शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

‘एनआरसी’ची अतिरिक्त जमीन सरकारला परत का केली गेली नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:28 IST

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीला सरकारने अतिरिक्त जागा दिली होती. मात्र, कंपनीतील उत्पादन प्रक्रिया दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे ...

कल्याण : आंबिवलीनजीकच्या एनआरसी कंपनीला सरकारने अतिरिक्त जागा दिली होती. मात्र, कंपनीतील उत्पादन प्रक्रिया दहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शहरी जमीन कमाल धारणा अधिनियमानुसार सरकारला परत न करता परस्पर कंपनीचा लिलाव कसा झाला? असा सवाल ऑल इंडिया ट्रेड युनियन महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी केला आहे.

एनआरसी कंपनीला ३४५ एकर अतिरिक्त जमीन ही कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत औद्योगिक वापरासाठी दिली होती. १२५ एकर जागेवर प्रत्यक्षात कंपनीची इमारत उभी होती. कंपनीत २००९ मध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर कंपनीने रहेजा बिल्डरशी १०३ एकर जमीन विक्रीचा व्यवहार केला. या व्यवहाराच्या बदल्यात ‘रहेजा’ने २६१ कोटी रुपये ३० दिवसांमध्ये सरकार दरबारी भरणे अपेक्षित होते. मात्र, ३० दिवसांत ‘रहेजा’ने ही रक्कम भरली नसल्याने जमिनीच्या खरेदीत ‘रहेजा’ला स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच ‘रहेजा’ने रक्कम न भरल्याने हा व्यवहार अनधिकृत असल्याची नोंद सरकार दरबारी आहे. शिवाय एनआरसी कंपनीकडे जमीन महसुलाच्या थकबाकीपोटी ६ कोटी ३४ लाख रुपयांचा बोजा आहे, असा अहवाल जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नगरविकास खात्यास १५ जून २०२१ ला पाठविला आहे. त्यामुळे नगरविकास खाते या अहवालानुसार पुढे काय कार्यवाही करते, याकडे युनियनसह कामगारांचे लक्ष लागले आहे.

‘कामगारांसाठी घरकूल योजना राबवा’

ऑल इंडिया ट्रेड युनियनचे उपाध्यक्ष चौधरी यांनी यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केल्यावर जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी हा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठविला आहे. चौधरी यांनी राज्य सरकारने ‘एनआरसी’ची अतिरिक्त जमीन ताब्यात घेऊन त्या जागेवर कंपनीच्या कामगारांसाठी घरकूल योजना राबवावी, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

------------------------------