शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१६ व्या शतकातील किल्ल्याची झाली पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची  आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. ते चारही प्रवेशद्वार गाव सीमेवर होते. त्यापैकी तीन प्रवेश द्वार दुर्लक्षी धोरणामुळे जमीनदोस्त झाले आहेत.

ठळक मुद्देपुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष : पत्नीसह राजाने किल्ल्यावरून घेतली होती नदीत उडी

    लाेकमत न्यूज नेटवर्कपवनार : पवन राजाच्या काळात वर्धा जिल्ह्यातील काही भागात काही वास्तू बांधण्यात आल्या. त्यापैकी एक पवनार येथील किल्ला आहे. या किल्ल्याची निर्मिती सोळाव्या शतकात करण्यात आली होती. पण सध्या त्याच्या देखभाल व दुरूस्तीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या ऐतिहासीक धरोहराचे संगोपन करण्यासाठी शासन स्थरावर योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.इ.स. १६०० मध्ये पवन राजाने धाम नदीच्या काठावर किल्ल्याची निर्मिती केली. पुढे येथील लोकवस्तीला पवनार म्हणून ओळख मिळाली. पवन राजाने आपल्या राणीसह किल्ल्यावरून धाम नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची  आख्यायिका आहे. पवन राज्याच्या काळात किल्ल्यासोबत चार प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. ते चारही प्रवेशद्वार गाव सीमेवर होते. त्यापैकी तीन प्रवेश द्वार दुर्लक्षी धोरणामुळे जमीनदोस्त झाले आहेत. तर एका प्रवेश द्वार अखेरची घटीका मोजत आहे. सध्या सेवाग्राम-पवनार विकास आराखड्याअंतर्गत विविध विकास कामे पवनार गावात करण्यात येत आहेत. पण पवन राजाच्या काळातील ऐतिहासीक वास्तूकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, हे विशेष. आश्वासने विरली हवेत किल्ल्याच्या डागडुजीसाठी अनेकदा लोकप्रतिनिधींनी विकास निधी देण्याचे आश्वासने दिले. पण लोकप्रतिनिधींनी आपले आश्वासन पाळले नाही.  १९५८ चे अधिनियम नुसार किल्ल्याला राष्ट्रीय स्मारक जाहीर करण्यात आले. १९ व्या शतकात तेथे हजरत सय्यद मोहम्मद कबीर यांचा दर्गाहची निर्मिती करण्यात आली. ते अनेकांचे श्रद्धास्थान आहे.   सध्या हे स्मारक पुरातत्व विभागाकडे असून सर्व जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

निर्मितीनंतर एकदाही झाली नाही किल्ल्याची डागडुजी

पवनार येथील किल्ल्याची देखभाल तसेच दुरूस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे. पण या विभागाकडून एकदाही डागडुजी करण्यात आली नाही. किल्ल्याचा मागील भाग दिवसेंदिवस खचत असून चार पैकी तीन प्रवेशद्वार नामशेष झाले आहे. तर एक प्रवेशद्वार अखेरची घटीका मोजत आहे.

पवन राजाचा किल्ला हे पवनार गावाचे वैभव आहे. परंतु, आता तो पूर्णत: ढासळला आहे. शासनाच्या पुरातत्व विभागाचे याकडे लक्ष देवून गावाचे वैभव वाचविले पाहिजे. ग्रा. पं. ने अनेकदा पत्रव्यवहार केलेत. - शालिनी आदमने, सरपंच, पवनार.

किल्ला परिसरातील प्राचिन विहिरीवरून राणी स्वत: पाणी भरायची. राज्याने दिलेल्या वचनानुसार अहमद कबीर बाबा यांना किल्ल्यावर आपली कबर बनविण्याची अनुमती दिली, असे सांगितल्या जाते.- बब्बु शेख, दर्गाह, पुजारी, पवनार. 

 

टॅग्स :Fortगड