शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिदिन १० टन कचऱ्याचे करणार वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

ठाणे : कचरावेचक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाने सुरू केलेल्या ...

ठाणे : कचरावेचक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाने सुरू केलेल्या प्रकल्प पुनर्निर्माण केंद्राचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी व एका खासगी कंपनीने यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. यामुळे आता प्रतिदिन १० टन कचऱ्याचे वर्गीकरण करणे शक्य होणार आहे.

ओल्या कचऱ्याचे खत व सुका कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठविणे काळाची गरज झाली आहे. ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष व समर्थ भारत व्यासपीठाने कोपरी मल:निस्सारण केंद्र येथे दाेन वर्षांपूर्वी प्रकल्प पुनर्निर्माण केंद्र सुरू केले. लोकसहभागातून नागरिकांच्या घराघरांतील सुका कचरा संकलित करणे व हा कचरा कचरावेचक महिलांकडून वर्गीकरण करून शास्त्रोक्त विल्हेवाट करण्यासाठी पाठविणे अशा स्वरूपाचे काम प्रकल्प पुनर्निमाणअंतर्गत होत आहे. शहरातील ५० हजारांहून अधिक घरांतील कचरा संकलित होत आहे. वाढत्या कचऱ्याच्या अनुषंगाने सुका कचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे यांत्रिक आधुनिकीकरण आवश्यक होते. या केंद्रात वर्गीकरणासाठी कन्व्हेअर बेल्ट, प्लास्टिकचे आकारमान कमी करण्यासाठी बेलिंग मशीन व जवळपास तीन हजार फुटांचे प्रक्रिया केंद्र शनिवारी रोटरीचे ३१४२ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. एम. शिवराज, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष रवी शंकर, प्रकल्पाध्यक्ष प्रदीप नायर, सचिव अनिल रायचूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद‌्घाटन करण्यात आले.

ॲपद्वारे सहभाग शक्य

‘प्रकल्प पुनर्निर्माण’ हा महाराष्ट्रातील सुका कचरा व्यवस्थापनातील एक पथदर्शी प्रकल्प आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक घरांचा कचरा घंटागाडीत न जाता थेट वर्गीकरण केंद्रावर पाठविला जातो. चार महिन्यांत ही संख्या एक लाख घरांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. अत्याधुनिक वर्गीकरण मशीनमुळे आता ते शक्य होणार आहे. ‘रिसायकल अर्थ’ नावाच्या ॲपद्वारे नागरिक या सुका कचरा संकलन मोहिमेत सहभागी होऊ शकतात. प्रकल्पाची क्षमता वाढल्याने जास्तीत जास्त कचरावेचक महिलांना रोजगार देणे व अधिकाधिक कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठविणे शक्य होणार आहे.