शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

प्रश्न- जळगाव शहरातील चौथ्या फलाटावर तिकीट खिडकीचे काम का होत नाही?
गुप्ता- शिवाजीनगरकडे येणार्‍या या फलाटाकडून जळगाव-भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम आहे. त्यासोबतच आता चौथी लाईनदेखील तिकडूनच राहणार असल्याने तेथे तिकीट खिडकी करणे शक्य नाही.

प्रश्न- भुसावळ-नाशिक लोकल का सुरू होऊ शकत नाही?
गुप्ता- नवीन गाडी सुरू करायची म्हटल्यास त्यासाठी परवानगी पासून सर्व गोष्टींचा विचार होतो. शिवाय या मार्गावर इतर गाड्या असल्याने लोकलला उत्पन्नही मिळाले पाहिजे. त्यामुळे ते शक्य नाही.

प्रश्न- जळगावातील पिंप्राळा भागाकडील रेल्वे लाईनला लागून असलेली झोपडप˜ी काढणार का?
गुप्ता- भादली ते जळगाव दरम्यान असलेल्या सर्वच झोपडप˜ीधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेने वेळ दिली होती. तरीदेखील ते काढत नसतील तर ती रेल्वेला काढावीच लागेल. तसे पाहता नवीन लाईन टाकताना हे अतिक्रमण निघणारच आहे.

प्रश्न- उत्पन्न वाढीबाबत काय सांगाल?
गुप्ता- रेल्वेला ५० टक्के प्रवासी आणि ५० टक्के मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. सध्या ३० ते ४० टक्क्याने उत्पन्न घटले आहे. कारण येथून होणारी केळी वाहतूक हळूहळू कमी होत आहे. सिमेंटची वाहतूकही कमी झाली आहे. एकूणच या व्यवसायांमध्ये मंदी असल्याने त्याचा रेल्वे उत्पन्नावर परिणाम होतो.

प्रश्न- अपघाताताबाबत काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गेल्या तीन वर्षात एकही मोठा अपघात झालेला नाही. यासाठी देखभाल व दुरुस्ती मजबूत असली तर अपघात टाळता येतात. अपघातामध्ये गाड्यांच्या अपघातासह आग, कामावर एखादी दुर्घटना घडणे हेदेखील अपघात असतात. मात्र तेही विभागात घडलेले नाही.

प्रश्न- गुन्‘ांची काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गुन्हे कमी करायचे असल्यास सुविधा वाढविणे गरजेचे असते. जसे रेल्वे लाईन व गाड्यांची संख्या वाढल्यास गर्दी कमी होऊन आपोआप चोरी व इतर गुन्हे कमी होतात. त्या दृष्टीने काम केले जात आहे.