शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

प्रश्न- जळगाव शहरातील चौथ्या फलाटावर तिकीट खिडकीचे काम का होत नाही?
गुप्ता- शिवाजीनगरकडे येणार्‍या या फलाटाकडून जळगाव-भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम आहे. त्यासोबतच आता चौथी लाईनदेखील तिकडूनच राहणार असल्याने तेथे तिकीट खिडकी करणे शक्य नाही.

प्रश्न- भुसावळ-नाशिक लोकल का सुरू होऊ शकत नाही?
गुप्ता- नवीन गाडी सुरू करायची म्हटल्यास त्यासाठी परवानगी पासून सर्व गोष्टींचा विचार होतो. शिवाय या मार्गावर इतर गाड्या असल्याने लोकलला उत्पन्नही मिळाले पाहिजे. त्यामुळे ते शक्य नाही.

प्रश्न- जळगावातील पिंप्राळा भागाकडील रेल्वे लाईनला लागून असलेली झोपडप˜ी काढणार का?
गुप्ता- भादली ते जळगाव दरम्यान असलेल्या सर्वच झोपडप˜ीधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेने वेळ दिली होती. तरीदेखील ते काढत नसतील तर ती रेल्वेला काढावीच लागेल. तसे पाहता नवीन लाईन टाकताना हे अतिक्रमण निघणारच आहे.

प्रश्न- उत्पन्न वाढीबाबत काय सांगाल?
गुप्ता- रेल्वेला ५० टक्के प्रवासी आणि ५० टक्के मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. सध्या ३० ते ४० टक्क्याने उत्पन्न घटले आहे. कारण येथून होणारी केळी वाहतूक हळूहळू कमी होत आहे. सिमेंटची वाहतूकही कमी झाली आहे. एकूणच या व्यवसायांमध्ये मंदी असल्याने त्याचा रेल्वे उत्पन्नावर परिणाम होतो.

प्रश्न- अपघाताताबाबत काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गेल्या तीन वर्षात एकही मोठा अपघात झालेला नाही. यासाठी देखभाल व दुरुस्ती मजबूत असली तर अपघात टाळता येतात. अपघातामध्ये गाड्यांच्या अपघातासह आग, कामावर एखादी दुर्घटना घडणे हेदेखील अपघात असतात. मात्र तेही विभागात घडलेले नाही.

प्रश्न- गुन्‘ांची काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गुन्हे कमी करायचे असल्यास सुविधा वाढविणे गरजेचे असते. जसे रेल्वे लाईन व गाड्यांची संख्या वाढल्यास गर्दी कमी होऊन आपोआप चोरी व इतर गुन्हे कमी होतात. त्या दृष्टीने काम केले जात आहे.