शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

एक तारखेला वेतन मिळविण्यासाठी जि.प. कर्मचाऱ्यांचे आत्मक्लेश उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST

ठाणे : येथील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तिवेतन दरमहा एक तारखेस मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी ...

ठाणे : येथील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना वेतन व निवृत्तिवेतन दरमहा एक तारखेस मिळावे, यासाठी २ ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी जयंती दिनी येथील कर्मचारी मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ एक दिवसाचे आत्मक्लेश-लाक्षणिक उपोषण राज्यस्तरीय आंदोलन छेडणार आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून अनुदान वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून दरमहा १ तारखेस वेतन दिले जात नाही, असा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे; मात्र शासकीय निवृत्तिवेतनधारकांना व कर्मचाऱ्यांना दरमहा एक तारखेस निवृत्तिवेतन व वेतन देण्याचा भेदभाव राज्य शासनाकडून केला जात आहे. यामुळे संतापलेल्या या जि. प. कर्मचाऱ्यांनी आत्मक्लेश उपोषणाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर यांच्या नेतृत्वाखाली या कर्मचाऱ्यांनी या लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे, असे या संघटनेचे संपर्क सचिव रामचंद्र मडके यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमान्वये निवृत्तिवेतन व वेतनासाठी शासनाकडून १०० टक्के अनुदान दिले जाते. यातून वेतन व निवृत्तिवेतन दरमहा १ ते ५ तारखेपर्यंत द्यावे असे शासनाचेच आदेश आहेत. हा खर्च अनिवार्य खर्चात येत असतानाही शासन महसूल कमी जमा होत असल्याचे निमित्त करीत जि.प. कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तांचे वेतन रखडवले जात असल्याचा या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे; मात्र शासकीय कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना महसुलाची अडचण येत नाही का, असा सवाल या कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.