शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
2
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
3
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
4
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवीयन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
5
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
6
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
7
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
8
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
9
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
10
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
11
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
12
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
13
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
16
तुमच्या कराचा पैसा जातोय कुठे? GST मध्ये १५ हजार कोटींचा महाघोटाळा, वाचा काय आहे हे प्रकरण!
17
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
18
Shirish Valsangkar: वळसंगकर रुग्णालयासह 'त्या' चारही डॉक्टरांची बँक खाती तपासा, मनीषा मानेचं पोलिसांना पत्र
19
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
20
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!

ठाणे होईल तेव्हा होईल, पण आधी उद्याने तर होऊ द्या स्मार्ट...

By admin | Updated: April 17, 2017 04:54 IST

हुश्श... परीक्षा संपली एकदाची. आता फक्त मनसोक्त खेळायचे. एप्रिल- मे महिन्यांतील सुटी म्हणजे मुलांसाठी धम्माल आणि मस्ती. अभ्यासाच्या

प्रज्ञा म्हात्रे, ठाणेहुश्श... परीक्षा संपली एकदाची. आता फक्त मनसोक्त खेळायचे. एप्रिल- मे महिन्यांतील सुटी म्हणजे मुलांसाठी धम्माल आणि मस्ती. अभ्यासाच्या कटकटीतून बाहेर पडलेल्या मुलांचा सकाळसंध्याकाळ खेळण्याकडे ओढा असतो. पूर्वी मुलांचा मैदानी खेळांकडे कल होता. आता मैदाने कमी होत असल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे ही मुले मोबाइलवर गेम खेळण्यातच दंग असतात. शहरातील मैदानांबरोबरच उद्यानांचीही दुरवस्था झाली आहे. मुलांच्या मनोरंजनासाठी उभारलेल्या उद्यानांची अवस्था पाहून आता ती देखील लयास जातील का, अशी भीती निर्माण झाली आहे. उद्यानांच्या दुरवस्थेमुळे मुलांनी खेळायचे कुठे, असा प्रश्न समस्त पालकांनी उपस्थित केला आहे. इमारतीत खेळायला जागा शिल्लक राहिलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी जागा तेथे मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो, हे कारण पुढे करून रहिवासी विरोध करतात. पालिका उद्याने बांधते. पण, कालांतराने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते, असा आरोप ठाण्यातील सुज्ञ नागरिकांनी केला आहे. उद्यानांचे नूतनीकरण केले जाईल, असे उद्यान विभागाकडून सांगितले जाते. मात्र, दरवर्षी वाटाण्याच्या अक्षता लावल्या जातात. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे आज मुलांसाठी असलेली उद्याने ही केवळ नावाला राहिली आहेत. ठाणे महापालिका आयुक्त ठाणे शहराला स्मार्ट सिटी करण्याकडे नेत असले, तरी दुसरीकडे या आयुक्तांनी उद्यानांकडेही लक्ष द्यावे, अशी माफक अपेक्षा समस्त ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे. मोठ्या गोष्टी करण्यापेक्षा आधी शहरात असलेल्या करमणुकीच्या, मनोरंजनाच्या गोष्टींकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या या उद्यानांना नवी संजीवनी मिळेल का, असा सवाल आता ठाणेकर विचारत आहेत. या समस्यांकडे पालिका कितपत लक्ष देईल, हाही एक यक्षप्रश्न आहेच. आज ठाणे शहरातील उद्यानांची अवस्था पाहिल्यास मुलांना तेथे खेळण्यासाठी का पाठवावे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. तुटलेली खेळणी, अस्वच्छता, मद्यपी, गर्दुल्ल्यांचा वावर असे चित्र बहुतांश उद्यानांमधील आहे. अशा परिस्थितीत आमची मुले खासकरून मुली सुरक्षित राहतील का, असा सवाल महिलांनी विचारला आहे. पालिका जर आमच्याकडून कर आकारते, तर उद्यानांना अवकळा का आली आहे. मग हे पैसे जातात कुठे? सुरक्षारक्षक नसल्याने या उद्यानांमधून सर्रास अनैतिक व्यवसाय सुरू असतात. आश्चर्य म्हणजे याकडे पालिका प्रशासन आणि नगरसेवकांचे लक्षही जात नाही. मुले, ज्येष्ठ नागरिक हे उद्यानांमध्ये विरंगुळा, स्वच्छ हवा मिळावी, यासाठी येतात. पण, त्यातील काहीच मिळत नाही. नागरिकांना बसण्यासाठी असलेली बाके मोडकळीस आली आहेत. खेळण्या तुटलेल्या अवस्थेत आहेत. झाडे सुकलेली आहेत. मग, अशा परिस्थितीत नागरिकांना फ्रेश कसे वाटणार, हा खरा प्रश्न आहे. निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी पुळका येतो. निवडणुका झाल्या की, नेते आश्वासने विसरून जातात. ती उद्यानांमधील धुळीसोबत हवेत विरून जातात.