शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 18:02 IST

वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी वाहतूकीचे नियम पाळल्यावर दंड भरण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे प्रतिपादन केले.

ठळक मुद्देसिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये : अमित काळेठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर मार्गदर्शन वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे : अमित काळे

ठाणे : वाहतूकीचे नियम नागरिकांनी स्वत:हून पाळले पाहिजे. सिग्लवर एकही वाहतूक पोलीस देण्याची गरज पडू नये. सिग्नल लागल्यावर वाहनचालकांनी स्वत:हून थांबले पाहिजे. मी आधी जाईल यापेक्षा दुस:यांना आधी जायला सांगावे आणि सिग्नल सुटल्यावर ही भावना प्रत्येकात असेल तर वाहतूक कोंडी होणार नाही. तुमचा जीव मूल्यवान आहे, त्याची काळजी तुम्ही स्वत:हूनच घेतली पाहिजे असा सल्ला वाहतूक नियंत्रण विभागाचे उपायुक्त अमित काळे यांनी दिला.      रोटरी क्लब ऑफ ठाणोच्यावतीने सहयोग मंदिर येथे मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठाणे शहर व परिसरातील वाहतूक या विषयावर काळे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सुव्यवस्थित वाहतूक होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. भारतात दरवर्षी दीड लाख अपघाती मृत्यू होत आहे आणि ठाण्यात दरवर्षी 200 ते 250 रस्त्यावरचे अपघातात मृत्यू होतात. दुर्लक्षपणो जलद वाहतूक चालविल्याने, वाहतूकीच्या नियमांचे पालन न केल्यास, सिग्नल तोडल्याने अपघाती मृत्यू होतात. चुकीच्या दिशेने वाहतूक चालविण्याचा प्रकार भिवंडी, कल्याणमध्ये प्रामुख्याने दिसून येतो. वाहतूकीच्या नियमांचे भंग करणा:या वाहनचालकाला पकडल्यास सुरूवातीला ते वाहतूक पोलीसांचे वाद करतात. मग ओळखीच्यांना फोन करण्याचे प्रकार सुरू होतात. आता आमच्या वाहतूक पोलीसांनी कोणाचेही फोन घेणो बंद केले आहे. आता 1क् पैकी 1क् वाहनचालक सिटबेल्ट लावतात तर 1क् पेकी 9 वाहनचालक हेल्मेट घालत असल्याचे दिसून येत आहे. 50 टक्क्यांपेक्षा जास्त अपघात हे इतर रोडवर जास्त होतात. पादचारी चालताना वाहने पाहत नाही, कानात हेडफोन लावून चालतात. 50 टक्के पेक्षा अधिक अपघात हे दुचाकींचे होतात ते ही केवळ हेल्मेट न घातल्याने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यावेळी एखाद्या नियमाची अंमलबजावणी करतो तेव्हा ते नियमांचे पालन करणो आवश्यक असते. दोन टक्के वाहनचालक नियम पाळत नाही 98 टक्के वाहन चालक नियम पाळतात असे चित्र दिसण्याऐवजी 98 टक्के वाहनचालक नियम मोडतात आणि केवळ दोन टक्केच वाहनचालक नियम पाळतात. शासनाने दंडाची रक्कम वाझवली तेव्हा त्या रक्कमेची तुलना रस्त्यांवरील खड्डे, आणि वाहतूक कोंडीशी केली जाऊ लागली. प्रत्यक्षात हे दोन्ही विषय वेगळे आहेत. परंतू वाहनचालकांनी नियम पाळले तर दंड भरण्याची आवश्यकताच भासणार नाही. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याबरोबर वाहतूक नियमांची जागृतीही करत आहेत. विद्यार्थीदशेतच मुलांना वाहतूकीचे नियम आणि ते नियम मोडल्यावर होणा:या दुष्परिणामांची जाणीव करुन दिले तर घरातील वाहन चालविणारी मोठी मंडळी हे नियम निश्चितच पाळतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाणोचे अध्यक्ष अच्युत दामले आणि सेक्रेटरी श्रीकांत तन्ना उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा