शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

कुजबुज शनिवारचे सदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

बाळासाहेबांची वाणी एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम ...

बाळासाहेबांची वाणी

एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द केल्यानंतर या निर्णयाच्या प्रचाराकरिता कृपाभय्या देशभर दौरा करीत होते, याचा उलगडा त्यांच्या प्रवेशावेळी झाला. ३७० रद्द झाल्यावर काश्मीरमध्ये अन्य राज्यातील मंडळींना जमीन खरेदी करता येईल, असे सांगितले जात होते. मात्र कृपाभय्या यांच्या दौऱ्यानंतर आता काश्मीरमध्ये पाणीपुरी-भेळपुरीच्या गाड्या लागतील व मुंबईतून काश्मिरात गेलेल्यांना दल लेकच्या किनाऱ्यावर बसून ‘भय्याजी, दोन शेवपुरी, एक रगडा’ अशी हाक देता येईल याची निश्चिती झाली. कृपाशंकर हे काँग्रेसमध्ये असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांच्यावर मनस्वी प्रेम होते. अनेकदा जाहीर सभेत ‘मराठी माणसा तू जागा राहिला नाही तर एक दिवस हा कृपाशंकर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल’, अशी भीती ते घालत. मराठी माणूस अनेक रात्री झोपला नाही म्हणून किंवा बाळासाहेबांची वाणी खरी व्हावी ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने कृपाशंकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून कृपाशंकर यांना भाजपने पोटाशी घेतले आहे हे वेगळे सांगायला नको. (काँग्रेस माझी आई आहे तर भाजप माझी मावशी आहे. मराठीत आपण माय मरो, पण मावशी जगो, असे म्हणतो असे आता कृपाभय्या सांगतील.) उत्तर भारतीय मतदारांची व्होटबँक कृपाशंकर यांनी मुंबईत ‘आयात’ केली. तीच भाजपला हवी आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता जर कृपाशंकर यांनी घालवली आणि मोदी-शहांनी २०२४ मध्ये बाळासाहेबांची वाणी खरी केली तर?

...............

मामांपुढील पेच

राजकारणात अनेकदा पदांचे गाजर दाखवून मामा बनवले जाते. मात्र भिवंडीत कपिल पाटील यांना अचानक केंद्रीय राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागल्याने एक मामा भलत्याच पेचात सापडले आहेत. बाळ्यामामा म्हात्रे हे भिवंडीतील शिवसेनेचा चेहरा. कपिल पाटील आणि बाळ्यामामा म्हात्रे यांचा छत्तीसचा आकडा. पाटील यांना लोकसभेचे उत्तुंग राजकीय यश लाभले तर बाळ्यामामा यांचे राजकारण जिल्हा परिषदेच्या पुढे गेले नाही. कपिल पाटील यांनी राज्यात युती असताना एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अनेक निर्णय घेतल्याने बाळ्यामामा एकाकी पडले. काही दिवसांपूर्वी बाळ्यामामांनी शिवसेनेला रामराम केला. आता अचानक कपिल पाटील यांच्याकडे केंद्रीय मंत्रिपद सोपवल्याने भिवंडीत स्थानिक पातळीवर भाजपचा मुकाबला करील, असा नेता शिवसेनेकडे नाही. त्यामुळे आता शिवसेना बाळ्यामामांना पुन्हा शिवबंधन बांधायला सांगणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. कपिल पाटील यांचा लोकसभा मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचा असून तेथे मुस्लिम मतांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवसेनेला रामराम केल्यानंतर बाळ्यामामांनी काँग्रेसमध्ये यावे, अशी काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा आहे. एकीकडे पाटील यांच्याशी दररोज भिवंडीच्या मातीत दोन हात करण्याची संधी आहे तर दुसरीकडे निवडणूक रिंगणात लढायची संधी आहे. आता बाळ्यामामा कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

.................

पंचतारांकित उपचार घेवा रे

मीरा-भाईंदर महापालिकेतील बनावट यूएलसी प्रमाणपत्राच्या घोटाळ्यात नगररचना विभागातील बड्या धेंडांना पोलिसांनी अटक केली आहे. मुळात २०१६ मध्ये म्हणजे परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना या घोटाळ्यात सर्वप्रथम अटक केली गेली. कालांतराने कारवाई बासनात गुंडाळली गेली. परमबीर यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांचा आरोप केल्यानंतर परमबीर यांच्या ठाण्यातील आयुक्तपदाच्या कारकिर्दीतील अचानक तपास थांबलेल्या या यूएलसी प्रमाणपत्र घोटाळ्याची नव्याने चौकशी सुरू झाली. यापूर्वी साक्षीदार असलेले काही बडे अधिकारी हेच आरोपी म्हणून अटक केले गेले. पोलिसांनी अटक केल्यानंतर अशा बड्या धेंडांचे हृदय असहकार पुकारते हे आता सर्वसामान्यांना कळून चुकलेय. पोलीस कोठडीतील कुबट वासापेक्षा हॉस्पिटलमधील स्पिरिट-फिनाईलचा ‘सुवास’ उत्तम अशी समजूत घालून बडी धेंडे हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. मुळात अशा आरोपी असलेल्या बड्यांना सरकारी इस्पितळात दाखल करायला हवे. परंतु यूएलसी प्रमाणपत्राच्या घोटाळ्यात अटक झालेला हा बडा अधिकारी ठाण्यातील एका पंचतारांकित हॉस्पिटलमधील एक्झिक्युटिव्ह क्लास कक्षात आराम फर्मावत आहे. त्याची ही बडदास्त ठेवण्यात सध्या एकमेकांची तोंडे न पाहणाऱ्या पक्षाच्या नेत्यांची ‘युती’ असल्याची चर्चा आहे हे विशेष.

...............

वाचली