शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

प्रतिदिन १० टन कचऱ्याचे करणार वर्गीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

ठाणे : कचरावेचक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाने सुरू केलेल्या ...

ठाणे : कचरावेचक महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व सुक्या कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाने सुरू केलेल्या प्रकल्प पुनर्निर्माण केंद्राचे अत्याधुनिकीकरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी व एका खासगी कंपनीने यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. यामुळे आता प्रतिदिन १० टन कचऱ्याचे वर्गीकरण करणे शक्य होणार आहे.

ओल्या कचऱ्याचे खत व सुका कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठविणे काळाची गरज झाली आहे. ठाणे महापालिका प्रदूषण नियंत्रण कक्ष व समर्थ भारत व्यासपीठाने कोपरी मल:निस्सारण केंद्र येथे दाेन वर्षांपूर्वी प्रकल्प पुनर्निर्माण केंद्र सुरू केले. लोकसहभागातून नागरिकांच्या घराघरांतील सुका कचरा संकलित करणे व हा कचरा कचरावेचक महिलांकडून वर्गीकरण करून शास्त्रोक्त विल्हेवाट करण्यासाठी पाठविणे अशा स्वरूपाचे काम प्रकल्प पुनर्निमाणअंतर्गत होत आहे. शहरातील ५० हजारांहून अधिक घरांतील कचरा संकलित होत आहे. वाढत्या कचऱ्याच्या अनुषंगाने सुका कचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे यांत्रिक आधुनिकीकरण आवश्यक होते. या केंद्रात वर्गीकरणासाठी कन्व्हेअर बेल्ट, प्लास्टिकचे आकारमान कमी करण्यासाठी बेलिंग मशीन व जवळपास तीन हजार फुटांचे प्रक्रिया केंद्र शनिवारी रोटरीचे ३१४२ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बी. एम. शिवराज, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले, रोटरी क्लब ऑफ हिरानंदानीचे अध्यक्ष रवी शंकर, प्रकल्पाध्यक्ष प्रदीप नायर, सचिव अनिल रायचूर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद‌्घाटन करण्यात आले.

ॲपद्वारे सहभाग शक्य

‘प्रकल्प पुनर्निर्माण’ हा महाराष्ट्रातील सुका कचरा व्यवस्थापनातील एक पथदर्शी प्रकल्प आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक घरांचा कचरा घंटागाडीत न जाता थेट वर्गीकरण केंद्रावर पाठविला जातो. चार महिन्यांत ही संख्या एक लाख घरांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. अत्याधुनिक वर्गीकरण मशीनमुळे आता ते शक्य होणार आहे. ‘रिसायकल अर्थ’ नावाच्या ॲपद्वारे नागरिक या सुका कचरा संकलन मोहिमेत सहभागी होऊ शकतात. प्रकल्पाची क्षमता वाढल्याने जास्तीत जास्त कचरावेचक महिलांना रोजगार देणे व अधिकाधिक कचरा शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी पाठविणे शक्य होणार आहे.