शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जिल्ह्यात १५.८१ टक्के पेरण्या

By admin | Updated: June 29, 2016 02:04 IST

जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी पेरता झाला. कृषी विभागाच्यावतीने ४ लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे.

सरासरी १२३.९९ मिमी पावसाची नोंद : अनियमित पावसातही कपाशीची लागवड वर्धा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकरी पेरता झाला. कृषी विभागाच्यावतीने ४ लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ६७ हजार ३१७ हेक्टरवर पेरण्या आटोपल्याची नोंद कृषी विभागात झाली आहे. याची टक्केवारी १५.८१ एवढी आहे. यातही सोयाबीन व कपाशीच्या तुलनेत तुरीचे क्षेत्र अधिक असल्याचे दिसत आहे. गत दोन दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस आल्याने पेरणीचे क्षेत्र झपाट्याने वाढत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पावसाबाबत अनिश्चितता व अनियमतेमुळे शेतकरी पेरणी करावी की थांबावे या विचारात असताना जूनच्या अखेरीस जिल्ह्यात पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या. पेरण्या सुरू होताच कृषी विभागाच्यावतीन करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार आतापर्यंत सोयाबीनचा १ हजार ८८७ हेक्टरवर पेरा झाल्याची नोंद करण्यात आली. या तुलनेत कपशीची लागवड करण्यात शेतकरी अग्रेसर असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ८५ हेक्टर कपाशीची लागवड झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशीची मान्सूनपूर्व लागवड केली असल्याचे जिल्ह्यात दिसून आले. पावसाअभावी यातील हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट बळावण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. शिवाय प्रारंभी आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादकांनी पावसाची आशा धरत लागवड केली; मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने या पेरण्या फसल्या. अशातच वाढलेल्या तापमानामुळे अंकुरलेली बियाणे करपली. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. रात्री पाऊस व दिवसा उन्ह या वातावरणामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. दुबार पेऱ्याचा सर्व्हे नाही दमदार पावसाशिवाय पेरण्या करू नये असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले होते. असे असताना बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पावसाच्या अनिश्चिततेमुळे त्यांच्या पेरण्या फसल्या. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली; मात्र जिल्ह्यात किती हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट आहे, याचा कुठलाही सर्व्हे कृषी विभागाकडून करण्यात आला नसल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.