शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

एकाकी प्रताप सरनाईक वेगळी चूल मांडून भाजपची झूल पांघरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

ठाणे : आमच्यासारख्या आमदारांचा त्रास कमी करायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, अशा आशयाचे पत्र शिवसेना आमदार प्रताप ...

ठाणे : आमच्यासारख्या आमदारांचा त्रास कमी करायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, अशा आशयाचे पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धाडल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतु, त्यांच्या पत्राची हवाच शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून काढली आहे. यामुळे ते तूर्तास पक्षात एकाकी पडले असून ठाणे शहरात सध्या त्याचे पडसाद उमटले नसले तरी आगामी काळात ते स्वत:ला वाचविण्यासाठी वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. तसे झाले तर शिवसेनेला धक्के सहन करावे लागतील, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.

सरनाईक यांनी पत्र व्हायरल केल्यानंतर त्रास होत असेल तर त्याची तक्रार पंतप्रधान मोदींकडे करता येऊ शकते, असे सांगून छपत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा, असा सूचक इशारा शिवसेनेने मुखपत्रातून त्यांना दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत राहायचे की शिवसेनेशिवाय पुढे जायचे याचा निर्णय सरनाईकांना घ्यावा लागणार आहे.

सरनाईक हे मूळचे राष्ट्रवादीचे शिलेदार व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र, राष्ट्रवादीत महत्त्वाचे पद न मिळाल्याने त्यांनी थेट आव्हाडांना शह देण्यासाठी आपला वेगळा गट निर्माण करून अजित पवारांशी जवळीक साधली. काही वर्षे आव्हाड-सरनाईक यांच्यात पक्षांतर्गत कलगीतुरा सुरू होता, मात्र राष्ट्रवादीत राहून आपल्याला आमदार होता येणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून ओवळा-माजिवड्याची मनसबदारी मिळवली. सरनाईक यांची राजकीय इच्छाशक्ती अफाट असल्याने त्यांना शिवसेनेतूनही बराच विरोधाचा सामना करावा लागला. परंतु, सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय काबीज केला. त्यातही मीरा-भाईंदरमध्ये भाजपमध्ये असलेल्या गीता जैन यांना पक्षात आणले. तसेच मीरा-भाईंदरमधील नरेंद्र मेहता यांची मनसबदारी त्यांनी मोडून वर्चस्व सिद्ध केले. यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु महाविकास आघाडीचे सरकार आल्याने त्यांची ही आशा मावळली. शिवसेनेतून त्यांना मिळालेले मीरा-भाईंदरचे संपर्कप्रमुखपद शेवटच्या क्षणी कापण्यात आले. एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व असताना सरनाईक यांच्या वाट्याला मात्र आमदारकीव्यतिरिक्त फारसे काही लागलेले नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि सरनाईक यांच्यामध्ये फारसे सख्य नसल्याच्या वावड्याही वेळोवेळी उठल्या आहेत. मात्र, हे मतभेद फारसे कधीच उघड झाले नाहीत.

दरम्यान, ज्या काळात शिवसेना अडचणीत होती, त्या वेळेस अर्णब गोस्वामी असेल किंवा कंगना राणावतचे प्रकरण असेल अशी काही प्रकरणे त्यांनी अंगावर घेतली. परंतु आता ते संकटात असताना त्यांना शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारची मदत होत नसल्याचे त्यांच्या पत्रातून स्पष्ट झाले. त्यामुळेच आता ते वेगळी चूल मांडतील, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. सरनाईक यांचा विचार केल्यास त्यांनी आपल्या मतदारसंघात स्वत:चे चांगलेच प्राबल्य निर्माण केले आहे. ठाणे महापालिकेच्या शिवाईनगर, लोकमान्य, सावरकरनगरमध्ये त्यांनी आपल्या स्वत:च्या वर्चस्वावर १५ ते २० नगरसेवक निवडून आणले आहेत. तिकडे मीरा-भाईंदरमध्येही सरनाईक यांचा वरचश्मा दिसून येत आहे. या ठिकाणी २४ नगरसेवक आहेत. मात्र, असे असले तरी सरनाईक यांच्या संपर्कातील हे नगरसेवक किंवा पदाधिकारी हे पूर्वापारचे शिवसैनिक असल्याने ते फुटतील असे चित्र सध्या तरी दिसत नाही. त्यातूनही ३ ते ५ नगरसेवक त्यांच्यासोबत जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. त्यातही त्यांनी वेगळी चूल मांडली तर त्याची चाचपणी आधी सरनाईकांना करावी लागणार आहे. त्यातूनही ते भाजपमध्ये गेलेच तर त्याचा फटका ठाण्यात शिवसेनेला बसू शकतो. लोकमान्य, शिवाईनगर, सावरकरनगर भागातील नगरसेवक कमी होऊन त्याचा फायदा सरनाईकांना किंबहुना भाजपला होऊन दोन आमदारही त्यांचे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरनाईक हे महत्त्वाकांक्षी असल्याने आता शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांप्रमाणे अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढायचे की हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून भाजपला शरण जायचे याचा विचार त्यांना करावा लागणार आहे.