शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

राजकीय हत्येचे पाप कोणाच्या माथ्यावर?

By admin | Updated: December 6, 2015 00:42 IST

वेगवेगळ््या हत्या, हल्ले, गैरव्यवहार आणि सूडाच्या नाट्याने दिवसेंदिवस जीवघेण्या होत गेलेल्या ठाण्याच्या राजकारणावर आता राजकीय हत्येच्या तपासाचे वादळ

ठाणे : वेगवेगळ््या हत्या, हल्ले, गैरव्यवहार आणि सूडाच्या नाट्याने दिवसेंदिवस जीवघेण्या होत गेलेल्या ठाण्याच्या राजकारणावर आता राजकीय हत्येच्या तपासाचे वादळ घोंगावू लागले आहे. बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात शरण आलेल्या चार नगरसेवकामुळे आणि डायरीतील नावांमुळे आधीच चिखलात रूतलेल्या राजकारण्यांना सहपोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी गोत्यात आणले. परमार आत्महत्येप्रकरणी शरण आलेल्या नगरसेवकाच्या चौकशीत २५ वर्षांपूर्वीच्या राजकीय खुनाला वाचा फुटेल. त्याबाबत तपास चालू आहे, असे मोघम उत्तर देत त्यांनी उत्सुकता वाढवली असली, तरी खून झालेली व्यक्ती कोण याचा उलगडा केला नसल्याने तर्कर्वितर्कांना उधाण आले. २५ वर्षांपूर्वी सत्तेत कोण होते, सत्तेच्या परीघात कोण होते, कोणत्या पक्षाचे होते, याचे अंदाज बांधले जाऊ लागले. सध्या राजकारणात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींपैकी कोणाचा सहभाग या प्रकरणात आहे का, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. संपत्तीचा वाद, राजकीय गद्दारी की रिक्षा संघटनेच्या वर्चस्वाचा संघर्ष याला कारणीभूत आहे, यावरही तर्क लढवले जाऊ लागले. वातावरण ढवळलेवेगवेगळ््या गैरव्यवहारांमुळे आधीच ठाण्याचे राजकारण प्रदूषित झाले आहे. त्यातही एरवी वेगळ््या पक्षात असलेल्या पण राजकीय लाभासाठी एकत्र येणाऱ्या नेत्यांमुळे, त्यांच्या जरबेमुळे, त्यांच्या वर्चस्व संघर्षामुळे ठाणेकर वेठीला धरले जातात. आता राजकीय हत्येच्या वादामुळे वातावरण पक्षीय वातावरण ढवळून निघाले आहे.