शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

प्रश्न- जळगाव शहरातील चौथ्या फलाटावर तिकीट खिडकीचे काम का होत नाही?
गुप्ता- शिवाजीनगरकडे येणार्‍या या फलाटाकडून जळगाव-भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम आहे. त्यासोबतच आता चौथी लाईनदेखील तिकडूनच राहणार असल्याने तेथे तिकीट खिडकी करणे शक्य नाही.

प्रश्न- भुसावळ-नाशिक लोकल का सुरू होऊ शकत नाही?
गुप्ता- नवीन गाडी सुरू करायची म्हटल्यास त्यासाठी परवानगी पासून सर्व गोष्टींचा विचार होतो. शिवाय या मार्गावर इतर गाड्या असल्याने लोकलला उत्पन्नही मिळाले पाहिजे. त्यामुळे ते शक्य नाही.

प्रश्न- जळगावातील पिंप्राळा भागाकडील रेल्वे लाईनला लागून असलेली झोपडप˜ी काढणार का?
गुप्ता- भादली ते जळगाव दरम्यान असलेल्या सर्वच झोपडप˜ीधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेने वेळ दिली होती. तरीदेखील ते काढत नसतील तर ती रेल्वेला काढावीच लागेल. तसे पाहता नवीन लाईन टाकताना हे अतिक्रमण निघणारच आहे.

प्रश्न- उत्पन्न वाढीबाबत काय सांगाल?
गुप्ता- रेल्वेला ५० टक्के प्रवासी आणि ५० टक्के मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. सध्या ३० ते ४० टक्क्याने उत्पन्न घटले आहे. कारण येथून होणारी केळी वाहतूक हळूहळू कमी होत आहे. सिमेंटची वाहतूकही कमी झाली आहे. एकूणच या व्यवसायांमध्ये मंदी असल्याने त्याचा रेल्वे उत्पन्नावर परिणाम होतो.

प्रश्न- अपघाताताबाबत काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गेल्या तीन वर्षात एकही मोठा अपघात झालेला नाही. यासाठी देखभाल व दुरुस्ती मजबूत असली तर अपघात टाळता येतात. अपघातामध्ये गाड्यांच्या अपघातासह आग, कामावर एखादी दुर्घटना घडणे हेदेखील अपघात असतात. मात्र तेही विभागात घडलेले नाही.

प्रश्न- गुन्‘ांची काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गुन्हे कमी करायचे असल्यास सुविधा वाढविणे गरजेचे असते. जसे रेल्वे लाईन व गाड्यांची संख्या वाढल्यास गर्दी कमी होऊन आपोआप चोरी व इतर गुन्हे कमी होतात. त्या दृष्टीने काम केले जात आहे.