शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

जळगाव-भुसावळ दरम्यान चौथी रेल्वे लाईन सुधीरकुमार गुप्ता : दोन वर्षात तिसर्‍या लाईनचे काम पूर्ण

By admin | Updated: May 11, 2016 00:26 IST

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

जळगाव : विभागातील रेल्वे लाईनवरील वाढता ताण पाहता टाकण्यात येत असलेल्या जळगाव-भुसावळ दरम्यानच्या तिसर्‍या रेल्वे लाईनचे काम दोन वर्षात पूर्ण होईल. या सोबतच आता चौथी लाईनदेखील टाकण्यात येणार असल्याचे भुसावळ रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी सांगितले.

प्रश्न- जळगाव शहरातील चौथ्या फलाटावर तिकीट खिडकीचे काम का होत नाही?
गुप्ता- शिवाजीनगरकडे येणार्‍या या फलाटाकडून जळगाव-भुसावळ तिसर्‍या लाईनचे काम आहे. त्यासोबतच आता चौथी लाईनदेखील तिकडूनच राहणार असल्याने तेथे तिकीट खिडकी करणे शक्य नाही.

प्रश्न- भुसावळ-नाशिक लोकल का सुरू होऊ शकत नाही?
गुप्ता- नवीन गाडी सुरू करायची म्हटल्यास त्यासाठी परवानगी पासून सर्व गोष्टींचा विचार होतो. शिवाय या मार्गावर इतर गाड्या असल्याने लोकलला उत्पन्नही मिळाले पाहिजे. त्यामुळे ते शक्य नाही.

प्रश्न- जळगावातील पिंप्राळा भागाकडील रेल्वे लाईनला लागून असलेली झोपडप˜ी काढणार का?
गुप्ता- भादली ते जळगाव दरम्यान असलेल्या सर्वच झोपडप˜ीधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी रेल्वेने वेळ दिली होती. तरीदेखील ते काढत नसतील तर ती रेल्वेला काढावीच लागेल. तसे पाहता नवीन लाईन टाकताना हे अतिक्रमण निघणारच आहे.

प्रश्न- उत्पन्न वाढीबाबत काय सांगाल?
गुप्ता- रेल्वेला ५० टक्के प्रवासी आणि ५० टक्के मालवाहतुकीतून उत्पन्न मिळते. सध्या ३० ते ४० टक्क्याने उत्पन्न घटले आहे. कारण येथून होणारी केळी वाहतूक हळूहळू कमी होत आहे. सिमेंटची वाहतूकही कमी झाली आहे. एकूणच या व्यवसायांमध्ये मंदी असल्याने त्याचा रेल्वे उत्पन्नावर परिणाम होतो.

प्रश्न- अपघाताताबाबत काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गेल्या तीन वर्षात एकही मोठा अपघात झालेला नाही. यासाठी देखभाल व दुरुस्ती मजबूत असली तर अपघात टाळता येतात. अपघातामध्ये गाड्यांच्या अपघातासह आग, कामावर एखादी दुर्घटना घडणे हेदेखील अपघात असतात. मात्र तेही विभागात घडलेले नाही.

प्रश्न- गुन्‘ांची काय स्थिती आहे?
गुप्ता- विभागामध्ये गुन्हे कमी करायचे असल्यास सुविधा वाढविणे गरजेचे असते. जसे रेल्वे लाईन व गाड्यांची संख्या वाढल्यास गर्दी कमी होऊन आपोआप चोरी व इतर गुन्हे कमी होतात. त्या दृष्टीने काम केले जात आहे.