शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

वसईतून एसटी होणार बंद

By admin | Updated: September 17, 2016 01:52 IST

एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपे , वसईएसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातून आता लाल डबा गायब होण्याच्या मार्गावर आहे.वसई तालुक्यातील अर्नाळा, वसई आणि नालासोपारा एस.टी.आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगोला, लातूर, पुणे, अंमळनेर, संगमनेर, कराड इचलकंरजी आदी लांब पल्ल्याच्या गाड्या १ जुलैपासून बंद केल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धावत असलेल्या या गाड्या दररोज पन्नास हजारांहून अधिक रुपयांचा गल्ला जयवंत होत्या. थेट प्रवाशांपेक्षा आपल्या गंतव्य स्थानापासून हायवे, चिंचोटी , कामणफाटा, ससुनवघर, घोडबंदर, ठाणे, पनवेल,स्वारगेट अशा छोट्या-छोट्या पल्ल्यातील प्रवाशी घेवून हजारोंचा गल्ला जमवत होत्या. लांब पल्ल्यांतील प्रवाशी कमी असल्यामुळे कागदावर त्यांची संख्या कमी दिसत असली तरी छोट्या पल्ल्यांच्या प्रवाशांमुळे एस.टी.ला जास्त कमाई होत होती. त्यानंतरही या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. टप्पा वाहतुकीपेक्षा थेट प्रवासी असतील तर त्या सुरु ठेवण्यात याव्यात.असे एस.टी.ला परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता सांगोला, अंमळनेर, संगमनेर, लातूर, पुणे या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर विभागातून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी यांनी केला आहे. त्यातच नालासोपारा आगारातील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी.महामडळाने घेतला आहे. वसई आगारातून ९ मार्गावर शहर वाहतूक सुरु असून त्यातील गिरीज, रानगाव भुईगाव या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत मार्गावरील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहेत. नालासोपारा एसटी आगारातून सध्या एकूण १६ मार्गांवर शहर बस वाहतूक होत आहे. या सर्व बसेस पश्चिम पट्ट्यात धावणाऱ्या आहेत. आता यातील पाच मार्गावरील बस वाहतूक बंद केली जाणार आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी एस.टी.चा गाशा लवकरच गुंडाळण्यात येण्यार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बस बंद होत असल्यामुळे एस.टी.कामगार धास्तावले असून,तसे झाल्यास पोटाची खळगी भरण्यासाठी या कामगारांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागणार आहे. त्यामुळे एस.ट्या.वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याची चर्चा सोशल मीडियावरून केली जात आहे.