शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वसईतून एसटी होणार बंद

By admin | Updated: September 17, 2016 01:52 IST

एसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शशी करपे , वसईएसटी महामंडळाने वसई, नालासोपारा आणि अर्नाळा आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द केल्यानंतर आता शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वसई तालुक्यातून आता लाल डबा गायब होण्याच्या मार्गावर आहे.वसई तालुक्यातील अर्नाळा, वसई आणि नालासोपारा एस.टी.आगारातून सुटणाऱ्या कोल्हापूर, रत्नागिरी, सांगोला, लातूर, पुणे, अंमळनेर, संगमनेर, कराड इचलकंरजी आदी लांब पल्ल्याच्या गाड्या १ जुलैपासून बंद केल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धावत असलेल्या या गाड्या दररोज पन्नास हजारांहून अधिक रुपयांचा गल्ला जयवंत होत्या. थेट प्रवाशांपेक्षा आपल्या गंतव्य स्थानापासून हायवे, चिंचोटी , कामणफाटा, ससुनवघर, घोडबंदर, ठाणे, पनवेल,स्वारगेट अशा छोट्या-छोट्या पल्ल्यातील प्रवाशी घेवून हजारोंचा गल्ला जमवत होत्या. लांब पल्ल्यांतील प्रवाशी कमी असल्यामुळे कागदावर त्यांची संख्या कमी दिसत असली तरी छोट्या पल्ल्यांच्या प्रवाशांमुळे एस.टी.ला जास्त कमाई होत होती. त्यानंतरही या गाड्या १ जुलैपासून बंद करण्यात आल्या आहेत. टप्पा वाहतुकीपेक्षा थेट प्रवासी असतील तर त्या सुरु ठेवण्यात याव्यात.असे एस.टी.ला परिवहन मंत्र्यांनी आदेश दिल्यामुळे आता सांगोला, अंमळनेर, संगमनेर, लातूर, पुणे या गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पालघर विभागातून लांब पल्ल्याच्या तब्बल ५४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा आरोप एसटी कामगार संघटनेचे भरत पेंढारी यांनी केला आहे. त्यातच नालासोपारा आगारातील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय एस.टी.महामडळाने घेतला आहे. वसई आगारातून ९ मार्गावर शहर वाहतूक सुरु असून त्यातील गिरीज, रानगाव भुईगाव या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे. त्यानंतर उर्वरीत मार्गावरील वाहतूक टप्याटप्याने बंद करण्यात येणार आहेत. नालासोपारा एसटी आगारातून सध्या एकूण १६ मार्गांवर शहर बस वाहतूक होत आहे. या सर्व बसेस पश्चिम पट्ट्यात धावणाऱ्या आहेत. आता यातील पाच मार्गावरील बस वाहतूक बंद केली जाणार आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेसाठी एस.टी.चा गाशा लवकरच गुंडाळण्यात येण्यार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. बस बंद होत असल्यामुळे एस.टी.कामगार धास्तावले असून,तसे झाल्यास पोटाची खळगी भरण्यासाठी या कामगारांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागणार आहे. त्यामुळे एस.ट्या.वाचवण्यासाठी आंदोलन करण्याची गरज असल्याची चर्चा सोशल मीडियावरून केली जात आहे.