शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वसईतून एसटी होणार बंद

By admin | Updated: September 17, 2016 01:52 IST

एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपे , वसईएसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातून आता लाल डबा गायब होण्याच्या मार्गावर आहे.वसई तालुक्यातील अर्नाळा, वसई आणि नालासोपारा एस.टी.आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगोला, लातूर, पुणे, अंमळनेर, संगमनेर, कराड इचलकंरजी आदी लांब पल्ल्याच्या गाड्या १ जुलैपासून बंद केल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धावत असलेल्या या गाड्या दररोज पन्नास हजारांहून अधिक रुपयांचा गल्ला जयवंत होत्या. थेट प्रवाशांपेक्षा आपल्या गंतव्य स्थानापासून हायवे, चिंचोटी , कामणफाटा, ससुनवघर, घोडबंदर, ठाणे, पनवेल,स्वारगेट अशा छोट्या-छोट्या पल्ल्यातील प्रवाशी घेवून हजारोंचा गल्ला जमवत होत्या. लांब पल्ल्यांतील प्रवाशी कमी असल्यामुळे कागदावर त्यांची संख्या कमी दिसत असली तरी छोट्या पल्ल्यांच्या प्रवाशांमुळे एस.टी.ला जास्त कमाई होत होती. त्यानंतरही या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. टप्पा वाहतुकीपेक्षा थेट प्रवासी असतील तर त्या सुरु ठेवण्यात याव्यात.असे एस.टी.ला परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता सांगोला, अंमळनेर, संगमनेर, लातूर, पुणे या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर विभागातून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी यांनी केला आहे. त्यातच नालासोपारा आगारातील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी.महामडळाने घेतला आहे. वसई आगारातून ९ मार्गावर शहर वाहतूक सुरु असून त्यातील गिरीज, रानगाव भुईगाव या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत मार्गावरील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहेत. नालासोपारा एसटी आगारातून सध्या एकूण १६ मार्गांवर शहर बस वाहतूक होत आहे. या सर्व बसेस पश्चिम पट्ट्यात धावणाऱ्या आहेत. आता यातील पाच मार्गावरील बस वाहतूक बंद केली जाणार आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी एस.टी.चा गाशा लवकरच गुंडाळण्यात येण्यार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बस बंद होत असल्यामुळे एस.टी.कामगार धास्तावले असून,तसे झाल्यास पोटाची खळगी भरण्यासाठी या कामगारांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागणार आहे. त्यामुळे एस.ट्या.वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याची चर्चा सोशल मीडियावरून केली जात आहे.