शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

२७ गावे केडीएमसीतच की वगळणार?, निर्णयासाठी सहा महिनेच हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 05:43 IST

केडीएमसीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत.

कल्याण : केडीएमसीच्या आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत एक प्रभाग, एक नगरसेवक याच पद्धतीने प्रक्रिया पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर २७ गावे महापालिकेत राहणार की वगळली जाणार या चर्चांनाही आता उधाण आले आहे. एकीकडे गावे वगळण्यासाठी स्थानिकांचा दबाव वाढत असताना गाव महापालिकेतून वगळायची असतील तर यासंदर्भात राज्य सरकारला होणाºया निवडणुकीपूर्वी सहा महिने आधी निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा २७ गावांसह महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडेल,अशी माहिती जाणकारांनी दिली.केडीएमसीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुका पॅनलप्रमाणे झालेल्या नाहीत. त्यामुळे २०२० आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक पॅनल पद्धतीनेच होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब झाले. पण, या निवडणुका पार पडताना २७ गावांसह त्याची प्रक्रिया होईल का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. महापालिकेची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसारच होणार आहे. केडीएमसी परिक्षेत्राची लोकसंख्या त्या जनगणनेनुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी ती लोकसंख्या आजच्या घडीला १४ लाखांच्या आसपास गेली आहे. यात २७ गावांमधील लोकसंख्या दोन लाख ७१ हजार ४३५ इतकी आहे. २७ गावे केडीएमसीतून वगळा अशी मागणी सातत्याने होत आहे. यासाठी साडेचारवर्षे स्थानिक नागरिकांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी अशी मागणी केली आहे. जर गावे वगळली तर महापालिकेचे क्षेत्रही बदलणार आहे. त्यामुळे प्रभागांची रचनाही नव्याने होईल. लोकसंख्येचे प्रमाणही बदलेल. २७ गावे केडीएमसीत समाविष्ट करण्यासंदर्भात राज्य सरकारने १४ मे २०१५ ला अध्यादेश जारी केला होता. त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्या होत्या. महापालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत १० नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे आता जर २७ गावे वगळण्याबाबत निर्णय घ्यायचा असेल तर तो सहा महिने आधी म्हणजेच एप्रिलच्या अखेरपर्यंत राज्य सरकारने घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आहे त्याच परिस्थितीतच निवडणुका होतील. त्यामुळे गावे वगळण्याच्या मुद्यावर ठाम असलेल्या संघटना आणि महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांचीही पुढील दिशा काय ठरते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार२७ गावे महापालिकेतून वगळली गेलीच पाहिजे, या गावांची नगरपालिका व्हावी ही स्थानिक नागरीकांची मागणी आहे. महापालिका का नको आणि नगरपालिका का हवी याबाबतचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. महापालिका निवडणुका आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होत आहेत. परंतु तत्पूर्वी २७ गावे वगळण्याबाबत ठाम निर्णय सरकारने घ्यावा, अशी आमचीही आग्रही मागणी आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाणार असल्याचे २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका