शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

महिलांकडून अधिकारी धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:49 IST

पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सहन करणाºया नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर या ग्रामीण भागांत पाहणी दौरा करण्याकरिता बुधवारी गेलेल्या महापालिकेच्या अभियंत्यांना महिलांनी अक्षरश: धारेवर धरले.

डोंबिवली : पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सहन करणाºया नांदिवली टेकडी, देसलेपाडा, भोपर या ग्रामीण भागांत पाहणी दौरा करण्याकरिता बुधवारी गेलेल्या महापालिकेच्या अभियंत्यांना महिलांनी अक्षरश: धारेवर धरले. आम्हाला पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, महापालिकेची क्षमता नव्हती तर आमची गावे हद्दीत घेतलीच कशाला, अशी सरबत्ती महिलांनी केली.कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांनी नांदिवली टेकडी भागातील पाण्याची समस्या जाणण्यासाठी पाहणी दौरा केला. त्या वेळी महिलांच्या संतापाचा प्रत्यय त्यांना आला. आमच्या परिसरातील प्रत्यक्ष स्थितीचा अहवाल वरिष्ठांना का देत नाहीत, असा सवालही महिलांनी केला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे नियोजन सपशेल कोलमडलेले असून या विभागात कार्यरत असलेले कर्मचारी दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. एमआयडीसीचे अधिकारी सांगतात की, त्यांनी पूर्ण दाबाने पाणी सोडले आहे. मग, पाणी नेमके जाते कुठे? कोणाचे काही साटेलोटे असेल, तर असू द्या, पण आम्हाला न्याय हवाय. पाणी हा मूलभूत अधिकार असून गावे महापालिकेत सामावून घेताना पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला नव्हता का, असे महिलांनी विचारले.अधिकाºयांनी नांदिवली टेकडी परिसरातील व्हॉल्व्हची पाहणी केली, तसेच कुठे नेमके पाणी अडते, त्याची पाहणी करत तसा अहवाल वरिष्ठांकडे देणार असल्याचे सांगितले. त्रस्त नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन सुप्रिया कुलकर्णी या महिलेने केले. शहरात अन्यत्र कुठेही पाण्याची समस्या नसताना आम्हाला का टंचाई भेडसावत आहे, असा सवाल कुलकर्णी यांनी केला.