शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

...कोणी अधिकारी देता का अधिकारी?

By admin | Updated: February 21, 2017 05:27 IST

शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागाकडे राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील

कल्याण : शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर अस्तित्वात आलेल्या शिक्षण विभागाकडे राज्य सरकारचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. येथील वर्ग-१ चे प्रशासन अधिकारी आणि वर्ग-२ चे शिक्षण अधिकारी ही पदे रिक्त असल्याने येथील केडीएमसीच्या शिक्षण विभागाच्या कारभाराचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांची उशिराने निघणारी सहल याचे ताजे उदाहरण असून अन्य प्रस्तावांनाही बसलेली खीळ पाहता कोणी अधिकारी देता का हो अधिकारी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर शिक्षण विभाग पूर्णपणे केडीएमसीच्या अखत्यारीत आलेला आहे. महापालिकेत नगरसेवक असलेल्यांची शिक्षण समितीवर सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. ही समिती स्थापन होऊन आता वर्षाचा कालावधी लोटायला आला असताना वर्षभरात केवळ दोनच सभा झाल्या आहेत. दुसरीकडे सरकारकडे भरण्यात येणारे प्रशासन अधिकारी आणि शिक्षण अधिकारी पद रिक्त आहे. सरकारकडून प्रशासन अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर पाठवलेले सुरेश आवारी यांची ८ जून २०१६ ला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. आवारी यांच्यानंतर केडीएमसीचे सहायक आयुक्त प्रकाश ढोले यांच्याकडे या पदाचा प्रभारी पदभार सोपवला होता. परंतु, त्यांची प्रभाग अधिकारीपदी नेमणूक झाल्याने ते प्रभारी म्हणून एक महिनाच या पदावर राहिले. यानंतर, वर्ग-३ चे पद असलेले शिक्षण विस्तार अधिकारी जे.जे. तडवी यांना या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, प्रशासन अधिकारी या पदावर पूर्णवेळ अधिकारी नसल्याने शिक्षण विभागाच्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. याची प्रचीती नुकत्याच झालेल्या शिक्षण समितीच्या सभेत आली. दुसरीकडे वर्ग-२ चे शिक्षण अधिकारीपदही दोन वर्षे रिक्त आहे. सध्या भोंगळ कारभार पाहता सक्षम अधिकाऱ्यांची शिक्षण विभागाला आवश्यकता आहे. मात्र, याकडे होत असलेले सरकारचे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरला आहे. (प्रतिनिधी)