शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

यंदा ३४२ उमेदवार चाळिशी पार

By admin | Updated: February 18, 2017 06:43 IST

ठाणे व उल्हासनगर महापालिका निवडणूक रिंगणात ३४२ उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटांतील आहेत. तरुणांनी

ठाणे : ठाणे व उल्हासनगर महापालिका निवडणूक रिंगणात ३४२ उमेदवार हे ४१ ते ५० या वयोगटांतील आहेत. तरुणांनी राजकारणात यावे, यासाठी सर्वत्र प्रचार आणि जनजागृती करण्यात येत असली, तरी सर्वच पक्षांनी उमेदवारी देताना पन्नाशीकडे झुकलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. ४१ ते ५० यामधील उमेदवारांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच ३४.३ टक्के एवढे आहे. उल्हासनगरलाही ४१-५० या वयोगटांतील उमेदवारांची संख्या जास्त आहे.ठाण्यात २१ ते ३० वयोगटांतील उमेदवारांची संख्या १०४ आहे, तर उल्हासनगरमध्ये ही संख्या ७० आहे.दोन्ही महापालिकेत सर्व पक्षांनी नव्या चेहऱ्यांना कमीअधिक प्रमाणात संधी दिली आहे. ठाण्यात भाजपा आणि मनसेने नव्या चेहऱ्यांना अधिक संधी दिली आहे. ठाण्यात ३३ प्रभागांतील १३१ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल ८०५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २१ ते २४ या वयोगटातील २७, २५-३० या वयोगटातील ७७, ३१-४० वयोगटातील २१६, ४१-५० वयोगटातील २२६, ५१ ते ६० वयोगटातील ९६, ६१ ते ७० वयोगटातील १४ आणि ७१-८० वयोगटातील उमेदवारांची संख्या ३ एवढी आहे. दुसरीकडे उल्हासनगरमध्येही ४१ ते ५० या वयोगटांतील उमेदवारांची संख्या ११६ एवढी असून त्याखालोखाल ३१ ते ४० वयोगटातील उमेदवारांची संख्या १११ एवढी आहे. २५ ते ३० वयोगटातील ५७, ५१ ते ६० वयोगटातील ५२, २१ ते ४० वयोगटातील १३, ६१ ते ७० वयोगटातील १२ आणि ७१ ते ८० वयोगटातील उमेदवारांची संख्या २ एवढी आहे. (प्रतिनिधी)