शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लेखक, समीक्षकांचे महाराष्ट्रात रॅकेट

By admin | Updated: January 9, 2017 06:49 IST

लेखक, कवींवर आजूबाजूच्या वातावरणाचा, महान व्यक्तिच्या विचारांचा प्रभाव असतो. ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मात्र समीक्षकांवर कसला

 ठाणे : लेखक, कवींवर आजूबाजूच्या वातावरणाचा, महान व्यक्तिच्या विचारांचा प्रभाव असतो. ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मात्र समीक्षकांवर कसला प्रभाव-प्रेरणा असतात, हे तपासण्याची गरज आहे. काही समीक्षक उगाचच एखाद्या लेखक-कवीला मोठे ठरवतात. आणि कालांतराने त्या लेखक-कवीलाही आपण फार मोठे असल्याचे वाटू लागते. अशी कवी, लेखक आणि समीक्षकांची महाराष्ट्रात अनेक रॅकेट आहेत. ती साहित्याच्या दृष्टीने चिंताजनक आहेत, असा आरोप ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी केला. मराठी ग्रंथ संग्रहालयात रविवारी झालेल्या नवव्या ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे शेवटचे सत्र ‘साहित्य निर्मिती आणि समीक्षा : परस्पर पूरक’ या विषयावर रंगले. यावेळी वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यात डॉ. अनंत देशमुख, डॉ. कैलास जोशी यांनीही भूमिका मांडली. समीक्षा आणि साहित्याचा प्रवास परस्परांना पूरक असून तो मानवी जाणीवा निर्माण करणारा आहे. समीक्षा ही मूळ साहित्यातील सौंदर्य वाचकांना दाखवते. लेखक केवळ वास्तवाचेच चित्रण करतो असे नाही; तर त्याच्या लेखणीतून उतरलेल्या काही गोष्टीही वास्तव बनतात, असे मत अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. साहित्य निर्मिती हीच समीक्षेचे मुख्य कारण आहे. साहित्याची निर्मिती झाली नसती, तर समीक्षा तयार झाली नसती. त्यामुळे साहित्य आणि समीक्षा एकमेकांना परस्पर पूरक आहेत का? हा प्रश्नच असू शकत नाही, असे मत कैलास जोशी यांनी मांडले. या संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर कोमसाप आणि मसाप एकत्र असून आपसातील काही तंटे असतील, तर बाजूला ठेवून साहित्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि येऊ, असे आश्वासन अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिले. यावेळी अरूण म्हात्रे, पद्माकर शिरवाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)