शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
2
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
3
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
4
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
5
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
6
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
7
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
8
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
9
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
10
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
11
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
12
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
13
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
14
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
15
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
16
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
17
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
18
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
19
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
20
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’ची अतिरिक्त जमीन सरकारला परत का केली गेली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीला सरकारने अतिरिक्त जागा दिली होती. मात्र, कंपनीतील उत्पादन प्रक्रिया दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ...

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीला सरकारने अतिरिक्त जागा दिली होती. मात्र, कंपनीतील उत्पादन प्रक्रिया दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शहरी जमीन कमाल धारणा अधिनियमानुसार सरकारला परत न करता परस्पर कंपनीचा लिलाव कसा झाला? असा सवाल ऑल इंडिया ट्रेड युनियन महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी केला आहे.

एनआरसी कंपनीला ३४५ एकर अतिरिक्त जमीन ही कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत औद्योगिक वापरासाठी दिली होती. १२५ एकर जागेवर प्रत्यक्षात कंपनीची इमारत उभी होती. कंपनीत २००९ मध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर कंपनीने रहेजा बिल्डरशी १०३ एकर जमीन विक्रीचा व्यवहार केला. या व्यवहाराच्या बदल्यात ‘रहेजा’ने २६१ कोटी रुपये ३० दिवसांमध्ये सरकार दरबारी भरणे अपेक्षित होते. मात्र, ३० दिवसांत ‘रहेजा’ने ही रक्कम भरली नसल्याने जमिनीच्या खरेदीत ‘रहेजा’ला स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ‘रहेजा’ने रक्कम न भरल्याने हा व्यवहार अनधिकृत असल्याची नोंद सरकार दरबारी आहे. शिवाय एनआरसी कंपनीकडे जमीन महसुलाच्या थकबाकीपोटी ६ कोटी ३४ लाख रुपयांचा बोजा आहे, असा अहवाल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नगरविकास खात्यास १५ जून २०२१ ला पाठविला आहे. त्यामुळे नगरविकास खाते या अहवालानुसार पुढे काय कार्यवाही करते, याकडे युनियनसह कामगारांचे लक्ष लागले आहे.

‘कामगारांसाठी घरकूल योजना राबवा’

ऑल इंडिया ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष चौधरी यांनी यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केल्यावर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी हा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. चौधरी यांनी राज्य सरकारने ‘एनआरसी’ची अतिरिक्त जमीन ताब्यात घेऊन त्या जागेवर कंपनीच्या कामगारांसाठी घरकूल योजना राबवावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

------------------------------