शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
4
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
5
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
6
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
7
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
8
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
9
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
10
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
11
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
12
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
13
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
15
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
16
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
17
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
18
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
19
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
20
Microsoft Layoffs : एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

ठाण्यातील आपला दवाखाना व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST

ठाणे : ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षाने सुरू केलेला आपला दवाखाना प्रकल्प वादात सापडला आहे. ...

ठाणे : ठाण्यातील गोरगरीब नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळावी यासाठी सत्ताधारी पक्षाने सुरू केलेला आपला दवाखाना प्रकल्प वादात सापडला आहे. दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आधारित ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आपला दवाखाना ही संकल्पना राबविली. पन्नास दवाखाने सुरू करण्याचे काम ठेकेदाराला दिले असून, गेल्या दोन वर्षांपासून १५ दवाखानेसुद्धा उघडले नसल्याची माहिती मनसेच्या जनहित व विधि विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी उघडकीस आणली आहे.

ठाणे शहराची २६ लाख लोकांची लोकसंख्या असून, केवळ तीस आरोग्य केंद्र व दोन सरकारी रुग्णालये सोडली, तर प्रशासनाकडून आरोग्य सेवा पुरविणारी अन्य यंत्रणा नाही. कोरोना काळात ठाणे शहरात ५० आपला दवाखाना सुरू झाले असते, तर अनेकांना याचा आधार मिळाला असता; पण प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षांत आपला दवाखाना पूर्णपणे सुरू झालेच नाहीत. विविध झोपडपट्टी असलेल्या परिसरात आपला दवाखाना कार्यरत होणार होते; पण गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकीय घोटाळ्यात अडकलेला हा प्रकल्प कधीच सुरळीत सुरू झाला नाही. ठाण्यामध्ये आपला दवाखाना हे लोकांच्या सेवेसाठी उघडण्यात आले आहेत की राजकीय जाहिरातबाजीसाठी, हे स्पष्ट होत नाही. काही राजकीय मंडळी त्याचा उपयोग आपल्या वैयक्तिक प्रसिद्धीसाठी करीत असल्याचा आरोपही महिंद्रकर यांनी केला आहे. या प्रकल्पाअंतर्गत रुग्णांना मोफत औषधोपचार, तसेच ईसीजी, युरीन टेस्ट, तसेच ब्लड शुगर टेस्टिंग हे मोफत करून दिले जाणार होते. यासाठी महानगरपालिका प्रति रुग्ण दीडशे रुपये ठेकेदाराला देणार होती. दररोज १०० रुग्णांची चाचणी औषधोपचार ठेकेदाराकडून करणे अपेक्षित होते. प्रायोगिक तत्त्वावर दोन दवाखाने सुरू केले, पण काही महिन्यांतच ही संकल्पना फसल्याचे पुढे आले. मात्र, तरीही ठाणे महापालिकेने रेटून आणखी ५० दवाखाने उभारण्याचा घाट घातला. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या दवाखान्याचा कब्जा खासगी प्रयोगशाळेने घेतला आहे. येथे लोकांकडून पैसे घेऊन कोरोनाची चाचणी केली जात असून, या प्रयोगशाळेतील लोकांकडून राजकीय जाहिरातबाजीदेखील सुरू असल्याचा आरोप महिंद्रकर यांनी केला.