शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

लेखक, समीक्षकांचे महाराष्ट्रात रॅकेट

By admin | Updated: January 9, 2017 06:49 IST

लेखक, कवींवर आजूबाजूच्या वातावरणाचा, महान व्यक्तिच्या विचारांचा प्रभाव असतो. ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मात्र समीक्षकांवर कसला

 ठाणे : लेखक, कवींवर आजूबाजूच्या वातावरणाचा, महान व्यक्तिच्या विचारांचा प्रभाव असतो. ते त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. मात्र समीक्षकांवर कसला प्रभाव-प्रेरणा असतात, हे तपासण्याची गरज आहे. काही समीक्षक उगाचच एखाद्या लेखक-कवीला मोठे ठरवतात. आणि कालांतराने त्या लेखक-कवीलाही आपण फार मोठे असल्याचे वाटू लागते. अशी कवी, लेखक आणि समीक्षकांची महाराष्ट्रात अनेक रॅकेट आहेत. ती साहित्याच्या दृष्टीने चिंताजनक आहेत, असा आरोप ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुस्कर यांनी केला. मराठी ग्रंथ संग्रहालयात रविवारी झालेल्या नवव्या ठाणे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे शेवटचे सत्र ‘साहित्य निर्मिती आणि समीक्षा : परस्पर पूरक’ या विषयावर रंगले. यावेळी वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यात डॉ. अनंत देशमुख, डॉ. कैलास जोशी यांनीही भूमिका मांडली. समीक्षा आणि साहित्याचा प्रवास परस्परांना पूरक असून तो मानवी जाणीवा निर्माण करणारा आहे. समीक्षा ही मूळ साहित्यातील सौंदर्य वाचकांना दाखवते. लेखक केवळ वास्तवाचेच चित्रण करतो असे नाही; तर त्याच्या लेखणीतून उतरलेल्या काही गोष्टीही वास्तव बनतात, असे मत अनंत देशमुख यांनी व्यक्त केले. साहित्य निर्मिती हीच समीक्षेचे मुख्य कारण आहे. साहित्याची निर्मिती झाली नसती, तर समीक्षा तयार झाली नसती. त्यामुळे साहित्य आणि समीक्षा एकमेकांना परस्पर पूरक आहेत का? हा प्रश्नच असू शकत नाही, असे मत कैलास जोशी यांनी मांडले. या संमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावर कोमसाप आणि मसाप एकत्र असून आपसातील काही तंटे असतील, तर बाजूला ठेवून साहित्याच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि येऊ, असे आश्वासन अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी दिले. यावेळी अरूण म्हात्रे, पद्माकर शिरवाडकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)