शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्याकरिता १२.४३ कोटी मंजूर

By admin | Updated: December 29, 2016 00:46 IST

जिल्ह्यातील एकूण नऊ ग्रामीण रस्त्याच्या कामाकरिता १२ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहे.

रामदास तडस : २६.२६ कि़मी. लांबीच्या नऊ ग्रामीण रस्त्यांचा विकास वर्धा : जिल्ह्यातील एकूण नऊ ग्रामीण रस्त्याच्या कामाकरिता १२ कोटी ४३ लाख २६ हजार रुपये ग्रामविकास विभागाने मंजूर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन २०१६-१७ या वित्तीय वर्षात बॅच तीन अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा उंचावणार असून तसा निर्णय नुकताच झाल्याची माहिती खा. रामदास तडस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. सदर रस्त्यात आर्वी तालुक्यातील एसएचडब्ल्यू २९५ ते दिघी मार्ग ५.७८ कि़मी, आष्टी तालुक्यातील एनएच ६ ते भिष्णूर मार्ग १.४० कि़मी., कारंजा तालुक्यातील ओडीआर ८७ ते पांजरा मार्ग १.५० कि़मी., व एमडीआर ५ ते खैरी मार्ग ३ कि़मी., देवळी तालुक्यातील बाभुळगाव ते सैदापूर रस्ता ३ कि़मी., हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही ते ढिवरी-पिपरी रस्ता १.५१ कि़मी., सेलू तालुक्यातील एनएच ३६१ कान्हापूर ते वाहितपूर रस्ता २.५३ कि़मी. व एसएच ३६१ ते ब्राम्हणी पर्यंत रस्ता १.१४ कि़मी. वर्धा तालुक्यातील एस एच.३२६ करंजी (भोगे) ते पूजई रस्ता ६.४० कि़मी. अशा २६.२६ कि़मीचे नऊ ग्रामीण रस्ते दुरूस्तीचा कार्यक्रम मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्याला ग्रामीण भागाकरिता चांगल्या दर्जाचे ग्रामीण रस्ते उपलब्ध होणार आहे. सदर प्रशासकीय मान्यता २०१६-१७ या वित्तीय वर्षात टप्पा क्र. ३ अंतर्गत मंजूर झाली आहे. या पुढे देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून ग्रामीण विकासाचा नवा पायंडा महाराष्ट्रात पाडतील. ग्रामीण भागाकरिता जिल्हा नियोजन समिती व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण विकासाकरिता नवीन विकल्प जनतेला उपलब्ध झालेला आहे.(प्रतिनिधी)