शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारमुळे दीड लाख हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 22:32 IST

जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती.

ठळक मुद्देशेतीला संजीवनी : ८० हजार ९५१ टीएमसी पाणीसाठ्याची उपलब्धी, अभियानात विविध संस्थांचा लागला हातभार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे केवळ सिंचन क्षमताच वाढली नाही तर असंख्य गावांचा पाण्याचा ताळेबंद तयार झाला आहे. वर्धा  जिल्ह्यात मागील तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६८ गावाची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये झालेल्या कामांमधून १ लाख ५१ हजार ५३६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. याचा असंख्य शेतकऱ्यांना लाभ झाला असून शेतीलाही संजीवनी मिळाली आहे.पावसाचे पाणी शिवारातच अडवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या आणि निकामी झालेल्या जलस्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापीत करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आणि पाणी अडविण्याच्या कामात लोकसहभाग वाढविणे हा उद्देश घेऊन २०१५ पासून ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. कृषि विभाग, जलसंधारण (राज्य), जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, वन विभाग, सामाजिक वनीकरण, पाटबंधारे विभाग, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा इत्यादी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. २०१५-१६ मध्ये ८ तालुक्यातील २१४ गावांची या अभियानात निवड करण्यात आली होती.कृषी विभाग, लघुसिंचन जिल्हा परिषद, लघुसिंचन राज्य, भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, वनविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, यशोदा नदी पुनर्जीवन विकास प्रकल्पाअंतर्गत २१४ गावातील २ हजार ९२७ कामे पूर्ण करण्यात आली. दुष्काळावर मात करण्यासाठी सुरु केलेल्या या अभियानामुळे २०१५-१६ मध्ये सर्वच २१४ गावे शंभरटक्के वॉटर न्युट्रल झाली आहे. या कामामुळे जिल्ह्यात या वर्षात ७४ हजार ९१६ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. तसेच ३७ हजार ४५८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या पाण्यामुळे पावसाच्या खंड काळात कोमेजलेल्या पिकांना संजीवनी दिली आहे. सन २०१६-१७ मध्ये २१० गावाची निवड करण्यात आली असून या गावात २ हजार ३८७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. ती सर्व कामे पुर्ण करण्यात आली आहे. यावर ९३ कोटी २१ लाख ५६ हजार रुपये खर्च झाला.भूजल पातळीत झाली वाढया कामांमुळे २७ हजार ६६० टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला.पूर्ण करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारच्या कामामधून ५८ हजार ९५४ हेक्टर संरक्षित सिंचन निर्माण झाले आहे. या वर्षात निवडण्यात आलेल्या २१० गावांपैकी १४३ गांवे शंभर टक्के वाटर न्युट्रल झाली आहेत. वरिष्ठ भुवैज्ञानिक भुजल विकास यंत्रणा यांनी सर्वेक्षण केलेल्या गावामध्ये ०.२०. ते २.६० मीटरने भूजल पातळीमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.सन २०१७-१८ मध्ये जिल्हयातील १४४ गावांची निवड करण्यात आली असून विविध यंत्रणांमार्फत १ हजार ४५९ कामे प्रस्तावित केली आहेत. यापैकी १ हजार ४२५ कामे पूर्ण झालेली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहे. या सर्व कामामुळे १५ हजार ८३३ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध होऊन अंदाजे २८ हजार ६६६ हेक्टर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.मागील तीन वर्षात ८० हजार ९५१ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला असून १ लाख ५१ हजार ५३६ हेक्टर सरंक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवारच्या कामासाठी राज्य शासन सोबतच कमलनयन बजाज फाउंडेशन, टाटा ट्रस्ट, सिध्दिविनायक ट्रस्ट, साईबाबा ट्रस्ट, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा निधी तसेच लोकसहभाग महत्वाचा ठरत आहे. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार