शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

ठाणे महापालिकेवर प्रशासक का नेमू नये?

By admin | Updated: January 13, 2017 07:02 IST

कोट्यवधी रुपयांचा जकात कर चुकवणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर

मुंबई : कोट्यवधी रुपयांचा जकात कर चुकवणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई न करता त्यांना मोकळीक देणाऱ्या ठाणे महापालिकेला उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. कर चुकवणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा काय कारवाई करण्यात येणार आहे, यासंदर्भात ठाणे महापालिकेला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. तर ठाणे महापालिकेवर प्रशासक नेमण्याबाबत राज्य सरकारची नेमकी काय भूमिका आहे, हे जाणण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारलाही दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.२०११ ते २०१४ या काळात वाइन शॉप, रेस्टॉरंट आणि बार, हॉटेल्स आणि सोनारांनी तब्बल ६०० कोटी रुपयांचा जकात कर चुकविल्याची माहिती ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विनोद तावडे यांना माहितीच्या अधिकाराखाली मिळाली. हा कर चुकविणाऱ्यांकडून कोणतीच वसुली करण्यात आली नाही. तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवरही काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सरकार व ठाणे महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी विनोद तावडे यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली. महापालिकेने मूळ रक्कम वसूल केली आहे. संबंधितांवर वेळेत कारवाई करण्यात न आल्याने महापालिका दंडाची रक्कम वसूल करू शकत नाही, अशी माहिती महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला दिली. ती रक्कम १५० कोटी असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. त्यावर ‘कारवाई करण्यास जाणूनबुजून विलंबही केला जाऊ शकतो. त्यामुळे कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई केलीत किंवा करणार आहात, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दोन आठवड्यांत द्या. त्याशिवाय सरकारने या महापालिकेवर प्रशासक नेमण्याबाबत त्यांची काय भूमिका आहे, हे स्पष्ट करावे,’ असे खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)