाढवकर यांनी केले तर आभार श्याम भेंडे यांनी मानले. बैठकीला ११० संघटना उपस्थित होत्या.संघटनांचा सक्रीय सहभाग गरजेचाआगामी वॉटर कप स्पर्धेत सर्व सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. सेलू, देवळी, आर्वी व कारंजा तालुक्यातील एकूण २१७ गावांत महाश्रमदान, यंत्र पुरवठा, आर्थिक सहकार्य, तांत्रिक मार्गदर्शन, अन्नदान, वस्त्रदान, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय मदत या माध्यमातून संघटनांनी सहकार्य करावे, असे प्रास्ताविकातून डॉ. सचिन पावडे यांनी सुचविले.