शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

यवतमाळची प्रणाली पर्यावरण संवर्धनासाठी सायकलस्वारीद्वारे पालघरमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:46 IST

डहाणूत साडेसात हजार किमीचा टप्पा गाठला

लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : यवतमाळ जिल्ह्यातील एकवीस वर्षीय प्रणाली चिकटे ही तरुणी सायकलवरून महाराष्ट्र भ्रमंतीला  निघाली असून गावोगावी फिरून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आहे. शनिवार, ३ एप्रिल रोजी नाशिकमार्गे तलासरी आणि त्यानंतर ती डहाणूत दाखल झाली.  तिने  साडेसात हजार किमीचा टप्पा पूर्ण केला आहे.  विविध प्रकल्पांमुळे पालघर जिल्ह्यातील पर्यावरणाचा ऱ्हास  होण्याची भीती असल्याने स्थानिकांनी लढा देण्याचे आवाहन तिने केले.नाशिकमार्गे शनिवारी तलासरी तालुक्यात प्रणाली दाखल झाली. त्यानंतर, बोर्डी गावात तिचे स्वागत स्थानिक पर्यावरण अभ्यासक सूर्यहास चौधरी, कुंदन राऊत यांनी केले. यावेळी तिने साडेसात हजार किमीचा प्रवास पूर्ण केला असून आतापर्यंत कोणताही अडथळा आला नसल्याचे ती म्हणाली. चिखले समुद्रकिनारी तिने स्थानिकांची भेट घेऊन कार्याची माहिती दिली. येथील समृद्ध पर्यावरणाने प्रभावित झाल्याचे ती म्हणाली. पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्प येऊ घातल्याने, येथील पर्यावरणाचा ऱ्हास होण्याआधीच स्थानिकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन तिने केले. या मोहिमेचा प्रारंभ २० ऑक्टोबर २०२० रोजी तिने यवतमाळ येथून केला. त्यानंतर पश्चिम विदर्भ, नंदुरबार, नाशिक आणि पालघर जिल्ह्यातील विविध गावांना ती भेट देणार आहे. ठाणे आणि त्यानंतर कोकणात ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करून घरी परतणार असल्याचे प्रणालीने सांगितले.        प्रणाली ही यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्याच्या पुनवट येथील शेतकरी कुटुंबातील आहे. चिकटे कुटुंबीय शेतीवर उदरनिर्वाह करते. मात्र, अपेक्षेपेक्षा उत्पादन कमी मिळते. त्याला पर्यावरणबदल आणि ऱ्हास जबाबदार असल्याचे बीएसडब्ल्यूचे शिक्षण घेतलेल्या प्रणालीला जाणवले. पर्यावरण संरक्षणाची चळवळ राज्यभर पोहोचविण्यासाठी तिने सायकलने भ्रमंती करण्याचे ठरवले.  खेडोपाड्यांसह शहरी भागात सायकलने पोहोचणे शक्य आहे. यासाठी कोणताही खर्च येत नसून थेट लोकांशी संपर्क साधत पर्यावरणाचा संदेश देता येतो. त्या-त्या ठिकाणचे भौगोलिक ज्ञान व पर्यावरणाच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करता येतो. वायू, ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी सायकल वापरा. प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर, वृक्षारोपण करून झाडे जगवा, परिसर स्वच्छता इ. उद्देश तिने स्पष्ट केले.