शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

आयटीआय टेकडीवर महाश्रमदानातून वृक्षारोपणाकरिता २००० खड्डे तयार

By admin | Updated: June 5, 2017 01:04 IST

म्हाडा कॉलनी जवळील आयटीआय टेकडी परिसरात महावृक्षारोपणाची आवश्यक पुर्वतयारी म्हणून निसर्ग सेवा समिती, ...

श्रमदानाकरिता एकवटले वर्धेकर : ३०० संवेदनशील व्यक्तींचा सहभाग; जिल्हाधिकाऱ्यांसह शिक्षक हजरलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : म्हाडा कॉलनी जवळील आयटीआय टेकडी परिसरात महावृक्षारोपणाची आवश्यक पुर्वतयारी म्हणून निसर्ग सेवा समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, उपवनसंरक्षक कार्यालयाच्या पुढाकाराने रविवारी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. याला वर्धेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सुमारे ३०० नागरिकांनी स्वत: फावडे, कुदळ आणून सहभाग दिला. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेल्या या महाश्रमदानातून २००० खड्डे खोदण्यात आले. आजच्या महाश्रमदानात महिलांचा बहुसंख्येने सहभाग होता. श्रमदानात जिल्हाधिकारी शैलेश नवाल, खा. रामदास तडस यांनी स्वत: हातात कुदळ, फावडे घेवून खड्डे केले तर वर्धेचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, तहसीलदार राऊत देखील सहभागी झाले. श्रमदानात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, वनविभागातील कर्मचारी, देखील संख्येने सहभागी झाले होते. वर्धा शहराला हिरवेगार करण्यात वर्धेकरांचा हा उत्साह अधोरेखित करणारा ठरला. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व केलेल्या या महाश्रमदानातून तयार करण्यात आलेल्या खड्ड्यांत १ ते ७ जूले दरम्यान काळी माती भरुन, वृक्षारोपण करण्यात येणार आहे. याच परिसरात निसर्ग सेवा समितीद्वारे वर्ष २००० मध्ये ८०० वृक्षरोप लावून त्याचे संगोपण गत १७ वर्षांपासून सुरू आहे. या पुढेही सर्व श्रमदानकर्त्यांची एक प्रकाराने आमची जबाबदारी वाढविली असून पुढील वृक्षारोप लागवड व त्याचे संवर्धन योग्य पद्धतीने होईल असा विश्वास निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी निसर्ग सेवा समितीद्वारे निसर्ग संदेशचे प्रकाशन जिल्हाधिकारी नवाल, खा. तडस व उपवन संरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते आयटीआय टेकडीवर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला १५ रोपटी लावण्यात आली. लावण्यात आलेली रोपटी वृक्षसंरक्षक अनिल पटेल, डॉ. राजेंद्र बोरकर, गोपी मते, डॉ. रंभा सोनाये, इमरान राही, निळकंठ पिसे यांनी दिली. आजच्या महाश्रमदानात हिंदी विश्वविद्यालय, वर्धा बहार नेचर फाउंडेशन, आपले सरकार, आधारवड, श्रमीक पत्रकार संघ, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विद्यार्थी, वैद्यकीय जनजागृती मंच, जनहित मंच, सक्षम वर्धा, युवा सोशल फोरम, वर्धा सोशल फोरम, राष्ट्रसेवा दल वर्धा, उपअधीक्षक पोलीस विभाग निवृत्त पोलीस आॅफिसर्स, कर्मचारी वर्धा जिल्हा, विवेकानंद केंद्र, गुरुदेव सेवा मंडळ, निवृत्त अभियंता संघ, प्राथमिक शिक्षक समिती तसेच अधिकारी कर्मचारी व सामाजिक संघटनासह, संवेदनशील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.